शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी बाजार समितीसाठी माणगंगा पॅटर्न?

By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST

१९ जागांसाठी १३८ अर्ज : देशमुख गटाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेला घवघवीत यश

अविनाश बाड - आटपाडी -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त १९ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ही निवडणूक ‘माणगंगा पॅटर्न’प्रमाणेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपबरोबरच शिवसेना आणि कॉँग्रेसच्या भूमिकेकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.याआधी दि. १६ मे २००८ रोजी बाजार समितीची निवडणूक झाली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनेक राजकीय गटांना संधी दिली. पण सततच्या पाठिंब्याच्या राजकारणामुळे आणि राजकीयदृष्ट्या सामंज्यस्याची भूमिका घेऊनही विधानसभा निवडणुकीत देशमुख गट एकाकी पडला. तेव्हापासून एकला चलो रे म्हणत देशमुख गट कोणत्याही राजकीय गटाशी तडजोड न करता निवडणुका लढवित आहे. त्यामध्ये या गटाला भरघोस यशही मिळताना दिसत आहे.ताकारी बाजार समितीपासून विभाजन होऊन खानापूर आणि खानापूर बाजार समितीचे विभाजन होऊन दि. २ नोव्हेंबर १९७२ रोजी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्याचे श्रेय बाजार समितीचे संस्थापक सभापती बाबासाहेब देशमुख यांचे. सध्या या संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चुरशीने अर्ज भरले आहेत.कॉँग्रेस वगळता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आ. अनिल बाबर यांनी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी ती निवडणूक झाली. आता या निवडणुकीत आ. बाबर काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजेंद्रअण्णांनी कोणत्याच गटाशी कसलीही तडजोड न करण्याचे धोरण या निवडणुकीत अवलंबिले आहे. बाजार समितीमध्ये विकास सोसायट्या मतदार संघासाठी ११ संचालकांच्या जागा आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या ११ संचालकांच्या जागांवर देशमुख गटाने प्रबळ दावा करणे साहजिक आहे. उर्वरित ग्रामपंचायत-४, व्यापारी-२, प्रक्रिया खरेदी-विक्री -१, हमाल -तोलाई- १ या जागांसाठी चुरस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या निवडणुकीत देशमुुख गटाला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना यांची युती होते की नाही आणि युती झाली तरी त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल हे स्पष्ट आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर हे सध्या तडजोड न करता निवडणुकींना सामोरे जात आहेत. निवडणुकांमध्ये जरी त्यांना अपेक्षित यश मिळत नसले तरी, या निवडणुका त्यांचे सच्चे कार्यकर्ते, समर्थक वाढविणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने कुणाशीही युती केली नाही तरी या दोघांमध्येच बाजार समितीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केले आहेत. राजकीय तडजोडीतून समितीचे उपसभापतीपद कॉँग्रेसच्या गणपत काटकर यांना देण्यात आले होते. त्यांची काय भूमिका राहणार का कुुणाशी युती करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.बाजार समिती कुणासाठी?शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, हा मुख्य उद्देश असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राजकारणी केवळ सत्तेचे एक केंद्र म्हणून पाहताना दिसत आहेत. चुरशीने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल करणाऱ्या किती उमेदवारांनी मका १३ रुपये १० पैसे आणि ज्वारी १५ रुपये ३० पैसे या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत असताना यावर आवाज उठवला? शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणी साधी तक्रार केली नाही, पण निवडणुकीसाठी मात्र शेकडो उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.