शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत ११४ कोटींचा निधी आला तर तो गेला कुठे? या कालावधीत विशेष अनुदान १० कोटी ...

इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत ११४ कोटींचा निधी आला तर तो गेला कुठे? या कालावधीत विशेष अनुदान १० कोटी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामाचे दोन कोटी असे १२ कोटी रुपये सोडले तर इतर निधी कसा आणला, याचे उत्तर द्या. नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल करू नये. जयंत पाटील यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा त्यांनी शहराच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी टीका नगरसेवक शहाजी पाटील यांनी केली.

येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, शहरासाठी निधी आणताना विक्रम पाटील किंवा तुम्ही यापैकी कोणी प्रयत्न केले, हे सांगावे. या शहरावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नेहमीच प्रेम केले आहे. त्यामुळेच त्यांनी सर्व नागरिकांना वाढीव संकलित कराविरोधी अपील करण्याची संधी मिळावी म्हणून प्रशासनाला ही सुनावणी पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. डॉ. संग्राम पाटील म्हणाले, भुयारी गटार योजना ८० कोटींची आहे. पूर्वीच्या सरकारने रस्ते अनुदानासाठी दिलेले २३ कोटी ५८ लाख व ५ कोटींचे व्याज भुयारी गटारीकडे वर्ग केले. १४ व्या वित्त आयोगातून १६ कोटी वर्ग करण्यात आले. यापैकी फक्त १० कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहेत. भुयारी गटार योजनेला सरकारने शून्य रुपये दिले आहेत. .

आनंदराव मलगुंडे म्हणाले, अवैध बांधकामांना जेवढी घरपट्टी, तेवढाच दंड अशी वसुली सुरू आहे. हा विषय सभागृहासमोर आलेला नाही. एक वर्षच दंडाची आकारणी करून या बांधकामाचे नियमितीकरण करायला हवे.

पै. भगवानराव पाटील म्हणाले, नगराध्यक्षांनी नेत्यांवर आरोप करण्याचे सोडून किमान राहिलेल्या वर्षात त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा.

यावेळी नगरसेवक विश्वास डांगे, कमल पाटील, हिंदुराव माळी उपस्थित होते.

चौकट

संभ्रमावस्था नको

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत ११४ कोटींचा निधी आणला, असे नगराध्यक्ष सांगत आहेत. त्यामुळे शहरात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा संभ्रम निर्माण होणार नाही, याची दक्षता नगराध्यक्षांनी घ्यावी.