शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची दिवाळी, नागरिकांचा शिमगा

By admin | Updated: July 30, 2015 00:28 IST

एलबीटीचे काऊंटडाऊन सुरू : केवळ सातशे व्यापाऱ्यांचा अभय योजनेत समावेश

सांगली : महापालिका क्षेत्रातील एलबीटी एक आॅगस्टपासून रद्द होणार आहे, पण हा निर्णय घेताना राज्य शासनाने महापालिकेस पर्यायी उत्पन्नाबाबत काहीच सूचना केलेली नाही. त्यात आता पुन्हा सरसकट एलबीटी रद्द करण्याचा विचार सुरू असल्याने या करातून शंभर टक्के व्यापारी मुक्त होणार आहेत. त्यात एलबीटीतून बुडणारा निधी कसा देणार?, बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवरील कारवाईचे काय करायचे? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. एलबीटी रद्द होणार असल्याने शहरातील बारा हजार व्यापारी, उद्योजकांना लाभ होणार आहे. पण त्याचे दुष्परिणाम तब्बल सहा लाख नागरिकांना भोगावे लागणार आहेत. राज्य शासनाने एलबीटी लागू केल्यापासून सांगलीतील व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारले. परिणामी पालिकेची तिजोरी पुरती रिकामी झाली. गेल्या दोन वर्षात महापालिकेला तब्बल १२५ कोटी रुपयांची तूट आली. या तुटीचा परिणाम थेट महापालिका व नागरी विकासांवर झाला. महापालिकेने व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला, पण त्यालाही शासनाने स्थगिती दिली. त्यामुळे प्रशासनाची अवस्था पाय बांधून शर्यतीत सोडलेल्या खेळाडूप्रमाणे झाली. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, गटारी, रस्ते, मुरूम अशी किरकोळ कामे करण्यासाठी सहा-सहा महिने थांबावे लागले. या साऱ्यांचा व्यापारी, उद्योजकांवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट व्यापाऱ्यांनी शासनालाच झुकवित अभय योजनेसारख्या अनेक सवलती मिळविल्या. पण त्यालाही प्रतिसाद मिळलेला दिसत नाही. संघटना आंदोलनात सहभागी व्हायच्या, पण संघटनांचा निर्णय मानायचा नाही, अशी वृत्ती गेल्या काही महिन्यांपासून दिसून आली. आता एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द होणार आहे. त्यातच अभय योजनेची मुदतही ३१ जुलैपर्यंत आहे. आतापर्यंत अभय योजनेत केवळ ७०० व्यापाऱ्यांनी अर्ज केले आहेत. महापालिका हद्दीत एलबीटीच्या कक्षेत सुमारे १२ हजार व्यापारी येतात. त्यापैकी ८७०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. तीन ते साडेतीन हजार व्यापारी कराचा भरणा करीत आहेत. उर्वरित व्यापाऱ्यांनी कर भरण्यास ठेंगा दाखविला आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत उरणार नाहीत. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांतूनच पालिकेला नागरी सुविधांचे आव्हान पेलावे लागणार आहे. शासनानेही महापालिकेला निधी कसा देणार, याचे स्पष्टीकरण अद्यापपर्यंत दिलेले नाही. त्यामुळे एलबीटी गेला, आता पुढे काय? असा प्रश्न प्रशासनाला पडणार आहे. आता उर्वरित दोन दिवसांत अभय योनजेला किती व्यापारी प्रतिसाद देतात, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई हाती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)बुडविणाऱ्यांवर कारवाईचे संकेतएलबीटी बुडविणाऱ्या व अभय योजनेत समावेश नसलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. राज्य शासनाने अभय योजनेच्या अधिसूचनेतच एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्याने कारवाई करण्याची मुभा महापालिकेला दिली आहे. दुकानांची तपासणी, कागदपत्रांची छाननी, जप्तीच्या कारवाईचे अधिकार महापालिकेला आहेत. पण आयुक्त, उपायुक्तांची आजअखेरची भूमिका पाहता, ही कारवाई जोमाने होईल की नाही, याविषयी पदाधिकारी साशंक आहेत. त्यात महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे, तर राज्यात भाजपचे सरकार. त्यामुळे पुन्हा कारवाईला खो घातला जाईल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.