शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बदला; अन्यथा आमचे राजीनामे घ्या

By admin | Updated: February 27, 2017 23:39 IST

काँग्रेस नगरसेवक आक्रमक : नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही

सांगली : महापौर हारुण शिकलगार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांना साकडे घातले. मदनभाऊ गटातील १५ नगरसेवक महापौरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांचा राजीनामा घ्या नाही तर आमचे राजीनामे देऊ, अशी उघड भूमिका घेतल्याने काँगे्रस नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेर राजीनाम्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही देत श्रीमती पाटील यांनी नगरसेवकांची समजूत काढली. महापौर शिकलगार यांना दहा महिन्यांचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. पण सव्वा वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यात काँग्रेसअंतर्गत फाटाफुटीमुळे महापौरांना लॉटरी लागणार, अशीच चर्चा होती. पण आता काँग्रेसमधील मदनभाऊ गटाने महापौरांच्या कारभारावरच नाराजीचा सूर आळवला आहे. सोमवारी काँग्रेसच्या सांगलीतील १५ नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, शालन चव्हाण, शेवंता वाघमारे, प्रदीप पाटील, गुलजार पेंढारी आदी उपस्थित होते. या नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांच्यासमोर महापौरांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. महापौर शिकलगार हे विरोधकांची कामे गतीने करतात. त्यांच्या फायली मंजूर होत आहेत; पण सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची कामेच होत नाहीत. स्वत: महापौर व उपमहापौरांच्या प्रभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामाची निविदा निघाली आहे, तर सर्वसामान्य नगरसेवक कामासाठी हेलपाटे मारत आहेत. मदनभाऊ गटातील नगरसेवकांना महापौरांकडूनच दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर त्यांचे कामकाज सुरू आहे, असा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहता जयश्रीताई पाटील यांनी महापौर शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनाही बैठकीसाठी बोलाविले. दोन्ही पदाधिकाऱ्यांसमोरच कारभाराचा सोक्षमोक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पदाधिकारी बैठकस्थळी आल्यानंतरही नगरसेवकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना गेल्या वर्षातील अनेक तरतुदी वगळल्या आहेत. नगरसेवकांना दिलेला २५ लाखांचा प्रभाग निधीही रद्द केला आहे. ही बाब बेकायदेशीर असतानाही त्यावर पदाधिकारी का मूग गिळून गप्प आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला. पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याला सामोरे जाताना शहरातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शिकलगार यांना दिलेला दहा महिन्यांचा महापौरपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा. ते राजीनामा देणार नसतील, तर आमचे राजीनामे घ्या, असेही नगरसेवक म्हणाले. यावर जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, महापौरांचा राजीनामा घेण्याबाबत आमदार पतंगराव कदम व कॉंग्रेसच्या इतर नेत्यांशी दोन दिवसांत चर्चा करू. या निवडीत पुन्हा दगाफटका होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)