शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

महाआघाडीत दिलजमाई, महायुतीतही सूर जुळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:29 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना असल्याने चुरस वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दोन्हीकडे असणारे मतभेद आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आघाडीतील पक्षांची दिलजमाई होत असताना, महायुतीमध्येही आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले जात आहे. दोन्हीकडील एकसंधपणाचे दावे आता कितपत तग धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदार संघातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे. मतांबाबतीत हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. शहरी मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने या मतदारसंघाकडे महाआघाडी आणि महायुतीचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात याठिकाणी दोन्ही बाजूंनी प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा सुरुवातीचा टप्पा दोन्हीकडील नाराजी दूर करण्यात व उमेदवारीच्या गोंधळातच गेला आहे. आता दिलजमाई झाली असली तरी, प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात ती कितपत टिकणार आणि त्याचे काय परिणाम राहणार, यावरच सर्व अवलंबून आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, जनता दल, भाजप, अपक्ष अशा प्रत्येकाला यश मिळाले आहे. सुरुवातीच्या सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. आमदार आणि नगरसेवकांचे एकत्रित बळ मोठे आहे. शिवसेनेकडेही दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही ताकद एकवटल्याने भाजपला युती म्हणून याठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. पदाधिकारी, नेत्यांमध्ये एकमत नाही. याशिवाय भाजपचे उमेदवार आणि येथील आमदारांत यापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. त्याचा थोडाफार परिणाम येथे दिसू शकतो.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?सांगली मतदारसंघात काँग्रेस व राष्टÑवादीची ताकद अधिक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सांगली शहरातीलच आहेत. दोन्ही काँग्रेसची एकवटलेली ताकद ‘स्वाभिमानी’ला उल्लेखनीय बळ देऊ शकते.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी, राष्टÑवादीबद्दल कायम व्यक्त केला जाणारा संशय यामुळे आघाडीत एकमेकांबद्दल विश्वास कमी दिसून येतो. आघाडीधर्म ठोकरून इतरांना छुपी रसद पुरविण्याची येथे परंपरा आहे.