शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सांगलीत उद्या मराठा क्रांती मोर्चा

By admin | Updated: September 25, 2016 23:49 IST

जय्यत तयारी : प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सांगली : कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध, तसेच विविध मागण्यांसाठी मंगळवारी, २७ सप्टेंबरला सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक मोर्चाच्या तयारीला वेग आला असून, महापालिका व पोलिस प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. गेला महिनाभर या मोर्चाची तयारी सुरू आहे. शनिवारी मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंग व्यवस्था जिल्हा पोलिसप्रमुखांनी निश्चित केल्यानंतर तयारीला अधिकच वेग प्राप्त झाला आहे. मोर्चाच्या प्रमुख मार्गावरील ध्वनियंत्रणा फलक, झेंडे, स्वयंसेवकांची जागा, पाणी व अन्य सुविधांची व्यवस्था याबाबतचे नियोजन रविवारी करण्यात आले. मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून होणार असून, राम मंदिर चौकात समारोप होणार आहे. सध्या या मार्गावरील स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, या मार्गावरील वाहने, रुग्णवाहिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. रविवारी दिवसभर राम मंदिर चौक ते कॉँग्रेस भवन चौक, राम मंदिर चौक ते पुष्पराज चौक या रस्त्यावरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचे काम पूर्ण करून सायंकाळी याची चाचणी घेण्यात आली. टोकाचीपरिस्थिती, निर्णय घ्या : पतंगराव कदम संपूर्ण राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मागणीची टोकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारला याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल, असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, मराठा समाज फार सोशिक आहे. त्यांनी आजवर सर्व गोष्टी सहन केल्या. केवळ शेती हाच त्यांचा उद्योग असल्यामुळे कुटुंबांची संख्या वाढत गेल्यानंतर शेतीचे विभाजन झाले. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मराठा समाजासमोर आर्थिक प्रश्न गंभीर बनले आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्याने त्यात भर पडली आहे. या गोष्टींचा आता उद्रेक झाला आहे. कोणताही नेता नसताना शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने निघणारे हे मोर्चे गांधीजींच्या अहिंसक क्रांतीचे पुढचे पाऊल आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत याविषयी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यांनी अहवाल दिल्यानंतर आरक्षणाचा निर्णयसुद्धा झाला, मात्र न्यायालयाने यामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा या त्रुटी दूर करून आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाबरोबरच आम्ही मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठीही पाठपुरावा करणार आहोत. आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही राजकीय टीका मी करणार नाही. सरकार हे लोकांचे असते, ते कोणत्या पक्षाचे असत नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही त्यासाठी योग्य पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. रामदास आठवलेंनी निर्णय घ्यावा मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठरविले असेल, तर त्यांनी तातडीने तो घ्यावा. त्यांना त्यासाठीच केंद्रात संबंधित खाते दिलेले आहे, असे कदम म्हणाले.