शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

महाराष्ट्राचे प्रभावशाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील एक उमदे व प्रभावशाली, तरुण, अफाट महत्त्वकांक्षा सामावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जयंत ...

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील एक उमदे व प्रभावशाली, तरुण, अफाट महत्त्वकांक्षा सामावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जयंत पाटील. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय व सहकार क्षेत्राच्या क्षितिजावरील आदरणीय व्यक्तिमत्त्व, सहकारमहर्षी राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव. संयमी, हुशार व तितकेच मिश्कील जयंतराव पाटीलसाहेबांचा जन्म मुळातच लोकसेवा व जनसेवेसाठी झाला. बापूंनी जे कार्य उभे केले, ते ताकदीने सांभाळताना लोकनेता म्हणून असलेल्या बापूंच्या ओळखीला कुठेही धक्का लागणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. बापूंच्या कार्याचा वारसा चालविताना सर्वसामान्यांना समोर ठेवून, त्यांनी सुख-दु:खे जाणून घेत आपली माणसं जाेडत युवा वयातच त्यांनी लोकचळवळ उभी केली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिक यांना बापूंची कमतरता जराही भासू न देता जयंतराव पाटील युवावयातच सर्वसामान्यांचे नेते झाले. त्यानंतर त्यांनी आजवर कधीही मागे वळून पाहिले नाही. एवढे मोठे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातील जनता त्यांच्या रूपाने आज अभिमानाने पहात आहे.

सामान्य माणूस हा जयंतराव पाटील यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. आजवर आदरणीय बापूंनी उभ्या केलेल्या सहकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, समाजसेवी, क्रीडा आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या संस्था आज जयंतराव पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाने बहरल्या आणि विस्तारल्या आहेत.

जयंतराव पाटील स्वत: उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या उच्चशिक्षणाचा उपयोग महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या कामकाजात वेळोवेळी दिसून आला आहे. राज्याचा अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री पद त्यांनी उत्तम सांभाळले. नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून महाराष्ट्र राज्य आर्थिक विकासात अग्रेसर ठेवले. आता जलसंपदा विभागाची मोठी जबाबदारी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे.

मुळातच कर्मवीरांच्या व क्रांतिकारकांच्या भूमीतून जी नवरत्ने जन्माला आली. त्या महान नेत्यांची विचारधारा जपणारा नेता तसेच आदरणीय पवारसाहेबांचा विश्वासू सहकारी म्हणून जयंतराव पाटील यांची ओळख आहे. दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा नेता, कार्यकर्त्यांना सांभाळत पक्ष संघटना मजबूत करणारा नेता म्हणून त्यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी लीलया पेलली आहे.

जयंत पाटील यांचा प्रत्येक गुण या मातीच्या गुणातून विकसित झाला आहे. आजच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय साधून विरोधकांना मिश्कीलपणे चिमटे काढीत वातावरणात हास्य पसरविणारे नेते ही त्यांची आणखी एक मोठी ओळख... आपले पाय कायम जमिनीवर ठेवून मातीतील माणसांना जोडणारे नेते म्हणजे जयंतराव पाटील. कोणतेही क्षेत्र असो, समोरच्या माणसाला आनंद देणारे नेते म्हणून तळागाळातील तरुणाई, शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांना जयंतराव पाटील यांचे नेतृत्व भावले आहे. आगामी कालखंडात त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची संधी मिळो, या सदिच्छा।।

- शशिकांत शिंदे. आमदार

प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस