शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या अंतिम याद्या बनवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:03 IST

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय

ठळक मुद्देवारणावती येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची बैठकतेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल,

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय जमिनींचा आराखडा तयार करावा. यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

वारणावती (ता. शिराळा) येथील विश्रामगृहात शेतकºयांच्या प्रश्नावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यातील बैठकीत चर्चा करताना खासदार शेट्टी बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी राजू वडाम, सरपंच राजाराम मुटल, तानाजी वडाम यांनी सांगितले की, चांदोली अभयारण्यातील अधिकारी शेतकºयांवर अन्याय करतात, त्यांचा अतिरेक थांबला पाहिजे व अभयारण्याच्या हद्दी निश्चित करून चराऊ क्षेत्र सोडावे.त्यासंबंधी एका महिन्यात मोजणी करण्यात येईल असे वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. वन्य प्राणी शेतीचे नुकसान करतात. त्यासंबंधी अभयारण्यातील टाकळे, झोळंबी, सोनार्ली, निवळे, लोटीव या गावांच्या हद्दीतील शेकडो हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. तेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल, असेही अधिकाºयांनी सांगितले.

उखळू येथे शामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत गॅस कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यासंदर्भात कमिटीचे अध्यक्ष व सचिवांवर १५ दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण रक्कम वसूल करून शेतकºयांना दिली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेट बेन यांनी सांगितले.

यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी चंद्रशेखर सानप, वाळव्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पुनर्वसन अधिकारी स्वाती कुलकर्णी, शिराळा तहसीलदार दीपक शिंदे, प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी तानाजी मुळीक, सावळा पाटील, यांच्यासह उखळू, सोनवडे, मिरुखेवाडी, गुढे, करूंगली, काळुंद्रे, खिरवडे येथील शेतकरी उपस्थित होते.अभयारण्यात इतर ठिकाणचे प्राणी सोडू नकायावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकºयांच्या प्रश्नावर अधिकाºयांनी नरमाईचे धोरण घेऊन अन्याय थांबला पाहिजे. येथून पुढे अन्य ठिकाणांहून बिबट्या, वानरांचे कळप, कुत्री, मगरी असे कोणतेही प्राणी चांदोली अभयारण्यात सोडू नयेत.