शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्ह्यातील महापुराचा विळखा होतोय सैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर ...

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर वाघमारे, सुरेंद्र दुपटे )

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचा विळखा आता सैल होत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी चोवीस तासात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत साडे तीन फुटांनी घट झाली आहे. महापूर ओसरत असल्याने पाचही तालुक्यांतील अनेक रस्ते, पूल व नागरी वस्त्या पाण्यातून मुक्त होत आहेत.

जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांमध्ये कृष्णा व वारणा नद्यांच्या महापुराने हजारो नागरिकांना ग्रासले आहे. पुरामुळे दोन लाखांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी ओसरत असतानाही अद्याप स्थलांतराचे काम सुरुच आहे.

धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ३२ हजार ७४९ तर वारणा धरणातून १७ हजार ४४० क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टीतूनही ३ लाख क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने नदीपात्रातील पाणी आता ओसरत आहे. येत्या दोन दिवसात महापूर ओसरुन जनजीवन पूर्वपदावर येण्याचा अंदाज आहे. महापूर ओसरण्याची गती वाढण्याची प्रतीक्षा नदीकाठच्या नागरिकांना व प्रशासनाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सध्या पाणी पातळीकडे लागले आहे.

सांगलीत रविवारी सायंकाळी सहा वाजता वाजता ५४.५ फूट इतकी कृष्णा नदीची पाणीपातळी होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ती ५१.१० फुटापर्यंत खाली आली. सांगलीप्रमाणेच बहे, ताकारी, भिलवडी, अंकली, म्हैसाळ याठिकाणच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. सांगलीत दुपारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. याशिवाय जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडिप होती. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊसही कमी झाला आहे.

चौकट

सांगलीतील बचावकार्य सुरुच

सांगली शहरात सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरु होते. अजूनही महापुरात अनेक लोक अडकले आहेत. महापूर ओसरत असला तरी पुरामुळे वीज व पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना आहेत त्या घरांमध्ये राहणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे लोक बाहेर पडत आहेत.

चौकट

शहरातील हे भाग झाले रिकामे

स्टेशन चौक, आमराई परिसरातील महापुराचे पाणी ओसरले असून बायपास रस्ता, रतनशीनगर तसेच कोल्हापूर रोडवरील महापुराचे पाणी काही फुटांनी कमी झाले आहे.

मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संपर्कासाठी अडचणी आल्या. पुरात अडकलेल्या लोकांना बचाव पथकांना संपर्क साधता येत नव्हता. प्रशासकीय समन्वयातही त्यामुळे अडचणी आल्या.

चौकट

शहरात टँकरने पाणी पुरवठा

सांगलीतील जॅकवेल पाण्यात बुडाल्याने शहराचा पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. महापालिकेने अनेक भागात सोमवारी टँकरने पाणी पुरवठा केला.