शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

जत तालुक्याने पाहिला टँकर नसलेला मार्च महिना-जागतिक जल दिन विशेष...इतिहासातील पहिलीच घटना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:56 IST

जयवंत आदाटे।जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.२०१५-१६ ...

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानाची कमाल; दाहकता कमी होत असल्याचे चित्र-कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती

जयवंत आदाटे।

जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ४२ गावांची निवड झाली होती. त्यामध्ये जत मंडलातील चार, डफळापूर- तीन, कुंभारी-आठ, मुचंडी-तीन, शेगाव-चार, माडग्याळ-दहा, उमदी-तीन, संख-सात याप्रमाणे गावांची निवड करून तेथे काम करण्यात आले आहे. २०१६-१७ या वर्षात तीस गावांची निवड करण्यात आली होती.

यामध्ये जत मंडलातील सहा, डफळापूर- चार, कुंभारी- एक, मुचंडी-चार, शेगाव-सहा, माडग्याळ- दोन, उमदी- तीन, संख-चार याप्रमाणे आहेत. या तीस गावांत जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत; तर ७१ कामे प्रगतीपथावर आहेत. त्या कामांवर ७ कोटी ५६ लाख २९ हजार इतके अनुदान खर्च झाले आहे. या कार्यालयाच्यावतीने ९४७ कामांसाठी एक हजार २४१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. मार्च २०१८ अखेर शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी ४३६ कोटी ४७ लाख रुपये इतका निधी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जत तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

वन विभागाच्यावतीने विविध प्रकारची कामे प्रगतीपथावर आहेत. लघुसिंचन विभागामार्फत सर्व कामांसाठी २०० कोटी ९३ लाख २३ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता.जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत तीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी दोन कोटी २ लाख रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. महसूल विभागामार्फत ६९ विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वच कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

यासाठी ४३ लाख ४६ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ५६ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी सर्वच काम पूर्ण झाले आहे. वीस कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.या सर्व कामांचे परिणाम दुष्काळाची दाहकता कमी होण्यावर होत आहेत. दुष्काळमुक्त जतचे स्वप्न पूर्ण होण्याची नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांना बळ मिळू लागले आहे. 

२०१७-१८ या आर्थिक वर्षात एक हजार ९०३ कामांचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी एक हजार ४८७ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे, तर एक हजार ४८२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २४२ कामांना सुरुवात करण्यात आली असून ८७ कामे पूर्ण झाली आहेत, तर १५८ कामे प्रगतीपथावर आहेत.- अभिजित पाटील,तहसीलदार, जत