शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:22 IST

व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील हार्डवेअर व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. पोलिसांचा तपास थंडावला असल्याचे चित्र आहे. मृतदेहाचा कमरेपासून खालील भाग व शीर सापडल्याने मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर रस्त्यावरील शत्रुंजयनगरसमोरील उसाच्या शेतात शहा यांचा कमरेपासून खालील भाग सापडला होता. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली होती. दुसऱ्यादिवशी त्यांचे शीर सापडले होते. घटनास्थळी विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मृतदेहाची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. पण डॉक्टरांना मृत्यूचे कारण निश्चित करता आले नाही. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. शहा यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले नाही. घटनास्थळी विषारी द्रव्याच्या बाटलीला टोपण घातलेले होते. विष प्राशन करणारी व्यक्ती बाटलीला टोपण कसे घालेल? तसेच बाटली तशीच फेकून कशी देईल? अशी चर्चा असल्याने मृत्यूबाबत गूढ कायम आहे. अभय शहा ८ जुलैपासून बेपत्ता झाले होते. त्यादिवशी ते कोल्हापूरला रुग्णालयात व देवदर्शनाला गेल्याचे पुरावे मिळाले आहेत. शत्रुंजयनगरसमोरील कमानीजवळ त्यांची दुचाकी दुसऱ्यादिवशी नातेवाईकांना सापडली; पण या परिसरात नातेवाईक व पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्य रस्त्यापासून मृतदेह मिळालेले ठिकाण फार लांब आहे. असे असतानाच शहा तिथेपर्यंत चालत का गेले? दुचाकी घेऊन का गेले नाहीत? अशीही चर्चा आहे. अहवालाकडे लक्षशहा यांचा विच्छेदन तपासणीचा अंतिम अहवाल अजूनही प्राप्त न झाल्याने पोलिसांचा तपास थंडावला आहे. याप्रकरणी नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांच्याकडूनही ठोस माहिती मिळाली नाही. शहा यांच्या शरीराचे काही अवशेष अजूनही सापडले नाहीत. तीन-चार दिवस पोलिसांनी शोध घेतला.