शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलवाडीत महामार्गावर भुयारी मार्ग बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे काम सुरू आहे. परंतु, या मार्गावरील विठ्ठलवाडी परिसरात ग्रामस्थांच्या उड्डाणपूल अथवा ...

सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे काम सुरू आहे. परंतु, या मार्गावरील विठ्ठलवाडी परिसरात ग्रामस्थांच्या उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाच्या मागणी अर्जाला मात्र वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासन दरबारी रीतसर मागणी करूनही त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

विठ्ठलवाडीजवळ सुमारे १५ ते २० फूट भराव घालून रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे.

एकतर या रस्त्याच्या एका बाजूला गाव, शाळा, तर दुसऱ्या बाजूला या गावातील जवळजवळ ऐंशी टक्के शेती व वस्त्या आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठी वर्दळ असते. त्यामध्ये वृद्ध व शाळकरी मुलांचाही समावेश असतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांची जनावरेही या मार्गावरूनच न्यावी लागतात. त्यामुळे हा रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो, हे मोठे धोकादायक ठरत आहे. तेव्हा संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ या ठिकाणी भुयारी मार्गाची व्यवस्था करा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मल्लुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किसनराव टोणे यांनी दिला.

यावेळी रामचंद्र बजबळकर,जगन्नाथ धायगुडे, विष्णू टोणे, शहाजी घेरडे, तुकाराम टेंगले, अशोक टोणे, पांडुरंग बजबलकर, शहाजी टोणे, गोरख पवार, बाबू टोणे, आदी उपस्थित होते.