शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा चालणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST

सांगली : लोकांच्या घरात धुणी, भांडी करून आपल्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी धडपडणाऱ्या हजारो मोलकरणींना आता अनेक घरांचे दरवाजे ...

सांगली : लोकांच्या घरात धुणी, भांडी करून आपल्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी धडपडणाऱ्या हजारो मोलकरणींना आता अनेक घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे घर चालवायचे कसे, पोटाला खायचे तरी काय? असे प्रश्न त्यांना आता सतावत आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मोलकरणींची संख्या मोठी आहे. स्वत:च्या घरातली कामे करून दुसऱ्यांच्या घरातील कामे करीत घर चालविणाऱ्या या महिलांना मागील वर्षी कोरोनाने मोठा फटका बसला. या काळात त्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले. येथील मोलकरीण संघटनेने शासनाकडे मदतही मागितली, मात्र अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.

एकीकडे शासनाची मदत नसताना आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यांना उद्ध्वस्त केले आहे. अनेक घरांची दारे या महिलांसाठी बंद झाली. महागाई वाढत असताना बेराेजगार होऊन कामाच्या शोधात अनेक महिला फिरत आहेत. त्यांना इतरत्रही काम मिळणे मुश्किल झाले आहे. अनेक घरकामगार महिलांच्या मुलांना शैक्षणिक अडचणी येत आहेत.

चौकट

एका घरातून मिळतात ५०० रुपये

एका घरातील धुणी, भांडी केल्यानंतर त्या महिलेस महिन्याकाठी केवळ ४०० ते ५०० रुपये दिले जातात. बारा तास जर एखाद्या घरात काम केले तर महिन्याकाठी १ ते १५०० रुपये दिले जातात. ९ ते १० घरांची धुणी, भांडी करून या महिलांना केवळ ५ हजार रुपयेच मिळतात.

चौकट

घर कसे चालवायचे याचीच चिंता

घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितले की, गॅस महागला, खाद्यतेल महागले, मुलांच्या शिक्षणाचा खर्च महागला असताना दसऱ्या बाजूने रोजगारही हातातून जात आहे. त्यामुळे घर चालवायचे कसे, याची चिंता लागली आहे. चार ते पाच हजारात महिन्याचा खर्च भागत नाही. तरीही कोरोनाच्या काळात आहे तो तरी रोजगार टिकावा म्हणून धडपड सुरू आहे.

कोट

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या आयुष्यातील अंधार कोणाला दिसणार आहे की नाही? शासनाने मदत केली नाही. दुसरीकडे गरिबीचे चटके सोसत या महिला जगण्याची व कुटुंब जगविण्याची धडपड करीत आहेत.

-विद्या स्वामी, अध्यक्षा, घरकामगार महिला संघटना

कोट

दहा ते पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. तरी रोजगार बेभरवशाचा आहे. पन्नाशी गाठलेल्या घरकामगार महिलांना तर सर्वठिकाणची दारे बंद आहेत. त्यामुळे बेरोजगार झाल्यानंतर कुटुंब जगवायचे कसे, याची चिंता सतावत आहे.

-बबिता कन्नुरे, सांगली

कोट

घरकामगार महिलांच्या व्यथांना कोणीही वाली नाही. परिस्थिती चांगली असणाऱ्यांना पिवळे कार्ड आणि पाच हजार रुपयेसुद्धा न मिळणाऱ्या मोलकरणींना केशरी कार्ड दिले जाते. एकीकडे रोजगार नाही, दुसरीकडे धान्य नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.

- सुमन चंदुरे, कुपवाड