शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

दरात हुतात्मा, राजारामबापूच लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:54 IST

सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच ...

सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच कमी असल्यामुळे ते फॉर्म्युल्यापेक्षाही जादा दर देण्याच्या प्रयत्नात आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखानदारांची कोल्हापूर येथे रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही मान्य केला आहे. काही साखर कारखानदारांची एफआरपी कमी आहे. यामुळे या कारखानदारांनी उसाची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने जादा दर देण्याची घोषणा केली आहे. सांगलीतील वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याच्या व्यवस्थापनाने तोडणी आणि वाहतुकीसह तीन हजार रुपयापेक्षा जादा दर देण्याची तयारी दर्शविली आहे. आटपाडी तालुक्यातील माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर, खानापूर तालुक्यातील यशवंत, जत तालुक्यातील डफळे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली या कारखान्यांची एफआरपी कमी आहे. यापैकी यशवंत, डफळे कारखान्यांचे गळीत चालू होण्याची शक्यता कमीच आहे. उर्वरित तीन कारखाना व्यवस्थापनानेही एफआरपी अधिक २०० यापेक्षाही जादा दर देऊन ऊस उचलण्याची तयारी दर्शविली आहे.राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव आणि सर्वोदय या तीनही युनिटची एफआरपी साडेबारा टक्क्याहून जास्त आहे. यामुळे या कारखान्यांचा तोडणी आणि वाहतुकीसह दर प्रतिटन ३४३९ पर्यंत आहे. हुतात्मा कारखान्याचा २०१६-१७ गळीत हंगामातील साखर उतारा १२.९९ टक्के होता. यामुळे या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना टनाला ३४८५.३२ रुपये दर मिळणार आहे. यात तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चाचा समावेश आहेच. जिल्ह्यातील पाच कारखाने वगळल्यास सर्वच कारखान्यांचा दर तीन हजार रुपयांपुढे जाणार आहे.दराची कोंडी फुटल्यामुळे कारखान्यांच्या गळीत हंगामालाही आता गती मिळणार असल्याचे दिसत आहे. शेतकरी संघटनांच्या लढ्यामुळेच ऊस उत्पादकांच्या पदरी चांगला दर मिळाल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. सोमवारपासून ऊसवाहतूकही सुरू झाल्याचे दिसत होते.दि. २२ आॅक्टोबर २००९ रोजीच्या साखर नियंत्रण आदेशामध्ये सुधारणा केली आहे. त्यामध्ये ऊस उत्पादकांची जोखीम आणि लाभ विचारात घेऊन, माफक नफा मिळण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबर २००९ पासून साखरेच्या हंगामांचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्याचा अधिकार केंद्र शासनास आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी जाणाºया उसाला ९.५० टक्के साखर उताºयासाठी २५५० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २६८ रुपये एफआरपी निश्चित केली आहे.असा असेल दर (तोडणी, वाहतूक)कारखाना उतारा दर (रुपये)वसंतदादा (दत्त इंडिया) ९ २५५०राजारामबापू (साखराळे) १२.८२ ३४३९.७६विश्वास १२.०५ ३२३३.०४हुतात्मा १२.९९ ३४८५.३२माणगंगा ९.८४ २६४१.१२महांकाली १०.६४ २८५५.५२राजारामबापू (वाटेगाव) १२.६३ ३३८८.८४डफळे ९ २५५०सोनहिरा १२.५९ ३३७८.१२क्रांती ११.९३ ३२०१.२४सर्वोदय १२.७५ ३४२१मोहनराव शिंदे ११.१८ ३०००.२४निनाईदेवी (दालमिया) ११.६४ ३१२३.५२यशवंत (नागेवाडी) ९ २५५०केन अ‍ॅग्रो (डोंगराई) ११.४६ ३०७५.२८उदगिरी शुगर ११.७० ३१३९.०६सदगुरु श्री श्री शुगर ९.८८ २६५१.८४तोडणी, वाहतूक खर्च ५०० ते ७०० रुपयेक्रांती साखर कारखान्याचा ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च प्रतिटन ५०० रुपये, तर राजारामबापू, हुतात्मा, सर्वोदय, मोहनराव शिंदे या कारखान्यांचाही खर्च जवळपास तेवढाच आहे. वसंतदादा, माणगंगा, महांकाली या कारखान्यांचा तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ९०० पर्यंत दाखविला आहे. संघटना आणि कारखानदारांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यातून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा होऊन ऊस उत्पादक शेतकºयांच्या हाती २४०० ते ३१०० रुपयांपर्यंत अंतिम दर मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती