शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

शिराळा तालुक्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:26 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झालेली आहे. वारसास्थळांचा वापर चक्क पार्ट्या करण्यासाठी, ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झालेली आहे. वारसास्थळांचा वापर चक्क पार्ट्या करण्यासाठी, शेणकुटे लावण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी आणि वाळवण उन्हात घालण्यासाठी होतो आहे. या स्मारकांचा परिसर स्वच्छ, दुरुस्ती व सुशोभित होणे गरजेचे आहे. या स्मारकांकडे स्थानिक लोक, प्रशासन आणि इतिहासप्रेमींचे दुर्लक्ष झाले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांची शिराळा तालुक्यात चार ठिकाणी स्मारके आहेत. मणदूर, आरळा, बिळाशी आणि मांगरूळ या ठिकाणी ही स्मारके उभी करण्यात आली आहेत. आरळा येथे हुतात्मा सुलोचना रामचंद्र जोशी आणि हुतात्मा चांदसाहेब पटवेगार यांचे स्मारक आहे; तर बिळाशीमध्ये हुतात्मा मारुती ज्ञानू पाटील यांचे स्मारक आहे.

मांगरूळमध्ये हुतात्मा धुंडी संतू कुंभार आणि हुतात्मा शंकर भाऊ चांभार या दोन हुतात्म्यांची स्मारके आहेत. या स्मारकांची आजची अवस्था फारच विदारक आहे. आरळा येथील स्मारकात तर चक्क शेणकुटे लावण्यात आली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. स्मारकाच्या आतील बाजूस बिअरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. बिळाशी येथील स्मारक हे गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे; तर मांगरूळ येथील स्मारक उपयोगात असल्याचे दिसून आले. या स्मारकांची अवस्था पाहून इतिहासाच्या वारशाचा आपल्याला विसर पडलेला आहे हे निश्चित.

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१८-१९ मध्ये या स्मारकांची डागडुजी केली आहे. मात्र स्मारकांच्या वापराबद्दलची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि त्या त्या गावातील ग्रामपंचायतीची आहे असे सांगण्यात आले. ही दुरुस्ती चांगल्या पद्धतीने झाली किंवा नाही, ही दुरुस्ती कोणकोणती केली, झालेली दुरुस्ती किती कालावधीसाठी ठेकेदारास बंधनकारक आहे, याचे माहितीफलक येथे लावणे आवश्यक आहे. तालुक्याचा ऐतिहासिक वारसा पाहता तरुण वर्ग, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि इतिहासप्रेमींनी स्मारकांच्या सुशोभीकरण, संवर्धन आणि जतनासाठी पुढे येण्याची गरज आहे.