शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

‘हुतात्मा’चा डिस्टिलरी प्रकल्प लवकरच

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

वैभव नायकवडी : प्रतिदिन ३० हजार लिटर क्षमता; सर्व शेतकऱ्यांना हिशेब देणार

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यात येणाऱ्या आठ महिन्यात आसवनी (डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ३० हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमता असणाऱ्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या उभारणी कामाचे करारपत्र संचालक मंडळ सभेत करण्यात आले. यावेळी नायकवडी म्हणाले की, सद्य:स्थितीत साखर उद्योग अतिरिक्त साखर उत्पादनामुळे व घसरलेल्या साखरेच्या दरामुळे अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये नुसत्या साखरेवर शेतकऱ्यांना भरीव ऊसदर देणे अवघड झाले आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच येत्या आठ महिन्यात ‘हुतात्मा’ ३० हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प सुरू करीत आहे. या प्रकल्पामध्ये डिस्टिलरी प्रकल्प उभारणी, त्यातून रेक्टीफाईड स्पिरिट, एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, फ्युएल इथेनॉल प्राप्त होणार आहे. याचे पुरवठादार मे. नरनलाल प्रा. लि., नवसारी आहेत. बायोगॅस प्लॅन्ट उभारणीमध्ये पुरवठादार इकोबोर्ड इंडस्ट्रिज पुणे, इव्हॉपोरेशन प्लॅन्ट उभारणी पुरवठादार मे. केबीके केम इंडस्ट्रिज प्रा. लि., पुणे, कम्पोस्टिंग सिस्टिम उभारणी पुरवठादार मे. ट्रायोकेम शु. को. टेक्. इंजिनिअरिंग प्रा. लि, पुणे आहेत. आठ महिन्यात हा प्रकल्प उभारला जाईल आणि प्रत्यक्षात उत्पादनाला प्रारंभही होईल असे त्यांनी सांगितले.यावेळी कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस, उपाध्यक्षा वंदना माने, सरपंच गौरव नायकवडी, संचालक, कारखान्याचे अधिकारी, पुरवठादार व उभारणी करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)संजय कोले यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूलहुतात्मा कारखान्याचा पूर्वइतिहास तपासून आणि ठेवी कपातीवरील व्याज १५ टक्के परत केले आहे, याचा विचार करून संजय कोले यांनी बोलायला पाहिजे होते, असे मत विश्वास थोरात यांनी व्यक्त केले. कोले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल न करता त्यांना खरी वस्तुस्थिती सांगावी. कामगारांना ४0 टक्के बोनस दिला आहे. यामुळे ‘हुतात्मा’च्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आर्थिक स्तर सुधारला.संजय कोले तुम्ही स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजता, मग सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल कमी दिली आहे. येथे तुम्ही मूग गिळून गप्प का आहात?, असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला. ‘हुतात्मा’चा कारभार शेतकऱ्यांच्या हिताचा असतानाही यापुढेही शेतकऱ्यांना ऊसदर जादा देणार आहे. या प्रगतीमुळेच संजय कोले तुम्हाला या सगळ्याची भोवळ आली आहे, असे विश्वास थोरात म्हणाले.