शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जत तालुक्याने पाहिला टँकर नसलेला मार्च महिना-जागतिक जल दिन विशेष...इतिहासातील पहिलीच घटना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:56 IST

जयवंत आदाटे।जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.२०१५-१६ ...

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानाची कमाल; दाहकता कमी होत असल्याचे चित्र-कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती

जयवंत आदाटे।

जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ४२ गावांची निवड झाली होती. त्यामध्ये जत मंडलातील चार, डफळापूर- तीन, कुंभारी-आठ, मुचंडी-तीन, शेगाव-चार, माडग्याळ-दहा, उमदी-तीन, संख-सात याप्रमाणे गावांची निवड करून तेथे काम करण्यात आले आहे. २०१६-१७ या वर्षात तीस गावांची निवड करण्यात आली होती.

यामध्ये जत मंडलातील सहा, डफळापूर- चार, कुंभारी- एक, मुचंडी-चार, शेगाव-सहा, माडग्याळ- दोन, उमदी- तीन, संख-चार याप्रमाणे आहेत. या तीस गावांत जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत; तर ७१ कामे प्रगतीपथावर आहेत. त्या कामांवर ७ कोटी ५६ लाख २९ हजार इतके अनुदान खर्च झाले आहे. या कार्यालयाच्यावतीने ९४७ कामांसाठी एक हजार २४१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. मार्च २०१८ अखेर शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी ४३६ कोटी ४७ लाख रुपये इतका निधी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जत तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

वन विभागाच्यावतीने विविध प्रकारची कामे प्रगतीपथावर आहेत. लघुसिंचन विभागामार्फत सर्व कामांसाठी २०० कोटी ९३ लाख २३ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता.जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत तीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी दोन कोटी २ लाख रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. महसूल विभागामार्फत ६९ विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वच कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

यासाठी ४३ लाख ४६ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ५६ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी सर्वच काम पूर्ण झाले आहे. वीस कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.या सर्व कामांचे परिणाम दुष्काळाची दाहकता कमी होण्यावर होत आहेत. दुष्काळमुक्त जतचे स्वप्न पूर्ण होण्याची नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांना बळ मिळू लागले आहे. 

२०१७-१८ या आर्थिक वर्षात एक हजार ९०३ कामांचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी एक हजार ४८७ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे, तर एक हजार ४८२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २४२ कामांना सुरुवात करण्यात आली असून ८७ कामे पूर्ण झाली आहेत, तर १५८ कामे प्रगतीपथावर आहेत.- अभिजित पाटील,तहसीलदार, जत