शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील व्यापारी संकुल अद्याप कुलूपबंद

By admin | Updated: July 19, 2016 00:14 IST

इमारतीत प्रसाधनगृह : लिलाव घेऊन इमारत वापरात आणण्यासह विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची मागणी

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेने अडीच वर्षापूर्वी बांधलेले काळा मारुती मंदिराजवळील व्यापारी गाळे पहिल्या ई-लिलाव बोलीत व्यापाऱ्यांच्या पसंतीस न उतरल्याने, अजूनही हे गाळे कुलूपबंद अवस्थेतच आहेत. त्यामुळे या इमारतीचा वापर चोरटे प्रसाधनगृह म्हणूनच होऊ लागला आहे.शहरातील व्यापारउदीम वाढावा, त्यातून पालिकेच्या उत्पन्नातही भर पडावी या हेतूने हे व्यापारी संकुल बांधण्यात आले. इमारतीच्या बांधकामापासूनच हे प्रकरण नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिले होते. निविदा काढण्याआधीच भूमिपूजन आणि इमारतीचे अर्धे बांधकाम झाले होते. त्यावरुन विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या तक्रारीची अद्याप कसलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बांधकाम रंगरंगोटी आणि सजावट पूर्ण होऊन तत्कालीन मंत्री अजित पवार यांच्याहस्ते १७ जानेवारी २0१५ रोजी संकुलाचे उद्घाटनही झाले.गेल्या तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे मूल्यांकन झाल्यानंतर ई-लिलाव निविदा प्रसिध्दीस देण्यात आली होती. मात्र त्यावेळी व्यापाऱ्यांकडून या लिलाव प्रक्रियेस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हे गाळे तसेच बंद अवस्थेत पडून राहिले आहेत. हा परिसर व्यापारी पेठेलगत लागून असल्याने गाळ्यांचा लिलाव होणे गरजेचे आहे. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर समोरील रस्ता प्रशस्त व्हावा, या उद्देशाने पोस्टालगत असणाऱ्या इमारतीमधील तिघांवर विस्थापित होण्याची वेळ आली. या छोट्या कारागीरांनी शहराच्या विकासात अडथळा न आणता आपले व्यवसाय इतर ठिकाणी स्थलांतरित करुन मोठेपणा दाखविला. तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी मानवतेच्या भूमिकेतून या छोट्या कारागीरांचे याच इमारतीमधील गाळ्यांत पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. सभागृहाने त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव करुन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र मानवतावादी भूमिकेतील हा ठराव नेहमीप्रमाणे लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनालाही दिलेला शब्द पूर्ण करताना अडथळे येत आहेत. (वार्ताहर)न्याय देण्याची अपेक्षाबांधकाम ते उद्घाटन आणि त्यानंतरच्या जवळपास वर्षभराच्या काळात ही देखणी इमारत बंद अवस्थेत राहिल्याने त्याचा वापर आता प्रसाधनगृह म्हणून होऊ लागला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबवून ही इमारत वापरात आणावी, तसेच विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन करुन त्यांनाही न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.