शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

‘म्हैैसाळ’ची थकबाकी 45 कोटीवर

By admin | Updated: May 22, 2017 20:31 IST

म्हैसाळ योजनेसाठी १७ जानेवारीपासून सुमारे साडेसहा टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या आवर्तनाचे विजेचे १३ कोटी रूपये थकीत बिल

ऑनलाइन लोकमत
मिरज(सांगली)दि. 22 - म्हैसाळ योजनेसाठी १७ जानेवारीपासून सुमारे साडेसहा टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या आवर्तनाचे विजेचे १३ कोटी रूपये थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने वीज खंडित केल्याने चार तालुक्यातील शेतक-यांना फटका बसला आहे. म्हैसाळ योजना सुरू राहण्यासाठी नेहमीच टंचाई निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या योजनेचे विजेचे बिल २१ कोटी व पाणीपट्टी ४५ कोटीवर पोहोचल्याने, वसुलीसाठी शेतक-यांच्या सात-बारावर कर्जाची नोंद करण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने डिसेंबरपासून ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्याची मागणी होती. मात्र लाभार्थी शेतकºयांनी रक्कम जमा केली नसल्याने आवर्तन सुरू झाले नाही. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतक-यांनी ३० लाख रूपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. गतवर्षी सोडण्यात आलेल्या पाण्याचे वीज बिल २१ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. म्हैसाळच्या आवर्तनासाठी थकीत वीज बिलासाठी लाभक्षेत्रात गावनिहाय पाणीपट्टी वसुलीसाठीच्या मोहिमेस प्रतिसाद मिळाला नसल्याने आवर्तन रखडले. यावर्षी लाभक्षेत्रातील कारखान्यांकडून पाणीपट्टी जमा करण्यास प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदार नाराज होऊ नयेत, यासाठी आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाला. यासाठी जानेवारीत टंचाई निधीतून शासनाकडून ४ कोटी रूपये उपलब्ध करून ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यानंतर थकीत वीज बिलाच्या उर्वरित २१ कोटी थकबाकीपोटी दरमहा शेतक-यांकडून वसूल करून पाच कोटी रूपये भरण्याची मागणी महावितरणने
केली होती. मात्र जिल्हा परिषद निवडणुका पार पडेपर्यंत ‘म्हैसाळ’च्या वीज बिलाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाने ८ कोटी रूपये जमा केले. जानेवारीपासून सुरू असलेल्या चार महिन्यांच्या आवर्तनाचे सुमारे १३ कोटी वीज बिल व पूर्वीची थकबाकी, अशा सुमारे २१ कोटी वीज बिलाच्या मागणीसाठी महावितरणने दि. २० रोजी वीज तोडली आहे. शेतक-यांकडून केवळ अडीच कोटी पाणीपट्टी जमा झाली असल्याने आवर्तन बंद झाले आहे.
मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असताना, म्हैसाळ योजनेचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यातील शेतकºयांना फटका बसला आहे. योजनेची थकबाकी वाढल्याने पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. योजना बंद पडल्याने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू होणार असून, यापूर्वी २०१० पर्यंतची पाणीपट्टी थकबाकी शेतक-यांच्या सात-बारावर नोंद झाली आहे. २०१६ पर्यंतची पाणीपट्टीची थकबाकी शेतकºयांच्या सात-बारावर नोंद होण्याची शक्यता आहे.