शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बिल भरूनही माधवनगर तहानलेलेच

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

पाणी योजना खंडित : थकबाकीपोटी वीज कंपनीची कारवाई

गजानन साळुंखे- माधवनगर --माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या सात गावांसाठी युती शासनाने १६ कोटी रुपये खर्चून माधवनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना निर्माण केली. पण योजनेच्या निर्मितीपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ही गावे पाणीपट्टी वेळेत भरत नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी आहे. या योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वारंवार मदत केली आहे. तरीही गावच्या माथी असणारा थकबाकीचा कलंक पुसला जात नाही. माधवनगरही यापूर्वी या थकबाकीच्या यादीत आघाडीवर होते. पण गेल्या पाच वर्षात पाणीपट्टीची वसुली करणे व शासनाकडे वेळेत थकबाकी भरणे यावर ग्रामपंचायतीने विशेष लक्ष दिल्याने, माधवनगर थकबाकीदार गावांच्या यादीत नाही. एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ अखेर आलेल्या पाणीपट्टीचे एकूण ८ लाख ११ हजार ६0९ रुपये असे संपूर्ण बिल ग्रामपंचायतीने भरले आहे. तरीही माधवनगरला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.माधवनगर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली तरीही या योजनेतील इतर गावांची पाणीपट्टी थकबाकी मोठी आहे. या ग्रामपंचायतींची वसुलीच वेळेत होत नाही. त्यामुळे या गावांना पाणीपट्टी वेळेत भरणे शक्य होत नाही. सध्या ही थकबाकी १५ लाख आहे. महावितरण आपले वीज बिल सर्व एकरकमी घेणार, की काही सवलत ग्रामपंचायतींना मिळणार, यावरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. महावितरणने यापूर्वी सातत्याने वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या होत्या. नोटीसही दिली होती. आता प्रथम थकबाकी भरा, मग वीजपुरवठा सुरू करू, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. आज (सोमवार) दिवसभर या सातही गावात थकबाकी भरण्यासाठी धावपळ सुरू होती, पण रक्कम मोठी असल्याने पदाधिकारी चिंतेत दिसत होते. त्यातच ग्रामस्थांचीही पाण्यासाठी विचारणा होत होती. पाण्यासाठी हाल होत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हैराण झालेले हे पदाधिकारी आता आक्रमक झाले असून, आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.माधवनगर ग्रामपंचायत नेहमी शंभर टक्के पाणीपट्टी भरते. एवढेच नव्हे, तर चालू महिन्याचे बिलही आम्ही त्वरित भरत आहोत. वारंवार होणारी गळती काढण्यातही ग्रामपंचायत अग्रेसर आहे. पण तांत्रिक कारणाने इतर गावांमुळे आमचा पाणीपुरवठा बंद होत आहे. माधवनगरला स्वतंत्र पाणीपुरवठा करा, आम्ही वेळेत पाणीपट्टी भरू, ही ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. इतर गावांची थकबाकी वेळेत येत नाही म्हणून आमचा पाणीपुरवठा बंद पडतो.- सौ. नंदाताई कदम, सरपंच, माधवनगर