शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

जत तालुक्याने पाहिला टँकर नसलेला मार्च महिना-जागतिक जल दिन विशेष...इतिहासातील पहिलीच घटना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:56 IST

जयवंत आदाटे।जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.२०१५-१६ ...

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानाची कमाल; दाहकता कमी होत असल्याचे चित्र-कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती

जयवंत आदाटे।

जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ४२ गावांची निवड झाली होती. त्यामध्ये जत मंडलातील चार, डफळापूर- तीन, कुंभारी-आठ, मुचंडी-तीन, शेगाव-चार, माडग्याळ-दहा, उमदी-तीन, संख-सात याप्रमाणे गावांची निवड करून तेथे काम करण्यात आले आहे. २०१६-१७ या वर्षात तीस गावांची निवड करण्यात आली होती.

यामध्ये जत मंडलातील सहा, डफळापूर- चार, कुंभारी- एक, मुचंडी-चार, शेगाव-सहा, माडग्याळ- दोन, उमदी- तीन, संख-चार याप्रमाणे आहेत. या तीस गावांत जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत; तर ७१ कामे प्रगतीपथावर आहेत. त्या कामांवर ७ कोटी ५६ लाख २९ हजार इतके अनुदान खर्च झाले आहे. या कार्यालयाच्यावतीने ९४७ कामांसाठी एक हजार २४१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. मार्च २०१८ अखेर शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी ४३६ कोटी ४७ लाख रुपये इतका निधी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जत तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

वन विभागाच्यावतीने विविध प्रकारची कामे प्रगतीपथावर आहेत. लघुसिंचन विभागामार्फत सर्व कामांसाठी २०० कोटी ९३ लाख २३ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता.जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत तीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी दोन कोटी २ लाख रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. महसूल विभागामार्फत ६९ विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वच कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

यासाठी ४३ लाख ४६ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ५६ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी सर्वच काम पूर्ण झाले आहे. वीस कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.या सर्व कामांचे परिणाम दुष्काळाची दाहकता कमी होण्यावर होत आहेत. दुष्काळमुक्त जतचे स्वप्न पूर्ण होण्याची नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांना बळ मिळू लागले आहे. 

२०१७-१८ या आर्थिक वर्षात एक हजार ९०३ कामांचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी एक हजार ४८७ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे, तर एक हजार ४८२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २४२ कामांना सुरुवात करण्यात आली असून ८७ कामे पूर्ण झाली आहेत, तर १५८ कामे प्रगतीपथावर आहेत.- अभिजित पाटील,तहसीलदार, जत