शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

महाआघाडीत दिलजमाई, महायुतीतही सूर जुळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:29 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना असल्याने चुरस वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दोन्हीकडे असणारे मतभेद आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आघाडीतील पक्षांची दिलजमाई होत असताना, महायुतीमध्येही आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले जात आहे. दोन्हीकडील एकसंधपणाचे दावे आता कितपत तग धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदार संघातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे. मतांबाबतीत हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. शहरी मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने या मतदारसंघाकडे महाआघाडी आणि महायुतीचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात याठिकाणी दोन्ही बाजूंनी प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा सुरुवातीचा टप्पा दोन्हीकडील नाराजी दूर करण्यात व उमेदवारीच्या गोंधळातच गेला आहे. आता दिलजमाई झाली असली तरी, प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात ती कितपत टिकणार आणि त्याचे काय परिणाम राहणार, यावरच सर्व अवलंबून आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, जनता दल, भाजप, अपक्ष अशा प्रत्येकाला यश मिळाले आहे. सुरुवातीच्या सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. आमदार आणि नगरसेवकांचे एकत्रित बळ मोठे आहे. शिवसेनेकडेही दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही ताकद एकवटल्याने भाजपला युती म्हणून याठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. पदाधिकारी, नेत्यांमध्ये एकमत नाही. याशिवाय भाजपचे उमेदवार आणि येथील आमदारांत यापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. त्याचा थोडाफार परिणाम येथे दिसू शकतो.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?सांगली मतदारसंघात काँग्रेस व राष्टÑवादीची ताकद अधिक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सांगली शहरातीलच आहेत. दोन्ही काँग्रेसची एकवटलेली ताकद ‘स्वाभिमानी’ला उल्लेखनीय बळ देऊ शकते.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी, राष्टÑवादीबद्दल कायम व्यक्त केला जाणारा संशय यामुळे आघाडीत एकमेकांबद्दल विश्वास कमी दिसून येतो. आघाडीधर्म ठोकरून इतरांना छुपी रसद पुरविण्याची येथे परंपरा आहे.