शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

खोकी पुनर्वसनासाठी महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन चौकातून सुरूवात झाली. महापालिकेवर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की, २००५ मध्ये खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्क्या गाळ्यांत पुनर्वसन करण्यासाठी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन त्यावेळी काँग्रेस नेते मदन पाटील आणि त्यावेळच्या प्रशासनाने खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खोकीधारकांनीही खोकी हटवून सहकार्य केले होते. आतापर्यंत दीड हजार खोकीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यानंतर पुनर्वसनाचे काम रखडले आहे. आजही हजारहून अधिक खोकीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही.यासंदर्भात वेळोवेळी आयुक्त, महापौर, मुख्यमंत्र्यांपासून न्यायालयापर्यंतही आम्ही प्रयत्न केले. त्यानुसार महापालिकेला आदेश होऊनही पुनर्वसनात आडकाठीच सुरू आहे. निव्वळ खोकी पुनर्वसन करू अशी आश्वासने नकोत. आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ समिती नेमून काम सुरू करावे. मालमत्ता व्यवस्थापक, ‘नगररचना’चे अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी यांनी समिती करून याबाबत पुनर्वसनाचा आराखडा करावा, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, एकीकडे पुनर्वसनाचे काम होत नाही, तर दुसरीकडे गणेश मार्केटसह इतर ठिकाणच्या गाळेधारकांच्या हस्तांतराच्या सुमारे ४०० हून अधिक फायली पडून आहेत. मथुबाई कन्या महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूस खोकी पुनर्वसन करावे, जुन्या स्टेशन चौक बसस्थानकामागे २५ खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, शासकीय रुग्णालय, विश्रामबाग रेल्वे गेट, विश्रामबाग जुना जकात नाका आदी ठिकाणी खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, अशा अनेक मागण्या आहेत. खोकीधारकांबाबत प्रशासन व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे संयमाचा बांध सुटला आहे.यावेळी युसूफ जमादार, राजू पागे, एकनाथ सूर्यवंशी, प्रकाश कोकाटे, मन्सूर नरवाडे, मयूर बांगर, अशोक कारंडे, गणेश कोडते, महेश हरमलकर, मकरंद जमदाडे, राजकुमार खोत, राजू पागे, राजू खोत, प्रकाश मोरे आदींसह शेकडो खोकीधारक उपस्थित होते.झोपमोड आंदोलन : करणारखोक्यांच्या पुनर्वसनाबाबत वारंवार आंदोलन करूनही महापालिका प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. येत्या पंधरा दिवसात खोकी पुनर्वसनाबाबत निर्णय न झाल्यास महापौर, आयुक्तांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन, रोटी दो आंदोलन, धरणे, उपोषण आदी आंदोलने लोकशाही मार्गाने करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नांगरे यांनी दिला.