शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

माळवाडीतील बाजार मैदानाची दुरवस्था

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

उद्घाटनाला सापडेना मुहूर्त : निष्काळजीपणामुळे ११ लाखांचा निधी वाया जाणार

शरद जाधव - भिलवडी -माळवाडी (ता. पलूस) येथे चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बाजार मैदानाच्या उद्घाटनाला मुहूर्तच सापडत नसल्याने बाजार मैदानाची दुरवस्था झाली आहे. माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या फंडातून खर्च करण्यात आलेला अकरा लाख रुपयांचा निधी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.चार वर्षापासून माळवाडीमध्ये दर बुधवारी आठवडी बाजार सुरु केला. आठवड्याच्या मध्यावर हा बाजार भरत आहे. यामुळे माळवाडीसह भिलवडी, धनगाव, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, चोपडेवाडी, सुखवाडी आदी परिसरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. सुरुवातीपासूनच हा बाजार माळवाडी बसस्थानकापासून ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या गावातील अंतर्गत रस्त्यांवर बाजार भरविला जातो. नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीने शिवाजीनगर येथील मैदानावर बाजार भरविण्याचे नियोजन केले.डॉ. कदम यांनी बाजार मैदानाच्या विकासासाठी ११ लाखांचा निधी तत्काळ मंजूर करुन दिला. त्यांच्याच हस्ते या कामाचा भूमिपूजन प्रारंभ होऊन गतीने सुरू झालेले काम पूर्णत्वास गेले. पण या ठिकाणी बाजार मैदानाच्या विकासाबरोबच दीडशेवर व्यापारी बसतील, असे बाजार कठडेही बांधण्यात आले.ग्रामसभेमध्ये या बाजार मैदानाला दोन महापुरुषांची नावे देण्यावरून बरेच वाद रंगले. केवळ चर्चाच झाल्या; पण बाजार भरविण्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांनाही याचे कोणतेच सोयरसुतक नाही.त्यामुळे सध्या या जागेचा वापर काहीजण जनावरे बांधण्यासाठी वाहने लावण्यासाठी, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी, तर महिला शेणी लावण्यासाठी करतात. या बाजारमैदानाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी लावलेली कोनशिलाही गायब करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावानियोजनशून्यतेच्या व इच्छाशक्तीचा अभाव असल्याने डॉ. कदम यांच्या प्रयत्नातून केलेल्या विकासकामाच्या निधीचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत आहे. माळवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नेतेमंडळींनी तात्काळ नव्या जागेत बाजार भरविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.या परिसरात मोठ्याप्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून, ठिक ठिकाणी झाडे-झुडपेही उगवली आहेत. भूमिपूजन समारंभप्रसंगी लावलेली कोनशिलाही गायब करण्यात आलेली आहे. येथील दुरवस्थेकडे ग्रामपंचायतीने लक्ष न दिल्यास शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.