शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

मालगावचे शेतकरी ‘म्हैसाळ’पासून वंचित

By admin | Updated: April 8, 2016 00:07 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कालवा फोडाफोडीच्या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये संघर्षाची शक्यता

अण्णा खोत -- मालगाव-मालगाव (ता. मिरज) येथे अडथळे पार करीत मोठ्या मुश्किलीने दाखल झालेले म्हैसाळ योजनेचे पाणी कालवा फोडाफोडीच्या विघ्नात सापडले आहे. मल्लेवाडी, एरंडोली व बेडग परिसरात कालवा फोडण्याचे प्रकार होत असल्याने मालगावमधील शेतकरी पाण्यापासून वंचित रहात आहे. नावाल गस्त व कालवा फोडीविरोधातील कारवाईकडे योजनेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे कालव्याच्या बांधावर शेतकऱ्यात मोठा संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पाणी वाटपाच्या नियोजनाबरोबर कालवा फोडीविरोधात कडक पाऊल न उचलल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.मालगावमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्रतिसादाने अंदाजे १५ लाख पाणीपट्टी जमा झाल्याने योजनेचे पाणी अनेक अडथळे पार करीत मालगावमध्ये दाखल झाले आहे. मात्र कालवा फोडाफोडीच्या विघ्नाने पाणी मालगावला येण्याऐवजी मल्लेवाडी, एरंडोली व बेडग परिसरात वाहू लागल्याने मालगावचे लाभधारक शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. कालव्यातून पाणी पुढे मालगावपर्यंत सरकत नसल्याने जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे तसेच ग्रामपंचायतीचे गटनेते प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली १०० शेतकऱ्यांनी बेडग रेल्वेस्टेशनपर्यंतच्या कालव्याची पाहणी केली. मल्लेवाडी, एरंडोली व बेडग येथे कालवे फोडल्याचे निदर्शनास आले. कालवे फोडले जात असल्याने मालगावला पाणी येत नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अधिकाऱ्यांनी गस्त सुरु असल्याचे सांगितले, मात्र गस्तीवर असणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांनी आपले कोणी ऐकतच नसल्याचे सांगत हात वर केले. मालगावच्या संतप्त शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने फोडलेले कालवे मुजवून मालगावकडे पाणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कालवा फोडण्याचे प्रकार सुरुच आहेत. मुख्य कालव्यात अगोदरच कमी दाबाने पाणी सोडण्यात आले आहे, अशात कालवा फोडीने मालगावचे शेतकरी संतप्त आहेत. कालवा फोडण्यावरुन शेतकऱ्यांत संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी न देण्याची भूमिका घेणारे अधिकारी लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे याबाबत उदासीन असल्यानेच गोंधळ निर्माण होत असल्याचा आरोप प्रदीप सावंत यांनी केला आहे. म्हैसाळ योजनेच्या पाणी मिळविण्यासाठी शेतकरी आक्रमक असल्याने अघटित घटना घडण्यापूर्वी कालवा फोडणाऱ्याविरोधात कडक पाऊल उचलून सुरळीत पाणी वाटपाचे नियोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना भुर्दंड : बड्या शेतकऱ्यांवर वॉचम्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरण्याकडे ४० पासून १०० एकरापर्यंतच्या बड्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नेहमीच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा पाणीपट्टीस प्रतिसाद असतो. बड्या शेतकऱ्यांना कडक उन्हाळ्यातही योजनेच्या पाण्याची गरज नाही का? ते पाण्याचा लाभच घेत नाहीत का? अशी शंका अल्पभूधारक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. बडे शेतकरी योजनेच्या पाण्याचा लाभ घेतात की नाही, यासाठी शेतकऱ्यांनीच वॉच ठेवला आहे.मालगाव परिसरातील शेतकऱ्यांतही म्हैसाळच्या पाण्यावरून कुरबुरी सुरूपाठीमागील गावातून कालवा फोडण्याचे प्रकार होत असल्याने मालगावात पाणी येणे व बंद होणे हा प्रकार सुरु असल्याने पाण्याअभावी द्राक्षासह इतर पिके धोक्यात आली. म्हैसाळच्या पाण्याने ही समस्या मिटणार असल्याने पाणी मिळविण्यावरुनही कुरबुरी सुरु आहे. मुख्य कालव्यात कमी दाबाने पाणी सोडल्याने समस्या वाढत आहेत. पाणी प्रवाह वाढविण्याची मागणी आहे.