शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

खोकी पुनर्वसनासाठी महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन चौकातून सुरूवात झाली. महापालिकेवर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की, २००५ मध्ये खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्क्या गाळ्यांत पुनर्वसन करण्यासाठी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन त्यावेळी काँग्रेस नेते मदन पाटील आणि त्यावेळच्या प्रशासनाने खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खोकीधारकांनीही खोकी हटवून सहकार्य केले होते. आतापर्यंत दीड हजार खोकीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यानंतर पुनर्वसनाचे काम रखडले आहे. आजही हजारहून अधिक खोकीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही.यासंदर्भात वेळोवेळी आयुक्त, महापौर, मुख्यमंत्र्यांपासून न्यायालयापर्यंतही आम्ही प्रयत्न केले. त्यानुसार महापालिकेला आदेश होऊनही पुनर्वसनात आडकाठीच सुरू आहे. निव्वळ खोकी पुनर्वसन करू अशी आश्वासने नकोत. आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ समिती नेमून काम सुरू करावे. मालमत्ता व्यवस्थापक, ‘नगररचना’चे अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी यांनी समिती करून याबाबत पुनर्वसनाचा आराखडा करावा, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, एकीकडे पुनर्वसनाचे काम होत नाही, तर दुसरीकडे गणेश मार्केटसह इतर ठिकाणच्या गाळेधारकांच्या हस्तांतराच्या सुमारे ४०० हून अधिक फायली पडून आहेत. मथुबाई कन्या महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूस खोकी पुनर्वसन करावे, जुन्या स्टेशन चौक बसस्थानकामागे २५ खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, शासकीय रुग्णालय, विश्रामबाग रेल्वे गेट, विश्रामबाग जुना जकात नाका आदी ठिकाणी खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, अशा अनेक मागण्या आहेत. खोकीधारकांबाबत प्रशासन व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे संयमाचा बांध सुटला आहे.यावेळी युसूफ जमादार, राजू पागे, एकनाथ सूर्यवंशी, प्रकाश कोकाटे, मन्सूर नरवाडे, मयूर बांगर, अशोक कारंडे, गणेश कोडते, महेश हरमलकर, मकरंद जमदाडे, राजकुमार खोत, राजू पागे, राजू खोत, प्रकाश मोरे आदींसह शेकडो खोकीधारक उपस्थित होते.झोपमोड आंदोलन : करणारखोक्यांच्या पुनर्वसनाबाबत वारंवार आंदोलन करूनही महापालिका प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. येत्या पंधरा दिवसात खोकी पुनर्वसनाबाबत निर्णय न झाल्यास महापौर, आयुक्तांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन, रोटी दो आंदोलन, धरणे, उपोषण आदी आंदोलने लोकशाही मार्गाने करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नांगरे यांनी दिला.