शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

गटबाजी न थांबल्यास ‘मेजर आॅपरेशन’

By admin | Updated: July 4, 2017 00:01 IST

गटबाजी न थांबल्यास ‘मेजर आॅपरेशन’

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राष्ट्रवादी काँग्रेस एक कुटुंब आहे. कुटुंबात भांड्याला भांडे लागणारच. पण त्याचा आवाज कुठंपर्यंत होऊ द्यायचा, हेही लक्षात घेतले पाहिजे. पक्षाच्या मेळाव्यात स्वत:ची भूमिका मांडत असताना, बदनामी होणार नाही याची खबरदारी घ्या. पक्षातील गटबाजी थांबली नाही, तर ‘मेजर आॅपरेशन’ करू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी इशारा दिला. पवार यांनी सांगलीत राष्ट्रवादीतील गटबाजीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली. याचवेळी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविण्याचे संकेतही त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवारी सांगलीत आले होते. या मेळाव्यात पवार व तटकरे यांनी जिल्ह्यातील गटबाजीवर भाष्य करताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दम भरला. पवार म्हणाले की, एकमेकांवर टीका केल्याने पक्षाची बदनामी होत असते. त्यासाठी जाहीर मेळाव्यातून टीकाटिपणी टाळावी. तक्रारी असतील तर त्या प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घाला. पक्षांतर्गत वादावर एकत्र बसून तोडगा काढता येऊ शकतो. गेली पंधरा वर्षे सत्तेत असल्याने पक्षसंघटनेकडे लक्ष देता आले नाही. आता गाव, तालुका, जिल्हा, शहर कार्यकारिणी करा. प्रत्येक दोन महिन्यातून एकदा जिल्ह्याचा आढावा घ्या. पुढील महिन्यात खासदार सुप्रिया सुळे सांगली दौऱ्यावर येणार आहेत. तासगाव, कवठेमहांकाळसह काही तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दादागिरी केली जात आहे. दहशत पसरविली जात आहे. त्याविरोधात विधिमंडळात आम्ही आवाज उठवू. पक्षाची संघटना केवळ कागदावर नको. पक्षाच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या, तसेच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना प्रसंगी पदावरून दूर करा, असा सल्लाही पवार यांनी दिली. कोणी पक्षातून गेले म्हणजे पक्ष संपला, असे होत नाही. मग तो आटपाडी असो अथवा खानापूर तालुका असो. कार्यकर्त्यांनी काम करीत राहावे. शरद पवार यांच्यासारखा राष्ट्रीय विचार असलेला नेता केवळ राष्ट्रवादीकडे आहे. त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवा. नवीन कार्यकर्ते तयार करूया. त्यातून उद्याचे जिल्हा परिषद सदस्य, आमदार तयार होतील. सर्वसामान्य लोक राष्ट्रवादीसोबत आहेत. जनतेसाठी आपण काम करतो, हे कृतीतून दाखवून द्या, असा सल्ला त्यांनी दिला. शहरातील गटबाजीवर थेट हल्लामहापालिका क्षेत्रातील गटबाजीवर अजितदादांनी थेट हल्ला चढविला. शहरात एक, दोन, तीन, चार गट आहेत, असे सांगितले जाते. असला प्रकार यापुढे चालणार नाही. केवळ एकच गट असला पाहिजे, तोही राष्ट्रवादीचा. यापुढे पक्षाच्या प्रत्येक गोष्टीचा मी आढावा घेणार आहे. तुमच्या तक्रारी आम्ही ऐकून घेऊ. योग्य असेल तिथे दुरुस्तीही केली जाईल. पण एवढे करून तुमच्यात सुधारणा झाली नाही, तर पदावरून बाजूला करावे लागेल, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. सांगलीची दुरवस्थाजयंतरावांच्या ताब्यात महापालिकेची सत्ता असताना ५०० कोटींचा निधी खेचून आणला. आज शहराची काय अवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात गेले आहेत. भाजपला भरभरून देऊनही जनतेचे हाल सुरू आहेत. महापालिका निवडणुका वर्षभरावर आहेत. सांगलीकरांनी राष्ट्रवादीलाच साथ द्यावी, असे आवाहनही पवार, तटकरे यांनी केले. सत्तापिपासू लोक बाजूला गेलेराष्ट्रवादी कॉँग्रेसमधील काही नेतेमंडळी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये गेल्याचा उल्लेख करीत, प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, सत्तापिपासू लोक पक्षातून बाजूला गेले आहेत. पण जनता आजही राष्ट्रवादीसोबत आहे. इस्लामपुरात काहीजण जयंतरावांची उंची गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर तासगावातील खासदार दहशतीच्या जोरावर राजकारण करीत आहेत. पण अशा शक्तींना राष्ट्रवादी काय आहे, हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. जयंतरावांचे कसबआर. आर. आबांनंतर राज्याला जयंत पाटील यांची गरज आहे. सांगली सांभाळून त्यांनी राज्यातही लक्ष घालावे. दोन्हीकडे लक्ष देण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. कोणाची विकेट काढण्यासाठी ‘चायनामन’ पध्दतीने बॉल टाकायचा, हे त्यांना चांगलेच माहीत आहे. अगदी ‘नो बॉल’वरही ते दुसऱ्याला धावचित करू शकतात, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला.