शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

आटपाडी बाजार समितीसाठी माणगंगा पॅटर्न?

By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST

१९ जागांसाठी १३८ अर्ज : देशमुख गटाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेला घवघवीत यश

अविनाश बाड - आटपाडी -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त १९ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ही निवडणूक ‘माणगंगा पॅटर्न’प्रमाणेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपबरोबरच शिवसेना आणि कॉँग्रेसच्या भूमिकेकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.याआधी दि. १६ मे २००८ रोजी बाजार समितीची निवडणूक झाली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनेक राजकीय गटांना संधी दिली. पण सततच्या पाठिंब्याच्या राजकारणामुळे आणि राजकीयदृष्ट्या सामंज्यस्याची भूमिका घेऊनही विधानसभा निवडणुकीत देशमुख गट एकाकी पडला. तेव्हापासून एकला चलो रे म्हणत देशमुख गट कोणत्याही राजकीय गटाशी तडजोड न करता निवडणुका लढवित आहे. त्यामध्ये या गटाला भरघोस यशही मिळताना दिसत आहे.ताकारी बाजार समितीपासून विभाजन होऊन खानापूर आणि खानापूर बाजार समितीचे विभाजन होऊन दि. २ नोव्हेंबर १९७२ रोजी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्याचे श्रेय बाजार समितीचे संस्थापक सभापती बाबासाहेब देशमुख यांचे. सध्या या संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चुरशीने अर्ज भरले आहेत.कॉँग्रेस वगळता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आ. अनिल बाबर यांनी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी ती निवडणूक झाली. आता या निवडणुकीत आ. बाबर काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजेंद्रअण्णांनी कोणत्याच गटाशी कसलीही तडजोड न करण्याचे धोरण या निवडणुकीत अवलंबिले आहे. बाजार समितीमध्ये विकास सोसायट्या मतदार संघासाठी ११ संचालकांच्या जागा आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या ११ संचालकांच्या जागांवर देशमुख गटाने प्रबळ दावा करणे साहजिक आहे. उर्वरित ग्रामपंचायत-४, व्यापारी-२, प्रक्रिया खरेदी-विक्री -१, हमाल -तोलाई- १ या जागांसाठी चुरस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या निवडणुकीत देशमुुख गटाला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना यांची युती होते की नाही आणि युती झाली तरी त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल हे स्पष्ट आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर हे सध्या तडजोड न करता निवडणुकींना सामोरे जात आहेत. निवडणुकांमध्ये जरी त्यांना अपेक्षित यश मिळत नसले तरी, या निवडणुका त्यांचे सच्चे कार्यकर्ते, समर्थक वाढविणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने कुणाशीही युती केली नाही तरी या दोघांमध्येच बाजार समितीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केले आहेत. राजकीय तडजोडीतून समितीचे उपसभापतीपद कॉँग्रेसच्या गणपत काटकर यांना देण्यात आले होते. त्यांची काय भूमिका राहणार का कुुणाशी युती करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.बाजार समिती कुणासाठी?शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, हा मुख्य उद्देश असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राजकारणी केवळ सत्तेचे एक केंद्र म्हणून पाहताना दिसत आहेत. चुरशीने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल करणाऱ्या किती उमेदवारांनी मका १३ रुपये १० पैसे आणि ज्वारी १५ रुपये ३० पैसे या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत असताना यावर आवाज उठवला? शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणी साधी तक्रार केली नाही, पण निवडणुकीसाठी मात्र शेकडो उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.