शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

जिल्ह्यातील महापुराचा विळखा होतोय सैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर ...

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर वाघमारे, सुरेंद्र दुपटे )

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचा विळखा आता सैल होत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी चोवीस तासात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत साडे तीन फुटांनी घट झाली आहे. महापूर ओसरत असल्याने पाचही तालुक्यांतील अनेक रस्ते, पूल व नागरी वस्त्या पाण्यातून मुक्त होत आहेत.

जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांमध्ये कृष्णा व वारणा नद्यांच्या महापुराने हजारो नागरिकांना ग्रासले आहे. पुरामुळे दोन लाखांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी ओसरत असतानाही अद्याप स्थलांतराचे काम सुरुच आहे.

धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ३२ हजार ७४९ तर वारणा धरणातून १७ हजार ४४० क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टीतूनही ३ लाख क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने नदीपात्रातील पाणी आता ओसरत आहे. येत्या दोन दिवसात महापूर ओसरुन जनजीवन पूर्वपदावर येण्याचा अंदाज आहे. महापूर ओसरण्याची गती वाढण्याची प्रतीक्षा नदीकाठच्या नागरिकांना व प्रशासनाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सध्या पाणी पातळीकडे लागले आहे.

सांगलीत रविवारी सायंकाळी सहा वाजता वाजता ५४.५ फूट इतकी कृष्णा नदीची पाणीपातळी होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ती ५१.१० फुटापर्यंत खाली आली. सांगलीप्रमाणेच बहे, ताकारी, भिलवडी, अंकली, म्हैसाळ याठिकाणच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. सांगलीत दुपारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. याशिवाय जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडिप होती. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊसही कमी झाला आहे.

चौकट

सांगलीतील बचावकार्य सुरुच

सांगली शहरात सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरु होते. अजूनही महापुरात अनेक लोक अडकले आहेत. महापूर ओसरत असला तरी पुरामुळे वीज व पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना आहेत त्या घरांमध्ये राहणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे लोक बाहेर पडत आहेत.

चौकट

शहरातील हे भाग झाले रिकामे

स्टेशन चौक, आमराई परिसरातील महापुराचे पाणी ओसरले असून बायपास रस्ता, रतनशीनगर तसेच कोल्हापूर रोडवरील महापुराचे पाणी काही फुटांनी कमी झाले आहे.

मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संपर्कासाठी अडचणी आल्या. पुरात अडकलेल्या लोकांना बचाव पथकांना संपर्क साधता येत नव्हता. प्रशासकीय समन्वयातही त्यामुळे अडचणी आल्या.

चौकट

शहरात टँकरने पाणी पुरवठा

सांगलीतील जॅकवेल पाण्यात बुडाल्याने शहराचा पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. महापालिकेने अनेक भागात सोमवारी टँकरने पाणी पुरवठा केला.