शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
3
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
4
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
5
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
6
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
7
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
8
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
9
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
10
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
11
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
13
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
14
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
15
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
16
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
17
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
18
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
19
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
20
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यामध्ये महाविकास आघाडी, जतमध्ये बिघाडी कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र ...

सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र राष्ट्रवादीची काँग्रेसपेक्षा भाजपशीच जास्त मैत्री कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार यांनी केला. जतमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे, असेही ते म्हणाले.

जतमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमधील संघर्षाबाबत भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारी सांगलीत काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिरादार बोलत होते. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, नीलेश बामणे, भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, बाळ निकम, महादेव कोळी, इराण्णा निडोणी उपस्थित होते.

बिरादार म्हणाले, भाजपशी सगळीकडे दोन हात करत राज्य चालवले जात आहे. अशा स्थितीत जतची राष्ट्रवादी भाजपशी समझोता करत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे आदेश असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या विरोधात काम केले, तरीही सावंत ३५ हजार मतांनी विजयी झाले. जत नगरपालिका काँग्रेसकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा होऊन उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे आणि विषय समित्यांत समान जागा वाटप केले. हे सारे सुरळीत चालू शकले असते. मात्र, राष्ट्रवादीने आमदार सावंत यांच्या द्वेषातून टीका करणे सुरू केले आहे. नगरपालिकेची कामे आम्ही मंजूर करतो, त्याचे उद्‍घाटन मात्र राष्ट्रवादीचे लोक भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना घेऊन करत आहेत. जयंत पाटील यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत. आ. सावंत कर्नाटकातून पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जतच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यांनी जतमधील राष्ट्रवादीचा प्रश्‍नही मार्गी लावायला हवा. त्यांनी या नेत्यांना सूचना द्यावी.

चौकट

काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्जच

जतमध्ये काँग्रेस पक्ष विकासकामांमुळे वाढला आहे. सर्वसामान्यांची कामेही केली आहेत. यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी प्रामाणिकपणे सोबत आली तर ठीकच आहे, नाही तर स्वबळावर लढण्यास काँग्रेस सज्ज आहे, असा इशाराही बिरादार यांनी दिला.