शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

विवाह नोंदणीत सांगलीकर उदासीन

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

नोंदणीचे प्रमाण केवळ ४० टक्केच : रजिस्टर विवाह पध्दतीमध्ये वाढ

नरेंद्र रानडे - सांगली -जिल्ह्यात विवाहाची नोंदणी करण्याबाबत वधू-वर जागरुक नसल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास, विवाह नोंदणीचे प्रमाण अवघे ४० टक्के आहे. नोंदणी (रजिस्टर) पद्धतीने विवाह करण्यामध्ये मात्र मागील वर्षीपेक्षा यंदा १५ टक्के वाढ झाली आहे. शासकीय कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात प्रत्येक विवाहित जोडप्याने विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. थाटामाटात लग्न करण्याकडे अद्यापही अनेकांचा कल असला तरी, नोंदणी पद्धतीने पध्दतीने विवाह करण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. याकरिता विवाहाच्या एक महिना अगोदर इच्छुक विवाहितांना प्रशासकीय कार्यालयास नोटीस द्यावी लागत असल्याने, या प्रकारच्या विवाहाची १०० टक्के नोंदणी होत आहे. विवाहाचा अनावश्यक खर्च वाचविण्याची मानसिकता असणारे नोंदणी पध्दतीलाच प्राधान्य देत आहेत. येथील विवाह अधिकारी कार्यालयात १ जानेवारी ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधित जिल्ह्यातील १७५ जणांनी रजिस्टर विवाह केल्याची नोंद आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा यामध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. विवाहाची नोंदणी न केल्यास भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, याची कल्पना असूनही मंगल कार्यालयात विवाह करणारे कित्येकजण नोंदणी करीत नाहीत. नोंदणी करावी याकरिता प्रशासनाच्यावतीने जनजागृती सुरू आहे. १ जानेवारी ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधित महापालिका क्षेत्रात सरासरी ११०० जोडप्यांनीच विवाह नोंदणीकरिता महापालिकेच्या पायऱ्या चढल्या आहेत. नोंदणी कार्यालयाच्या माहितीनुसार हे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. विवाह झाल्यानंतर नोंदणीकडे दुर्लक्ष करणारे, प्रशासकीय कामात अडचणी आल्या की, हमखास नोंदणी करण्याकरिता येत असल्याचे चित्र आहे. २००७ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विवाह अधिकाऱ्यांकडे विवाह नोंदणी करण्याची व्यवस्था होती. परंतु महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम १९९८ अन्वये नोंदणी प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळे महापालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका यांना नोंदणीचे अधिकार दिले आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीस १ मे २००८ पासून प्रारंभ झाला आहे. ही बाब विवाहितांसाठी सोयीची असूनही नोंदणीबाबत उदासीनताच दिसून येत आहे.विवाह नोंदणी करणे गरजेचेविवाहाची कायदेशीर नोंदणी न केल्यास प्रामुख्याने पत्नीला भविष्यकाळात वारसा हक्क, पेन्शनचा लाभ, विमा मिळणे, पासपोर्ट काढणे आदी बाबींमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक विवाहित जोडप्याने कौटुंबिक जीवनात स्थैर्य राखण्यासाठी विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे, असे मत महापालिका सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी व्यक्त केले.