शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरात अतिक्रमणे काढली-

By admin | Updated: February 19, 2015 23:42 IST

-लोकमतचा दणका-- पोलिसांनी कारवाईबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे व यातून होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच संजयनगर पोलिसांनी बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस मोहीम राबवून सर्व अतिक्रमणे काढून टाकली. पोलिसांनी कारवाईबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने उभी राहणार नाहीत, यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. माधवनगरचा बसथांबा ते जकात नाका मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यासाठी अतिक्रमणे केली होती. काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर अतिक्रमणे केली होती. खरेदीनिमित्त येणारे वाहनधारक दुकानासमोरच वाहन लावत असत. यामुळे वाहतुकीची कोंडी व्हायची. यातून दररोज लहान-मोठे अपघात होत असत. गेल्या आठवड्यात या अतिक्रमणांमुळे एकाचा बळी घेतला. ट्रकने ठोकरल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. तत्पूर्वीही अशा अनेकांचा अपघातात बळी गेला आहे, तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत होत असताना, पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. याविरुद्ध ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस खडबडून जागे झाले. संजयनगर पोलिसांचे एक पथक व वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बुधवारी सकाळपासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील सर्व विक्रेत्यांना हाकलून लावले. ज्या व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर रस्त्यावर टेबल मांडून व्यवसाय वाढविला होता, त्यांचीही अतिक्रमणे काढली. यापुढे अतिक्रमण केल्यास माल जप्त करुन कडक कारवाई केली जाईल, असा पोलिसांनी इशारा दिला आहे. आज, गुरुवारी सकाळीही पोलिसांनी माधवनगरमध्ये तळ ठोकला होता. परंतु एकही अतिक्रमण दिसून आले नाही. (प्रतिनिधी)रस्ता झाला मोकळा...वाहने रस्त्यावर उभी राहून वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला आहे.