शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : विधानसभेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची गाडी ग्रामपंचायत निवडणुकीत रुतली. स्थानिक राजकारणापुढे तिन्ही पक्षांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विधानसभेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची गाडी ग्रामपंचायत निवडणुकीत रुतली. स्थानिक राजकारणापुढे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी हात टेकल्याने हा प्रयोग ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ शकला नाही.

जिल्ह्यात सध्या १५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले, मात्र स्थानिक पातळीवरील हेवेदावे, राजकारण यापुढे नेत्यांचा निभाव लागला नाही.

जिल्ह्यातील आजवरचा अनुभव असाच आहे. पक्षीय स्तरावर या निवडणुका होत नाहीत. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कोणत्या नेत्याच्या प्रभावाखाली सत्ता आली आणि तो नेता कोणत्या पक्षाच आहे, त्यावर ग्रामपंचायतींमधील बलाबल ठरविले जाते. प्रत्येक तालुक्यात हे चित्र वेगवेगळे आहे. काहीठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्र लढतात, तर काहीठिकाणी जमेल तशी सोयीने युती करुन पॅनेल अस्तित्वात येत असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्तेच याबाबतचा निर्णय घेत असतात. बऱ्याचदा जिल्हास्तरावरील नेतेही त्यांच्या सुरात सूर मिसळून शांत राहणे पसंत करतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल सुरुवातीपासूनच साशंकता व्यक्त केली जात होती. काहीठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी बहुतांश ठिकाणी तो फसला आहे. एखाद्या गावात राष्ट्रवादीची ताकद असेल तर तो आघाडीतील अन्य तो पक्षांना सोबत घेण्यास तयार होत नाही. असे चित्र सर्वत्र दिसून येते.

चौकट

निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढत असले तरी निकालानंतर सत्ता स्थापन करताना गरज पडल्यास हे पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यामुळे असा प्रयोग किती ठिकाणी यशस्वी झाला, याचे चित्र समोर येऊ शकेल. काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी एखाद्या गटाची गरज पडली तर त्याठिकाणी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाला ते सोबत घेऊ शकतील.

चौकट

निकालानंतर चित्र बदलले

सध्या प्रत्येक पक्ष ताकदीने निवडणूक लढवित आहे. निकालानंतर सत्तास्थापनेवेळी चित्र पूर्ण बदलणार आहे. काहीठिकाणी सत्तांतर होईल, काहीठिकाणी सत्ता अबाधित राहिल, तर काहीठिकाणी सत्तेची समीकरणे बदलतील. महाविकास आघाडी काहीठिकाणी स्वतंत्र लढून सत्तेत येईल तर काहीठिकाणी त्यांच्यात फुटही पडेल, असे चित्र दिसते.

कोट

सर्वचठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला नाही. काहीठिकाणी आघाडी झाली आहे. यासाठी आम्ही प्रयत्न केले. गावपातळीवरच्या निवडणुका या पॅनेलच्या माध्यमातून लढल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा त्या पक्षविरहित होतात.

- अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

कोट

गावपातळीवरही महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी व्हायला हवा. गावपातळीवरच्या राजकारणावर तालुक्याचे व पर्यायाने जिल्ह्याचे राजकारण अवलंबून असते. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढताना या एकसंध आघाडीमुळे समन्वय राखून यश मिळवता येते.

- आ. मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

कोट

ज्याठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे शिवसेनेला डावलले गेले. शिवसेनेचे पारडे जड होऊ नये याची दक्षता अनेकठिकाणी मित्रपक्षांनी घेतली. त्यामुळे प्रयोग यशस्वी झाला नाही. शिवसेनेची ताकद त्यांनी ओळखली नाही. बिनविरोध झालेल्या ११ पैकी ५ ग्रामपंचायती आमच्या आहेत.

- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना