शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

इस्लामपुरातील व्यापारी संकुल अद्याप कुलूपबंद

By admin | Updated: July 19, 2016 00:14 IST

इमारतीत प्रसाधनगृह : लिलाव घेऊन इमारत वापरात आणण्यासह विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची मागणी

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेने अडीच वर्षापूर्वी बांधलेले काळा मारुती मंदिराजवळील व्यापारी गाळे पहिल्या ई-लिलाव बोलीत व्यापाऱ्यांच्या पसंतीस न उतरल्याने, अजूनही हे गाळे कुलूपबंद अवस्थेतच आहेत. त्यामुळे या इमारतीचा वापर चोरटे प्रसाधनगृह म्हणूनच होऊ लागला आहे.शहरातील व्यापारउदीम वाढावा, त्यातून पालिकेच्या उत्पन्नातही भर पडावी या हेतूने हे व्यापारी संकुल बांधण्यात आले. इमारतीच्या बांधकामापासूनच हे प्रकरण नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिले होते. निविदा काढण्याआधीच भूमिपूजन आणि इमारतीचे अर्धे बांधकाम झाले होते. त्यावरुन विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या तक्रारीची अद्याप कसलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बांधकाम रंगरंगोटी आणि सजावट पूर्ण होऊन तत्कालीन मंत्री अजित पवार यांच्याहस्ते १७ जानेवारी २0१५ रोजी संकुलाचे उद्घाटनही झाले.गेल्या तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे मूल्यांकन झाल्यानंतर ई-लिलाव निविदा प्रसिध्दीस देण्यात आली होती. मात्र त्यावेळी व्यापाऱ्यांकडून या लिलाव प्रक्रियेस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हे गाळे तसेच बंद अवस्थेत पडून राहिले आहेत. हा परिसर व्यापारी पेठेलगत लागून असल्याने गाळ्यांचा लिलाव होणे गरजेचे आहे. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर समोरील रस्ता प्रशस्त व्हावा, या उद्देशाने पोस्टालगत असणाऱ्या इमारतीमधील तिघांवर विस्थापित होण्याची वेळ आली. या छोट्या कारागीरांनी शहराच्या विकासात अडथळा न आणता आपले व्यवसाय इतर ठिकाणी स्थलांतरित करुन मोठेपणा दाखविला. तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी मानवतेच्या भूमिकेतून या छोट्या कारागीरांचे याच इमारतीमधील गाळ्यांत पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. सभागृहाने त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव करुन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र मानवतावादी भूमिकेतील हा ठराव नेहमीप्रमाणे लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनालाही दिलेला शब्द पूर्ण करताना अडथळे येत आहेत. (वार्ताहर)न्याय देण्याची अपेक्षाबांधकाम ते उद्घाटन आणि त्यानंतरच्या जवळपास वर्षभराच्या काळात ही देखणी इमारत बंद अवस्थेत राहिल्याने त्याचा वापर आता प्रसाधनगृह म्हणून होऊ लागला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबवून ही इमारत वापरात आणावी, तसेच विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन करुन त्यांनाही न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.