शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:22 IST

व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील हार्डवेअर व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. पोलिसांचा तपास थंडावला असल्याचे चित्र आहे. मृतदेहाचा कमरेपासून खालील भाग व शीर सापडल्याने मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर रस्त्यावरील शत्रुंजयनगरसमोरील उसाच्या शेतात शहा यांचा कमरेपासून खालील भाग सापडला होता. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली होती. दुसऱ्यादिवशी त्यांचे शीर सापडले होते. घटनास्थळी विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मृतदेहाची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. पण डॉक्टरांना मृत्यूचे कारण निश्चित करता आले नाही. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. शहा यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले नाही. घटनास्थळी विषारी द्रव्याच्या बाटलीला टोपण घातलेले होते. विष प्राशन करणारी व्यक्ती बाटलीला टोपण कसे घालेल? तसेच बाटली तशीच फेकून कशी देईल? अशी चर्चा असल्याने मृत्यूबाबत गूढ कायम आहे. अभय शहा ८ जुलैपासून बेपत्ता झाले होते. त्यादिवशी ते कोल्हापूरला रुग्णालयात व देवदर्शनाला गेल्याचे पुरावे मिळाले आहेत. शत्रुंजयनगरसमोरील कमानीजवळ त्यांची दुचाकी दुसऱ्यादिवशी नातेवाईकांना सापडली; पण या परिसरात नातेवाईक व पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्य रस्त्यापासून मृतदेह मिळालेले ठिकाण फार लांब आहे. असे असतानाच शहा तिथेपर्यंत चालत का गेले? दुचाकी घेऊन का गेले नाहीत? अशीही चर्चा आहे. अहवालाकडे लक्षशहा यांचा विच्छेदन तपासणीचा अंतिम अहवाल अजूनही प्राप्त न झाल्याने पोलिसांचा तपास थंडावला आहे. याप्रकरणी नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांच्याकडूनही ठोस माहिती मिळाली नाही. शहा यांच्या शरीराचे काही अवशेष अजूनही सापडले नाहीत. तीन-चार दिवस पोलिसांनी शोध घेतला.