शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दरात हुतात्मा, राजारामबापूच लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:54 IST

सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच ...

सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच कमी असल्यामुळे ते फॉर्म्युल्यापेक्षाही जादा दर देण्याच्या प्रयत्नात आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखानदारांची कोल्हापूर येथे रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही मान्य केला आहे. काही साखर कारखानदारांची एफआरपी कमी आहे. यामुळे या कारखानदारांनी उसाची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने जादा दर देण्याची घोषणा केली आहे. सांगलीतील वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याच्या व्यवस्थापनाने तोडणी आणि वाहतुकीसह तीन हजार रुपयापेक्षा जादा दर देण्याची तयारी दर्शविली आहे. आटपाडी तालुक्यातील माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर, खानापूर तालुक्यातील यशवंत, जत तालुक्यातील डफळे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली या कारखान्यांची एफआरपी कमी आहे. यापैकी यशवंत, डफळे कारखान्यांचे गळीत चालू होण्याची शक्यता कमीच आहे. उर्वरित तीन कारखाना व्यवस्थापनानेही एफआरपी अधिक २०० यापेक्षाही जादा दर देऊन ऊस उचलण्याची तयारी दर्शविली आहे.राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव आणि सर्वोदय या तीनही युनिटची एफआरपी साडेबारा टक्क्याहून जास्त आहे. यामुळे या कारखान्यांचा तोडणी आणि वाहतुकीसह दर प्रतिटन ३४३९ पर्यंत आहे. हुतात्मा कारखान्याचा २०१६-१७ गळीत हंगामातील साखर उतारा १२.९९ टक्के होता. यामुळे या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना टनाला ३४८५.३२ रुपये दर मिळणार आहे. यात तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चाचा समावेश आहेच. जिल्ह्यातील पाच कारखाने वगळल्यास सर्वच कारखान्यांचा दर तीन हजार रुपयांपुढे जाणार आहे.दराची कोंडी फुटल्यामुळे कारखान्यांच्या गळीत हंगामालाही आता गती मिळणार असल्याचे दिसत आहे. शेतकरी संघटनांच्या लढ्यामुळेच ऊस उत्पादकांच्या पदरी चांगला दर मिळाल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. सोमवारपासून ऊसवाहतूकही सुरू झाल्याचे दिसत होते.दि. २२ आॅक्टोबर २००९ रोजीच्या साखर नियंत्रण आदेशामध्ये सुधारणा केली आहे. त्यामध्ये ऊस उत्पादकांची जोखीम आणि लाभ विचारात घेऊन, माफक नफा मिळण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबर २००९ पासून साखरेच्या हंगामांचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्याचा अधिकार केंद्र शासनास आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी जाणाºया उसाला ९.५० टक्के साखर उताºयासाठी २५५० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २६८ रुपये एफआरपी निश्चित केली आहे.असा असेल दर (तोडणी, वाहतूक)कारखाना उतारा दर (रुपये)वसंतदादा (दत्त इंडिया) ९ २५५०राजारामबापू (साखराळे) १२.८२ ३४३९.७६विश्वास १२.०५ ३२३३.०४हुतात्मा १२.९९ ३४८५.३२माणगंगा ९.८४ २६४१.१२महांकाली १०.६४ २८५५.५२राजारामबापू (वाटेगाव) १२.६३ ३३८८.८४डफळे ९ २५५०सोनहिरा १२.५९ ३३७८.१२क्रांती ११.९३ ३२०१.२४सर्वोदय १२.७५ ३४२१मोहनराव शिंदे ११.१८ ३०००.२४निनाईदेवी (दालमिया) ११.६४ ३१२३.५२यशवंत (नागेवाडी) ९ २५५०केन अ‍ॅग्रो (डोंगराई) ११.४६ ३०७५.२८उदगिरी शुगर ११.७० ३१३९.०६सदगुरु श्री श्री शुगर ९.८८ २६५१.८४तोडणी, वाहतूक खर्च ५०० ते ७०० रुपयेक्रांती साखर कारखान्याचा ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च प्रतिटन ५०० रुपये, तर राजारामबापू, हुतात्मा, सर्वोदय, मोहनराव शिंदे या कारखान्यांचाही खर्च जवळपास तेवढाच आहे. वसंतदादा, माणगंगा, महांकाली या कारखान्यांचा तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ९०० पर्यंत दाखविला आहे. संघटना आणि कारखानदारांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यातून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा होऊन ऊस उत्पादक शेतकºयांच्या हाती २४०० ते ३१०० रुपयांपर्यंत अंतिम दर मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती