शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यातील महापुराचा विळखा होतोय सैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर ...

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर वाघमारे, सुरेंद्र दुपटे )

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचा विळखा आता सैल होत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी चोवीस तासात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत साडे तीन फुटांनी घट झाली आहे. महापूर ओसरत असल्याने पाचही तालुक्यांतील अनेक रस्ते, पूल व नागरी वस्त्या पाण्यातून मुक्त होत आहेत.

जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांमध्ये कृष्णा व वारणा नद्यांच्या महापुराने हजारो नागरिकांना ग्रासले आहे. पुरामुळे दोन लाखांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी ओसरत असतानाही अद्याप स्थलांतराचे काम सुरुच आहे.

धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ३२ हजार ७४९ तर वारणा धरणातून १७ हजार ४४० क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टीतूनही ३ लाख क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने नदीपात्रातील पाणी आता ओसरत आहे. येत्या दोन दिवसात महापूर ओसरुन जनजीवन पूर्वपदावर येण्याचा अंदाज आहे. महापूर ओसरण्याची गती वाढण्याची प्रतीक्षा नदीकाठच्या नागरिकांना व प्रशासनाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सध्या पाणी पातळीकडे लागले आहे.

सांगलीत रविवारी सायंकाळी सहा वाजता वाजता ५४.५ फूट इतकी कृष्णा नदीची पाणीपातळी होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ती ५१.१० फुटापर्यंत खाली आली. सांगलीप्रमाणेच बहे, ताकारी, भिलवडी, अंकली, म्हैसाळ याठिकाणच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. सांगलीत दुपारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. याशिवाय जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडिप होती. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊसही कमी झाला आहे.

चौकट

सांगलीतील बचावकार्य सुरुच

सांगली शहरात सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरु होते. अजूनही महापुरात अनेक लोक अडकले आहेत. महापूर ओसरत असला तरी पुरामुळे वीज व पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना आहेत त्या घरांमध्ये राहणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे लोक बाहेर पडत आहेत.

चौकट

शहरातील हे भाग झाले रिकामे

स्टेशन चौक, आमराई परिसरातील महापुराचे पाणी ओसरले असून बायपास रस्ता, रतनशीनगर तसेच कोल्हापूर रोडवरील महापुराचे पाणी काही फुटांनी कमी झाले आहे.

मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संपर्कासाठी अडचणी आल्या. पुरात अडकलेल्या लोकांना बचाव पथकांना संपर्क साधता येत नव्हता. प्रशासकीय समन्वयातही त्यामुळे अडचणी आल्या.

चौकट

शहरात टँकरने पाणी पुरवठा

सांगलीतील जॅकवेल पाण्यात बुडाल्याने शहराचा पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. महापालिकेने अनेक भागात सोमवारी टँकरने पाणी पुरवठा केला.