शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

केंद्राचे वादग्रस्त कृषी कायदे महाराष्ट्राने स्वीकारु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांमध्ये किरकोळ बदल करुन महाराष्ट्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. ही गंभीर ...

सांगली : केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांमध्ये किरकोळ बदल करुन महाराष्ट्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. ही गंभीर बाब असून, ते तिन्ही कृषी कायदे जनतेसमोर ठेवून चर्चेनंतरच त्यांची अमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने मागील लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे कुणाशीही चर्चा न करता मंजूर केले. याविरोधात तीव्र आंदोलने शेतकऱ्यांची सुरु आहेत. तरीही केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार नाही. केंद्र सरकारशी शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या कायद्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना, महाराष्ट्र सरकार विवादित केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे? असा प्रश्न देशमुख यांनी केला. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अमलबजावणी झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.