शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या अंतिम याद्या बनवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:03 IST

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय

ठळक मुद्देवारणावती येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची बैठकतेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल,

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय जमिनींचा आराखडा तयार करावा. यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

वारणावती (ता. शिराळा) येथील विश्रामगृहात शेतकºयांच्या प्रश्नावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यातील बैठकीत चर्चा करताना खासदार शेट्टी बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी राजू वडाम, सरपंच राजाराम मुटल, तानाजी वडाम यांनी सांगितले की, चांदोली अभयारण्यातील अधिकारी शेतकºयांवर अन्याय करतात, त्यांचा अतिरेक थांबला पाहिजे व अभयारण्याच्या हद्दी निश्चित करून चराऊ क्षेत्र सोडावे.त्यासंबंधी एका महिन्यात मोजणी करण्यात येईल असे वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. वन्य प्राणी शेतीचे नुकसान करतात. त्यासंबंधी अभयारण्यातील टाकळे, झोळंबी, सोनार्ली, निवळे, लोटीव या गावांच्या हद्दीतील शेकडो हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. तेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल, असेही अधिकाºयांनी सांगितले.

उखळू येथे शामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत गॅस कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यासंदर्भात कमिटीचे अध्यक्ष व सचिवांवर १५ दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण रक्कम वसूल करून शेतकºयांना दिली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेट बेन यांनी सांगितले.

यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी चंद्रशेखर सानप, वाळव्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पुनर्वसन अधिकारी स्वाती कुलकर्णी, शिराळा तहसीलदार दीपक शिंदे, प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी तानाजी मुळीक, सावळा पाटील, यांच्यासह उखळू, सोनवडे, मिरुखेवाडी, गुढे, करूंगली, काळुंद्रे, खिरवडे येथील शेतकरी उपस्थित होते.अभयारण्यात इतर ठिकाणचे प्राणी सोडू नकायावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकºयांच्या प्रश्नावर अधिकाºयांनी नरमाईचे धोरण घेऊन अन्याय थांबला पाहिजे. येथून पुढे अन्य ठिकाणांहून बिबट्या, वानरांचे कळप, कुत्री, मगरी असे कोणतेही प्राणी चांदोली अभयारण्यात सोडू नयेत.