शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या अंतिम याद्या बनवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:03 IST

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय

ठळक मुद्देवारणावती येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची बैठकतेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल,

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय जमिनींचा आराखडा तयार करावा. यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

वारणावती (ता. शिराळा) येथील विश्रामगृहात शेतकºयांच्या प्रश्नावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यातील बैठकीत चर्चा करताना खासदार शेट्टी बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी राजू वडाम, सरपंच राजाराम मुटल, तानाजी वडाम यांनी सांगितले की, चांदोली अभयारण्यातील अधिकारी शेतकºयांवर अन्याय करतात, त्यांचा अतिरेक थांबला पाहिजे व अभयारण्याच्या हद्दी निश्चित करून चराऊ क्षेत्र सोडावे.त्यासंबंधी एका महिन्यात मोजणी करण्यात येईल असे वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. वन्य प्राणी शेतीचे नुकसान करतात. त्यासंबंधी अभयारण्यातील टाकळे, झोळंबी, सोनार्ली, निवळे, लोटीव या गावांच्या हद्दीतील शेकडो हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. तेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल, असेही अधिकाºयांनी सांगितले.

उखळू येथे शामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत गॅस कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यासंदर्भात कमिटीचे अध्यक्ष व सचिवांवर १५ दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण रक्कम वसूल करून शेतकºयांना दिली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेट बेन यांनी सांगितले.

यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी चंद्रशेखर सानप, वाळव्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पुनर्वसन अधिकारी स्वाती कुलकर्णी, शिराळा तहसीलदार दीपक शिंदे, प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी तानाजी मुळीक, सावळा पाटील, यांच्यासह उखळू, सोनवडे, मिरुखेवाडी, गुढे, करूंगली, काळुंद्रे, खिरवडे येथील शेतकरी उपस्थित होते.अभयारण्यात इतर ठिकाणचे प्राणी सोडू नकायावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकºयांच्या प्रश्नावर अधिकाºयांनी नरमाईचे धोरण घेऊन अन्याय थांबला पाहिजे. येथून पुढे अन्य ठिकाणांहून बिबट्या, वानरांचे कळप, कुत्री, मगरी असे कोणतेही प्राणी चांदोली अभयारण्यात सोडू नयेत.