शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
8
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
9
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
10
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
11
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
12
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
13
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
14
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
15
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
16
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
17
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
18
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
19
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
20
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात

महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : विधानसभेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची गाडी ग्रामपंचायत निवडणुकीत रुतली. स्थानिक राजकारणापुढे तिन्ही पक्षांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विधानसभेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची गाडी ग्रामपंचायत निवडणुकीत रुतली. स्थानिक राजकारणापुढे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी हात टेकल्याने हा प्रयोग ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ शकला नाही.

जिल्ह्यात सध्या १५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले, मात्र स्थानिक पातळीवरील हेवेदावे, राजकारण यापुढे नेत्यांचा निभाव लागला नाही.

जिल्ह्यातील आजवरचा अनुभव असाच आहे. पक्षीय स्तरावर या निवडणुका होत नाहीत. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कोणत्या नेत्याच्या प्रभावाखाली सत्ता आली आणि तो नेता कोणत्या पक्षाच आहे, त्यावर ग्रामपंचायतींमधील बलाबल ठरविले जाते. प्रत्येक तालुक्यात हे चित्र वेगवेगळे आहे. काहीठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्र लढतात, तर काहीठिकाणी जमेल तशी सोयीने युती करुन पॅनेल अस्तित्वात येत असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्तेच याबाबतचा निर्णय घेत असतात. बऱ्याचदा जिल्हास्तरावरील नेतेही त्यांच्या सुरात सूर मिसळून शांत राहणे पसंत करतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल सुरुवातीपासूनच साशंकता व्यक्त केली जात होती. काहीठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी बहुतांश ठिकाणी तो फसला आहे. एखाद्या गावात राष्ट्रवादीची ताकद असेल तर तो आघाडीतील अन्य तो पक्षांना सोबत घेण्यास तयार होत नाही. असे चित्र सर्वत्र दिसून येते.

चौकट

निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढत असले तरी निकालानंतर सत्ता स्थापन करताना गरज पडल्यास हे पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यामुळे असा प्रयोग किती ठिकाणी यशस्वी झाला, याचे चित्र समोर येऊ शकेल. काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी एखाद्या गटाची गरज पडली तर त्याठिकाणी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाला ते सोबत घेऊ शकतील.

चौकट

निकालानंतर चित्र बदलले

सध्या प्रत्येक पक्ष ताकदीने निवडणूक लढवित आहे. निकालानंतर सत्तास्थापनेवेळी चित्र पूर्ण बदलणार आहे. काहीठिकाणी सत्तांतर होईल, काहीठिकाणी सत्ता अबाधित राहिल, तर काहीठिकाणी सत्तेची समीकरणे बदलतील. महाविकास आघाडी काहीठिकाणी स्वतंत्र लढून सत्तेत येईल तर काहीठिकाणी त्यांच्यात फुटही पडेल, असे चित्र दिसते.

कोट

सर्वचठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला नाही. काहीठिकाणी आघाडी झाली आहे. यासाठी आम्ही प्रयत्न केले. गावपातळीवरच्या निवडणुका या पॅनेलच्या माध्यमातून लढल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा त्या पक्षविरहित होतात.

- अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

कोट

गावपातळीवरही महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी व्हायला हवा. गावपातळीवरच्या राजकारणावर तालुक्याचे व पर्यायाने जिल्ह्याचे राजकारण अवलंबून असते. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढताना या एकसंध आघाडीमुळे समन्वय राखून यश मिळवता येते.

- आ. मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

कोट

ज्याठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे शिवसेनेला डावलले गेले. शिवसेनेचे पारडे जड होऊ नये याची दक्षता अनेकठिकाणी मित्रपक्षांनी घेतली. त्यामुळे प्रयोग यशस्वी झाला नाही. शिवसेनेची ताकद त्यांनी ओळखली नाही. बिनविरोध झालेल्या ११ पैकी ५ ग्रामपंचायती आमच्या आहेत.

- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना