शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

‘वसंतदादा’ची सभा बिलावर गाजणार

By admin | Updated: September 30, 2015 00:08 IST

=शेतकऱ्यांच्या ३२ कोटींचे काय?: कामगारांच्या थकित पगाराचा प्रश्नही निर्माण होणार

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ आणि २०१४-१५ या गळीत हंगामातील ३२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकित आहेत. तसेच कामगारांच्या थकित पगाराचाही प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर बुधवार, दि. ३० रोजी होणारी सभा गाजणार आहे. कारखाना प्रशासनाने हे ओळखूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांपूर्वी काही पैसे जमा केले आहेत. परंतु, ती रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे शेतकरी व सभासद प्रशासनाला थकित रकमेवरून धारेवर धरणार आहे.वसंतदादा साखर कारखान्याच्या बिलाचा प्रश्न दोन वर्षांपासून गंभीर निर्माण झाला आहे. २०१३-१४ वर्षामध्ये ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची ३४ कोटी थकबाकी होती. त्यापैकी वीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित जवळपास १४ कोटींची बिले शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाहीत. २०१४-१५ या गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचे १७ कोटींचे बिल थकित आहे. या शेतकऱ्यांनी थकित बिल मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात आंदोलन केले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत बिल देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत. पण, ती रक्कम तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर केवळ एक हजार रुपयेच जमा झाले आहेत. थकित बिलावरून शेतकरी व सभासद कारखाना प्रशासनास जाब विचारण्याची शक्यता आहे.वसंतदादा कारखान्यातील कामगारांची थकबाकीही चाळीस कोटींहून अधिक आहे. कामगारांच्या पगाराचा प्रश्न कसा सोडविणार आहे, असाही सभासदांकडून प्रश्न उपस्थित होणार आहे. (प्रतिनिधी)धडक योजनेच्या पाणीपट्टीचा प्रश्नवसंतदादा कारखाना धडक पाणी योजना चालवत आहे. या योजना कालबाह्य असल्यामुळे पाणीपट्टी आणि योजनेचा खर्च भागत नाही. वाढीव खर्च कारखाना भरत असल्यामुळेही आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. यातूनही धडक योजनेवर ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अन्य कारखान्यास ऊस घालवणार असाल तर घालवा, पण धडक योजनेची पाणीपट्टी प्रामाणिकपणे भरली पाहिजे. तुम्ही अन्य कारखान्याला ऊस घालणार असाल तर वसंतदादा कारखान्याने धडक योजनांच्या पाणीपट्टीचा वाढीव खर्च कशासाठी सोसायचा, असा प्रश्नही वसंतदादा कारखाना प्रशासनाने उपस्थित केला आहे.