शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.

सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सांगली, मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, इस्लामपूर येथे मध्यम स्वरुपाचा तर जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव परिसरात तुरळक सरी कोसळल्या. शिराळ्यात केवळ ढगांची दाटी होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामध्ये द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काहीठिकाणी मणी फुटून तर काही ठिकाणी बागा कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. येत्या दोन दिवसात नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.

तासगाव तालुक्यात सावळज येथे नितीन शिवाजी तारळेकर यांची एस.एस. एन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे ८ ते ९ लाखाचे, डोंगरसोनी येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोन्नाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून ८ ते १० लाखाचे, डोंगरसोनीचेच प्रकाश हंबीरराव पवार यांच्या दीड एकर बागेचे कोसळून दहा लाखाचे तर याच गावातील तुळशीराम हंकारे यांची १ एकर बाग कोसळून ७ लाखाचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यापासूनच शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली होती. यात काहींना काही प्रमाणात यश मिळाले, मात्र काहींना नुकसानीचा सामना करावा लागला.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी रात्रीही पावसाची चिन्हे असून शुक्रवारी ढगांची दाटी कायम राहणार आहे. वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. शनिवारी वातावरण अंशत: ढगाळ, तर रविवारी २१ फेब्रुवारीस आकाश निरभ्र होणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस शेतकऱ्यांसाठी काळजीचे दिवस राहणार आहेत.

चौकट

व्यापाऱ्यांनीही दर पाडले

द्राक्षबागायतदार संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यापासूनच व्यापाऱ्यांनी दर पाडण्यास सुरुवात केली होती. आता प्रत्यक्षात पावसाने द्राक्षबागांच्या नुकसानीच्या घटना समोर येत आहेत. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नाही, मात्र निश्चितपणे नुकसान झाले आहे.

चौकट

ज्वारीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्या पिकांची काढणी होऊन पीक आडवे केले आहे ती ज्वारी आता भिजून काळी पडण्याची चिन्हे आहेत.

फोटो आहेत..