शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील घंटागाड्यांचा कारभार बेभरोशाचा; व्यवस्थापनाचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात दररोज २१० टन कचरा उठाव होते. पण हा कचरा उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्यापही अपुरी ...

सांगली : महापालिका क्षेत्रात दररोज २१० टन कचरा उठाव होते. पण हा कचरा उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्यापही अपुरी आहे. जवळपास ९६ वाहने या कामासाठी असली तरी उपनगरात मात्र दोन ते तीन दिवस नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे घंटागाड्यांचा कारभार बेभरोशाचा बनला आहे.

महापालिकेने कचरा उठाव करणाऱ्या वाहनांवर जीपीएसची यंत्रणा बसविली आहे. पण अनेक भागात रिक्षा घंटागाड्याच पोहोचत नसल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. २०१३ पासून महापालिकेने जीपीएसची यंत्रणा स्वीकारली. पण ती कितपत यशस्वी ठरली, याविषयी आजही साशंकता आहे. दररोजचा कचरा उचलण्यातही यंत्रणा कमी पडत आहे. आता नव्याने साडेअकरा कोटींची वाहने खरेदी केली जाणार आहेत. पण तरीही कचऱ्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता कमीच आहे.

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा

महापालिकेकडील जुन्या ट्रक व टिपर वगळता इतर वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात काॅम्पॅक्टर, रिक्षा घंटागाडीचा समावेश आहे.

या जीपीएस यंत्रणेवर सिस्टिम मॅनेजर, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकांचे नियंत्रण असते. वाहन थांबल्यास तातडीने ॲपवर अधिकाऱ्यांना संदेश मिळतो.

प्रक्रिया नाहीच, केवळ साठा

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात दररोज २१० टन कचरा जमा होतो. त्यापैकी १८० टन कचरा दररोज उचलला जातो. हा कचरा महापालिकेच्या समडोळी व बेडग रोडवरील डेपोवर नेऊन टाकला जातो. सध्या या दोन्ही डेपोवर जवळपास ४० लाख टन कचरा पडून आहे.

या कचऱ्यावर अद्याप प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. दररोजचा कचरा उचलायचा आणि डेपोवर नेऊन टाकायचा इतकेच काम सध्या महापालिकेकडून सुरू आहे.

महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे. लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय होईल. सध्या कचरा उचलण्यासाठी वाहनांची संख्या अपुरी आहे. त्यासाठीच नव्याने वाहने खरेदी केली जाणार आहे. त्याला महासभेनेही मान्यता दिली आहे. रिक्षा घंटागाड्या घरोघरी पोहोचाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नवीन वाहनखरेदीत रिक्षा घंटागाड्यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल

-डाॅ. रवींद्र ताटे, आरोग्य अधिकारी, महापालिका