शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

केंद्राचे वादग्रस्त कृषी कायदे महाराष्ट्राने स्वीकारु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांमध्ये किरकोळ बदल करुन महाराष्ट्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. ही गंभीर ...

सांगली : केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांमध्ये किरकोळ बदल करुन महाराष्ट्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. ही गंभीर बाब असून, ते तिन्ही कृषी कायदे जनतेसमोर ठेवून चर्चेनंतरच त्यांची अमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने मागील लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे कुणाशीही चर्चा न करता मंजूर केले. याविरोधात तीव्र आंदोलने शेतकऱ्यांची सुरु आहेत. तरीही केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार नाही. केंद्र सरकारशी शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या कायद्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना, महाराष्ट्र सरकार विवादित केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे? असा प्रश्न देशमुख यांनी केला. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अमलबजावणी झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.