शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

महापौर बदला; अन्यथा आमचे राजीनामे घ्या

By admin | Updated: February 27, 2017 23:39 IST

काँग्रेस नगरसेवक आक्रमक : नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही

सांगली : महापौर हारुण शिकलगार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांना साकडे घातले. मदनभाऊ गटातील १५ नगरसेवक महापौरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांचा राजीनामा घ्या नाही तर आमचे राजीनामे देऊ, अशी उघड भूमिका घेतल्याने काँगे्रस नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेर राजीनाम्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही देत श्रीमती पाटील यांनी नगरसेवकांची समजूत काढली. महापौर शिकलगार यांना दहा महिन्यांचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. पण सव्वा वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यात काँग्रेसअंतर्गत फाटाफुटीमुळे महापौरांना लॉटरी लागणार, अशीच चर्चा होती. पण आता काँग्रेसमधील मदनभाऊ गटाने महापौरांच्या कारभारावरच नाराजीचा सूर आळवला आहे. सोमवारी काँग्रेसच्या सांगलीतील १५ नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, शालन चव्हाण, शेवंता वाघमारे, प्रदीप पाटील, गुलजार पेंढारी आदी उपस्थित होते. या नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांच्यासमोर महापौरांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. महापौर शिकलगार हे विरोधकांची कामे गतीने करतात. त्यांच्या फायली मंजूर होत आहेत; पण सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची कामेच होत नाहीत. स्वत: महापौर व उपमहापौरांच्या प्रभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामाची निविदा निघाली आहे, तर सर्वसामान्य नगरसेवक कामासाठी हेलपाटे मारत आहेत. मदनभाऊ गटातील नगरसेवकांना महापौरांकडूनच दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर त्यांचे कामकाज सुरू आहे, असा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहता जयश्रीताई पाटील यांनी महापौर शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनाही बैठकीसाठी बोलाविले. दोन्ही पदाधिकाऱ्यांसमोरच कारभाराचा सोक्षमोक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पदाधिकारी बैठकस्थळी आल्यानंतरही नगरसेवकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना गेल्या वर्षातील अनेक तरतुदी वगळल्या आहेत. नगरसेवकांना दिलेला २५ लाखांचा प्रभाग निधीही रद्द केला आहे. ही बाब बेकायदेशीर असतानाही त्यावर पदाधिकारी का मूग गिळून गप्प आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला. पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याला सामोरे जाताना शहरातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शिकलगार यांना दिलेला दहा महिन्यांचा महापौरपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा. ते राजीनामा देणार नसतील, तर आमचे राजीनामे घ्या, असेही नगरसेवक म्हणाले. यावर जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, महापौरांचा राजीनामा घेण्याबाबत आमदार पतंगराव कदम व कॉंग्रेसच्या इतर नेत्यांशी दोन दिवसांत चर्चा करू. या निवडीत पुन्हा दगाफटका होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)