शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

निविदेविरोधात महापौर गट न्यायालयात जाणार

By admin | Updated: July 13, 2017 00:02 IST

हारुण शिकलगार : निविदा प्रक्रियाच बोगस असल्याचा आरोप; महासभेचाच ठराव योग्य असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मिरज नळ पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी, अद्याप निविदेवरील वाद संपलेला नाही. महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेचाच ठराव योग्य असून, स्थायी समितीने घाईगडबडीने चुकीची मंजुरी दिली आहे. या योजनेची संपूर्ण निविदा प्रक्रियाच बोगस असल्याचा आरोप केला. दरम्यान, महापौर गटाच्यावतीने या निविदेच्या स्थगितीसाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मिरज पाणी योजनेची निविदा रखडण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत मिरज पाणी योजनेच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर शिकलगार म्हणाले की, या योजनेची निविदा वाढीव दराने आली आहे. यामुळे मनपावर साडेआठ कोटींचा वाढीव बोजा पडणार आहे. यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या निविदेला मान्यता देण्यास नकार दिला होता. शिवाय वाढीव दर शासन देणार का? याचा अभिप्राय स्थायीने मागितला होता. मात्र शासनाकडून अहवाल आलेला नसताना घाईगडबडीने या वाढीव दराच्या योजनेला मान्यता दिली आहे. वास्तविक कोणत्याही नवीन योजनेला दरवाढ व मुदतवाढ न देण्याचा ठराव महासभेत झाला आहे. यामुळे जादा दराचे अधिकार हे महासभेलाच आहेत. शिवाय शासनाने यापूर्वीच योजनांचा वाढीव खर्च देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महासभेत झाला होता. योजनेची निविदा काढताना सिव्हिल वर्र्क व पाईपलाईन अशा दोन स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक होते. मात्र शासनाने व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या योजनेत बोगसगिरी झाली आहे. स्थायी समितीने घाईगडबडीने घेतलेला निर्णय चुकीचा असून, महसभा या योजनेची दोन टप्प्यात फेरनिविदा काढणार असल्याचे शिकलगार यांनी स्पष्ट केले. उपमहापौर गट लाचलुचपतकडे तक्रार करणारमिरज पाणीपुरवठा योजनेत वरिष्ठ पातळीवरून ठेकेदाराला जादा दर देण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे या ‘टक्केवारी’ची चौकशी करावी, अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याचे उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी सांगितले. महासभेने निविदा रद्द करण्याचा केलेला ठराव महापालिकेच्या आर्थिक हिताचा असल्याने तो आयुक्तांनी विखंडित करू नये, असे आवाहन त्यांनी केले. मिरज पाणी योजनेच्या निविदेसाठी अंदाजपत्रकात २५ टक्के हिश्श्याची तरतूद केली आहे. वाढीव दरामुळे जादा निधीची तरतूद कशी करणार? स्थायीच्या ठरावामुळे सदस्यांची वसुली लागणार आहे. स्थायीचा ठराव महापालिकेच्या आर्थिक हिताविरोधी असल्याने तो आयुक्तांनी विखंडित करावा. जादा दराच्या निविदेचे समर्थन शासनापासून प्रशासनापर्यंत सारेच करीत आहेत. त्यामुळे त्यात संशय घेण्यास वाव आहे. या योजनेच्या निविदा प्रक्रियेची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे माने यांनी सांगितले.