शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

राज्यामध्ये महाविकास आघाडी, जतमध्ये बिघाडी कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र ...

सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र राष्ट्रवादीची काँग्रेसपेक्षा भाजपशीच जास्त मैत्री कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार यांनी केला. जतमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे, असेही ते म्हणाले.

जतमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमधील संघर्षाबाबत भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारी सांगलीत काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिरादार बोलत होते. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, नीलेश बामणे, भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, बाळ निकम, महादेव कोळी, इराण्णा निडोणी उपस्थित होते.

बिरादार म्हणाले, भाजपशी सगळीकडे दोन हात करत राज्य चालवले जात आहे. अशा स्थितीत जतची राष्ट्रवादी भाजपशी समझोता करत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे आदेश असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या विरोधात काम केले, तरीही सावंत ३५ हजार मतांनी विजयी झाले. जत नगरपालिका काँग्रेसकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा होऊन उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे आणि विषय समित्यांत समान जागा वाटप केले. हे सारे सुरळीत चालू शकले असते. मात्र, राष्ट्रवादीने आमदार सावंत यांच्या द्वेषातून टीका करणे सुरू केले आहे. नगरपालिकेची कामे आम्ही मंजूर करतो, त्याचे उद्‍घाटन मात्र राष्ट्रवादीचे लोक भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना घेऊन करत आहेत. जयंत पाटील यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत. आ. सावंत कर्नाटकातून पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जतच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यांनी जतमधील राष्ट्रवादीचा प्रश्‍नही मार्गी लावायला हवा. त्यांनी या नेत्यांना सूचना द्यावी.

चौकट

काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्जच

जतमध्ये काँग्रेस पक्ष विकासकामांमुळे वाढला आहे. सर्वसामान्यांची कामेही केली आहेत. यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी प्रामाणिकपणे सोबत आली तर ठीकच आहे, नाही तर स्वबळावर लढण्यास काँग्रेस सज्ज आहे, असा इशाराही बिरादार यांनी दिला.