शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खोकी पुनर्वसनासाठी महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन चौकातून सुरूवात झाली. महापालिकेवर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की, २००५ मध्ये खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्क्या गाळ्यांत पुनर्वसन करण्यासाठी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन त्यावेळी काँग्रेस नेते मदन पाटील आणि त्यावेळच्या प्रशासनाने खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खोकीधारकांनीही खोकी हटवून सहकार्य केले होते. आतापर्यंत दीड हजार खोकीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यानंतर पुनर्वसनाचे काम रखडले आहे. आजही हजारहून अधिक खोकीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही.यासंदर्भात वेळोवेळी आयुक्त, महापौर, मुख्यमंत्र्यांपासून न्यायालयापर्यंतही आम्ही प्रयत्न केले. त्यानुसार महापालिकेला आदेश होऊनही पुनर्वसनात आडकाठीच सुरू आहे. निव्वळ खोकी पुनर्वसन करू अशी आश्वासने नकोत. आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ समिती नेमून काम सुरू करावे. मालमत्ता व्यवस्थापक, ‘नगररचना’चे अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी यांनी समिती करून याबाबत पुनर्वसनाचा आराखडा करावा, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, एकीकडे पुनर्वसनाचे काम होत नाही, तर दुसरीकडे गणेश मार्केटसह इतर ठिकाणच्या गाळेधारकांच्या हस्तांतराच्या सुमारे ४०० हून अधिक फायली पडून आहेत. मथुबाई कन्या महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूस खोकी पुनर्वसन करावे, जुन्या स्टेशन चौक बसस्थानकामागे २५ खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, शासकीय रुग्णालय, विश्रामबाग रेल्वे गेट, विश्रामबाग जुना जकात नाका आदी ठिकाणी खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, अशा अनेक मागण्या आहेत. खोकीधारकांबाबत प्रशासन व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे संयमाचा बांध सुटला आहे.यावेळी युसूफ जमादार, राजू पागे, एकनाथ सूर्यवंशी, प्रकाश कोकाटे, मन्सूर नरवाडे, मयूर बांगर, अशोक कारंडे, गणेश कोडते, महेश हरमलकर, मकरंद जमदाडे, राजकुमार खोत, राजू पागे, राजू खोत, प्रकाश मोरे आदींसह शेकडो खोकीधारक उपस्थित होते.झोपमोड आंदोलन : करणारखोक्यांच्या पुनर्वसनाबाबत वारंवार आंदोलन करूनही महापालिका प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. येत्या पंधरा दिवसात खोकी पुनर्वसनाबाबत निर्णय न झाल्यास महापौर, आयुक्तांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन, रोटी दो आंदोलन, धरणे, उपोषण आदी आंदोलने लोकशाही मार्गाने करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नांगरे यांनी दिला.