शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाआघाडीत दिलजमाई, महायुतीतही सूर जुळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:29 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना असल्याने चुरस वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दोन्हीकडे असणारे मतभेद आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आघाडीतील पक्षांची दिलजमाई होत असताना, महायुतीमध्येही आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले जात आहे. दोन्हीकडील एकसंधपणाचे दावे आता कितपत तग धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदार संघातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे. मतांबाबतीत हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. शहरी मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने या मतदारसंघाकडे महाआघाडी आणि महायुतीचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात याठिकाणी दोन्ही बाजूंनी प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा सुरुवातीचा टप्पा दोन्हीकडील नाराजी दूर करण्यात व उमेदवारीच्या गोंधळातच गेला आहे. आता दिलजमाई झाली असली तरी, प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात ती कितपत टिकणार आणि त्याचे काय परिणाम राहणार, यावरच सर्व अवलंबून आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, जनता दल, भाजप, अपक्ष अशा प्रत्येकाला यश मिळाले आहे. सुरुवातीच्या सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. आमदार आणि नगरसेवकांचे एकत्रित बळ मोठे आहे. शिवसेनेकडेही दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही ताकद एकवटल्याने भाजपला युती म्हणून याठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. पदाधिकारी, नेत्यांमध्ये एकमत नाही. याशिवाय भाजपचे उमेदवार आणि येथील आमदारांत यापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. त्याचा थोडाफार परिणाम येथे दिसू शकतो.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?सांगली मतदारसंघात काँग्रेस व राष्टÑवादीची ताकद अधिक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सांगली शहरातीलच आहेत. दोन्ही काँग्रेसची एकवटलेली ताकद ‘स्वाभिमानी’ला उल्लेखनीय बळ देऊ शकते.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी, राष्टÑवादीबद्दल कायम व्यक्त केला जाणारा संशय यामुळे आघाडीत एकमेकांबद्दल विश्वास कमी दिसून येतो. आघाडीधर्म ठोकरून इतरांना छुपी रसद पुरविण्याची येथे परंपरा आहे.