शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.

सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सांगली, मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, इस्लामपूर येथे मध्यम स्वरुपाचा तर जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव परिसरात तुरळक सरी कोसळल्या. शिराळ्यात केवळ ढगांची दाटी होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामध्ये द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काहीठिकाणी मणी फुटून तर काही ठिकाणी बागा कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. येत्या दोन दिवसात नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.

तासगाव तालुक्यात सावळज येथे नितीन शिवाजी तारळेकर यांची एस.एस. एन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे ८ ते ९ लाखाचे, डोंगरसोनी येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोन्नाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून ८ ते १० लाखाचे, डोंगरसोनीचेच प्रकाश हंबीरराव पवार यांच्या दीड एकर बागेचे कोसळून दहा लाखाचे तर याच गावातील तुळशीराम हंकारे यांची १ एकर बाग कोसळून ७ लाखाचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यापासूनच शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली होती. यात काहींना काही प्रमाणात यश मिळाले, मात्र काहींना नुकसानीचा सामना करावा लागला.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी रात्रीही पावसाची चिन्हे असून शुक्रवारी ढगांची दाटी कायम राहणार आहे. वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. शनिवारी वातावरण अंशत: ढगाळ, तर रविवारी २१ फेब्रुवारीस आकाश निरभ्र होणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस शेतकऱ्यांसाठी काळजीचे दिवस राहणार आहेत.

चौकट

व्यापाऱ्यांनीही दर पाडले

द्राक्षबागायतदार संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यापासूनच व्यापाऱ्यांनी दर पाडण्यास सुरुवात केली होती. आता प्रत्यक्षात पावसाने द्राक्षबागांच्या नुकसानीच्या घटना समोर येत आहेत. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नाही, मात्र निश्चितपणे नुकसान झाले आहे.

चौकट

ज्वारीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्या पिकांची काढणी होऊन पीक आडवे केले आहे ती ज्वारी आता भिजून काळी पडण्याची चिन्हे आहेत.

फोटो आहेत..