शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

शहरातील व्यापाऱ्यांना वालीच उरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी व्यापारीवर्गाच्या मागे उभे राहिले. पण सांगलीत मात्र उलट स्थिती आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी ...

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी व्यापारीवर्गाच्या मागे उभे राहिले. पण सांगलीत मात्र उलट स्थिती आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी घेऊन जाण्यासाठी हक्काची जागाच उरली नाही. त्यांना कुणीच वाली उरला नाही, अशी भावना व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी व्यक्त केली. लाॅकडाऊन संपल्यानंतर १ मेपासून व्यापाऱ्यांवर कोणतीही नवी बंधने नकोत, असेही ते म्हणाले.

शहा म्हणाले की, मिनी लाॅकडाऊनमधील दिवसाच्या जमावबंदीचे रुपांतर संचारबंदीत केले आहे. एकीकडे १४४ कलम लागू करण्यात आले. तर दुसरीकडे हातगाडे, शिवभोजन, किरणा, बेकरी, भाजीपाला, फळ विक्री सुरू ठेवली आहे. घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध म्हणजे व्यापाऱ्यांशी खेळ आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूरमधील बाजारपेठा सुरू होत्या. सांगलीतील हरभट रोड, मारुती रोड, कापडपेठ या तीन रस्त्यावरील दुकाने बंद होती. विश्रामबाग, शंभरफुटी रस्त्यावरील अनेक रिटेल दुकाने सुरू होती. मग या तीन रस्त्यावरील किरकोळ व्यापाऱ्यांनी काय घोडे मारले आहे? असा सवालही त्यांनी केला.

गुढी पाडव्यादिवशी महापौर, आयुक्तांच्या परवानगीने पूजेसाठी काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. व्यापारी वर्ग अडचणीत असताना सहानुभूती दाखविण्याऐवजी गुन्हेगारांसारखी वागणूक देण्यात आली. किमान महामारीच्या काळात तरी प्रशासनाने गुन्हे दाखल करू नये. सध्या दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

चौकट

मदनभाऊंची आठवण

सांगलीच्या आमदारांनी व्यापार सुरू ठेवण्यासाठी मोर्चा काढला. व्यापाऱ्यांची तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या. पण नंतर पुढे काय? अशावेळी व्यापारी वर्गाला माजी मंत्री मदन पाटील यांची आठवण येते. अडचणीच्या काळात ते निश्चितच व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहिले असते, असेही शहा म्हणाले.