शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी बाजार समितीसाठी माणगंगा पॅटर्न?

By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST

१९ जागांसाठी १३८ अर्ज : देशमुख गटाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेला घवघवीत यश

अविनाश बाड - आटपाडी -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त १९ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ही निवडणूक ‘माणगंगा पॅटर्न’प्रमाणेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपबरोबरच शिवसेना आणि कॉँग्रेसच्या भूमिकेकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.याआधी दि. १६ मे २००८ रोजी बाजार समितीची निवडणूक झाली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनेक राजकीय गटांना संधी दिली. पण सततच्या पाठिंब्याच्या राजकारणामुळे आणि राजकीयदृष्ट्या सामंज्यस्याची भूमिका घेऊनही विधानसभा निवडणुकीत देशमुख गट एकाकी पडला. तेव्हापासून एकला चलो रे म्हणत देशमुख गट कोणत्याही राजकीय गटाशी तडजोड न करता निवडणुका लढवित आहे. त्यामध्ये या गटाला भरघोस यशही मिळताना दिसत आहे.ताकारी बाजार समितीपासून विभाजन होऊन खानापूर आणि खानापूर बाजार समितीचे विभाजन होऊन दि. २ नोव्हेंबर १९७२ रोजी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्याचे श्रेय बाजार समितीचे संस्थापक सभापती बाबासाहेब देशमुख यांचे. सध्या या संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चुरशीने अर्ज भरले आहेत.कॉँग्रेस वगळता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आ. अनिल बाबर यांनी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी ती निवडणूक झाली. आता या निवडणुकीत आ. बाबर काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजेंद्रअण्णांनी कोणत्याच गटाशी कसलीही तडजोड न करण्याचे धोरण या निवडणुकीत अवलंबिले आहे. बाजार समितीमध्ये विकास सोसायट्या मतदार संघासाठी ११ संचालकांच्या जागा आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या ११ संचालकांच्या जागांवर देशमुख गटाने प्रबळ दावा करणे साहजिक आहे. उर्वरित ग्रामपंचायत-४, व्यापारी-२, प्रक्रिया खरेदी-विक्री -१, हमाल -तोलाई- १ या जागांसाठी चुरस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या निवडणुकीत देशमुुख गटाला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना यांची युती होते की नाही आणि युती झाली तरी त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल हे स्पष्ट आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर हे सध्या तडजोड न करता निवडणुकींना सामोरे जात आहेत. निवडणुकांमध्ये जरी त्यांना अपेक्षित यश मिळत नसले तरी, या निवडणुका त्यांचे सच्चे कार्यकर्ते, समर्थक वाढविणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने कुणाशीही युती केली नाही तरी या दोघांमध्येच बाजार समितीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केले आहेत. राजकीय तडजोडीतून समितीचे उपसभापतीपद कॉँग्रेसच्या गणपत काटकर यांना देण्यात आले होते. त्यांची काय भूमिका राहणार का कुुणाशी युती करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.बाजार समिती कुणासाठी?शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, हा मुख्य उद्देश असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राजकारणी केवळ सत्तेचे एक केंद्र म्हणून पाहताना दिसत आहेत. चुरशीने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल करणाऱ्या किती उमेदवारांनी मका १३ रुपये १० पैसे आणि ज्वारी १५ रुपये ३० पैसे या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत असताना यावर आवाज उठवला? शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणी साधी तक्रार केली नाही, पण निवडणुकीसाठी मात्र शेकडो उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.