शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

महापौरांचा राजीनामा टळला

By admin | Updated: November 8, 2015 23:35 IST

जयश्रीतार्इंकडून कानउघाडणी : सत्ताधाऱ्यांत छुपा संघर्ष

सांगली : महापौर विवेक कांबळे यांना पदावरून हटविण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. पालिकेतील सत्ताधारी गटाच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी कारभारी नगरसेवकांची या प्रकरणावरून चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महापौरांच्या राजीनाम्याऐवजी त्यांच्याविरोधात छुपा संघर्ष करण्याची रणनीती आखली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात विवेक कांबळे यांची महापौरपदी निवड झाली. तेव्हा आणखी दोन ते तीनजण महापौर होतील, असे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात होते. त्यामुळे कांबळे यांचा दहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या तीन महिन्यांसाठी अन्य इच्छुकाला संधी मिळावी, म्हणून त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पण त्यांनी राजीनाम्यास स्पष्टपणे नकार दिला. साऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी भूमिका महापौर कांबळे यांनी घेतली. त्यांच्या या पवित्र्यामुळे पालिकेतील कारभारी नगरसेवक अडचणीत आले. राजीनाम्याचे नाट्य गाजत असतानाच सत्ताधारी गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यात हस्तक्षेप केला. कारभारी नगरसेवकांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली. मदनभाऊंचे निधन होऊन महिनाही झाला नसताना, पालिकेतील खुर्चीचा खेळ योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेतील कारभारी नगरसेवकांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता महापौरांच्या महासभेतील कारभाराला चाप लावण्यासाठी छुप्या पद्धतीने व्यूहरचना आखली जात आहे. ऐनवेळी होणाऱ्या ठरावाला विरोध करण्यासाठी नगरसेवकांची फळी तयार केली जात आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात महापौरांविरोधातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी) फरफट : स्वाभिमानी विकास आघाडीची!महापालिकेतील सत्ताकारणात स्वाभिमानी आघाडीची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. पण नेमकी काय भूमिका घ्यायची, अशी द्विधास्थिती स्वाभिमानीची झाली आहे. यापूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या पाठीशी हा गट होता. आता विवेक कांबळे यांच्या कारभाराला या गटाचा हातभार लागत आहे. पालिकेत विरोधक म्हणून काम करणाऱ्या स्वाभिमानीने नेहमीच सत्तेशी सोयरीक साधली आहे. या आघाडीची ही फरफट थांबून कारभारावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.बाजार समिती संचालकपदाचा वाद उफाळणारसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महापालिकेचा प्रतिनिधी पाठविण्यावरून सत्ताधाऱ्यांत मतभेद निर्माण झाले आहे. या पदासाठी महापौर कांबळे इच्छुक आहेत. त्याशिवाय प्रशांत पाटील-मजलेकर यांचे नावही चर्चेत आहे.