शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैैसाळ’ची थकबाकी 45 कोटीवर

By admin | Updated: May 22, 2017 20:31 IST

म्हैसाळ योजनेसाठी १७ जानेवारीपासून सुमारे साडेसहा टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या आवर्तनाचे विजेचे १३ कोटी रूपये थकीत बिल

ऑनलाइन लोकमत
मिरज(सांगली)दि. 22 - म्हैसाळ योजनेसाठी १७ जानेवारीपासून सुमारे साडेसहा टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या आवर्तनाचे विजेचे १३ कोटी रूपये थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने वीज खंडित केल्याने चार तालुक्यातील शेतक-यांना फटका बसला आहे. म्हैसाळ योजना सुरू राहण्यासाठी नेहमीच टंचाई निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या योजनेचे विजेचे बिल २१ कोटी व पाणीपट्टी ४५ कोटीवर पोहोचल्याने, वसुलीसाठी शेतक-यांच्या सात-बारावर कर्जाची नोंद करण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने डिसेंबरपासून ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्याची मागणी होती. मात्र लाभार्थी शेतकºयांनी रक्कम जमा केली नसल्याने आवर्तन सुरू झाले नाही. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतक-यांनी ३० लाख रूपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. गतवर्षी सोडण्यात आलेल्या पाण्याचे वीज बिल २१ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. म्हैसाळच्या आवर्तनासाठी थकीत वीज बिलासाठी लाभक्षेत्रात गावनिहाय पाणीपट्टी वसुलीसाठीच्या मोहिमेस प्रतिसाद मिळाला नसल्याने आवर्तन रखडले. यावर्षी लाभक्षेत्रातील कारखान्यांकडून पाणीपट्टी जमा करण्यास प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदार नाराज होऊ नयेत, यासाठी आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाला. यासाठी जानेवारीत टंचाई निधीतून शासनाकडून ४ कोटी रूपये उपलब्ध करून ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यानंतर थकीत वीज बिलाच्या उर्वरित २१ कोटी थकबाकीपोटी दरमहा शेतक-यांकडून वसूल करून पाच कोटी रूपये भरण्याची मागणी महावितरणने
केली होती. मात्र जिल्हा परिषद निवडणुका पार पडेपर्यंत ‘म्हैसाळ’च्या वीज बिलाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाने ८ कोटी रूपये जमा केले. जानेवारीपासून सुरू असलेल्या चार महिन्यांच्या आवर्तनाचे सुमारे १३ कोटी वीज बिल व पूर्वीची थकबाकी, अशा सुमारे २१ कोटी वीज बिलाच्या मागणीसाठी महावितरणने दि. २० रोजी वीज तोडली आहे. शेतक-यांकडून केवळ अडीच कोटी पाणीपट्टी जमा झाली असल्याने आवर्तन बंद झाले आहे.
मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असताना, म्हैसाळ योजनेचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यातील शेतकºयांना फटका बसला आहे. योजनेची थकबाकी वाढल्याने पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. योजना बंद पडल्याने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू होणार असून, यापूर्वी २०१० पर्यंतची पाणीपट्टी थकबाकी शेतक-यांच्या सात-बारावर नोंद झाली आहे. २०१६ पर्यंतची पाणीपट्टीची थकबाकी शेतकºयांच्या सात-बारावर नोंद होण्याची शक्यता आहे.