शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बदला; अन्यथा आमचे राजीनामे घ्या

By admin | Updated: February 27, 2017 23:39 IST

काँग्रेस नगरसेवक आक्रमक : नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही

सांगली : महापौर हारुण शिकलगार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांना साकडे घातले. मदनभाऊ गटातील १५ नगरसेवक महापौरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांचा राजीनामा घ्या नाही तर आमचे राजीनामे देऊ, अशी उघड भूमिका घेतल्याने काँगे्रस नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेर राजीनाम्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही देत श्रीमती पाटील यांनी नगरसेवकांची समजूत काढली. महापौर शिकलगार यांना दहा महिन्यांचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. पण सव्वा वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यात काँग्रेसअंतर्गत फाटाफुटीमुळे महापौरांना लॉटरी लागणार, अशीच चर्चा होती. पण आता काँग्रेसमधील मदनभाऊ गटाने महापौरांच्या कारभारावरच नाराजीचा सूर आळवला आहे. सोमवारी काँग्रेसच्या सांगलीतील १५ नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, शालन चव्हाण, शेवंता वाघमारे, प्रदीप पाटील, गुलजार पेंढारी आदी उपस्थित होते. या नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांच्यासमोर महापौरांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. महापौर शिकलगार हे विरोधकांची कामे गतीने करतात. त्यांच्या फायली मंजूर होत आहेत; पण सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची कामेच होत नाहीत. स्वत: महापौर व उपमहापौरांच्या प्रभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामाची निविदा निघाली आहे, तर सर्वसामान्य नगरसेवक कामासाठी हेलपाटे मारत आहेत. मदनभाऊ गटातील नगरसेवकांना महापौरांकडूनच दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर त्यांचे कामकाज सुरू आहे, असा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहता जयश्रीताई पाटील यांनी महापौर शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनाही बैठकीसाठी बोलाविले. दोन्ही पदाधिकाऱ्यांसमोरच कारभाराचा सोक्षमोक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पदाधिकारी बैठकस्थळी आल्यानंतरही नगरसेवकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना गेल्या वर्षातील अनेक तरतुदी वगळल्या आहेत. नगरसेवकांना दिलेला २५ लाखांचा प्रभाग निधीही रद्द केला आहे. ही बाब बेकायदेशीर असतानाही त्यावर पदाधिकारी का मूग गिळून गप्प आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला. पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याला सामोरे जाताना शहरातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शिकलगार यांना दिलेला दहा महिन्यांचा महापौरपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा. ते राजीनामा देणार नसतील, तर आमचे राजीनामे घ्या, असेही नगरसेवक म्हणाले. यावर जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, महापौरांचा राजीनामा घेण्याबाबत आमदार पतंगराव कदम व कॉंग्रेसच्या इतर नेत्यांशी दोन दिवसांत चर्चा करू. या निवडीत पुन्हा दगाफटका होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)