शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

राज्यामध्ये महाविकास आघाडी, जतमध्ये बिघाडी कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र ...

सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र राष्ट्रवादीची काँग्रेसपेक्षा भाजपशीच जास्त मैत्री कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार यांनी केला. जतमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे, असेही ते म्हणाले.

जतमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमधील संघर्षाबाबत भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारी सांगलीत काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिरादार बोलत होते. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, नीलेश बामणे, भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, बाळ निकम, महादेव कोळी, इराण्णा निडोणी उपस्थित होते.

बिरादार म्हणाले, भाजपशी सगळीकडे दोन हात करत राज्य चालवले जात आहे. अशा स्थितीत जतची राष्ट्रवादी भाजपशी समझोता करत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे आदेश असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या विरोधात काम केले, तरीही सावंत ३५ हजार मतांनी विजयी झाले. जत नगरपालिका काँग्रेसकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा होऊन उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे आणि विषय समित्यांत समान जागा वाटप केले. हे सारे सुरळीत चालू शकले असते. मात्र, राष्ट्रवादीने आमदार सावंत यांच्या द्वेषातून टीका करणे सुरू केले आहे. नगरपालिकेची कामे आम्ही मंजूर करतो, त्याचे उद्‍घाटन मात्र राष्ट्रवादीचे लोक भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना घेऊन करत आहेत. जयंत पाटील यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत. आ. सावंत कर्नाटकातून पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जतच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यांनी जतमधील राष्ट्रवादीचा प्रश्‍नही मार्गी लावायला हवा. त्यांनी या नेत्यांना सूचना द्यावी.

चौकट

काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्जच

जतमध्ये काँग्रेस पक्ष विकासकामांमुळे वाढला आहे. सर्वसामान्यांची कामेही केली आहेत. यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी प्रामाणिकपणे सोबत आली तर ठीकच आहे, नाही तर स्वबळावर लढण्यास काँग्रेस सज्ज आहे, असा इशाराही बिरादार यांनी दिला.