शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महा-डीबीटी पोर्टलचा शेतकऱ्यांना डिजिटल मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

कडेगाव : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतची एकात्मिक संगणकीय ...

कडेगाव : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतची एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींकरिता अर्ज करण्याची सोय आहे. पोर्टलवरून अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असून १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळूनही तांत्रिक गोंधळ दूर झालेला नाही. कृषी विभागाने पर्याय द्यावा, अन्यथा हजारो शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

देश डिजिटल इंडियाची स्वप्ने बघत आहे. मात्र, भारतीय अर्थव्यस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांनाच ऑनलाईन सेवांमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. शेतकरी अर्ज भरण्यासाठी ई-सेवा केंद्रात किंवा सायबर कॅफे तसेच अन्य ठिकाणी धावपळ करीत आहेत. कृषी विभागाचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न असावा लागतो. पोर्टलवर ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागतो. परंतु या पोर्टलवर आधार नंबर लिंक करताना ‘आधार सर्व्हर नॉट रिस्पॉंडिंग’ असा संदेश मिळत आहे. यापुढील काम ठप्प होत आहे. अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून दिलेली असतानाही पोर्टलमधील तांत्रिक गोंधळ दूर झालेला नाही. पोर्टलबरोबरच ई-विकास वेबसाइटवर व थेट लेखी अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करावी अन्यथा १० जानेवारीनंतर दुसरी मुदतवाढ द्यावी. पोर्टलवरील अर्जांमधून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड होणार आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण होणार आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे, मात्र तांत्रिक अडचणी दूर होणे गरजेचे आहे.

चौकट

कृषी राज्यमंत्र्यांनी मार्ग काढावा

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर तत्काळ मार्ग निघणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देऊन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मार्ग काढावा व शासन स्तरावरून ही प्रकिया सुलभ करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.