शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बिल भरूनही माधवनगर तहानलेलेच

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

पाणी योजना खंडित : थकबाकीपोटी वीज कंपनीची कारवाई

गजानन साळुंखे- माधवनगर --माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या सात गावांसाठी युती शासनाने १६ कोटी रुपये खर्चून माधवनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना निर्माण केली. पण योजनेच्या निर्मितीपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ही गावे पाणीपट्टी वेळेत भरत नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी आहे. या योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वारंवार मदत केली आहे. तरीही गावच्या माथी असणारा थकबाकीचा कलंक पुसला जात नाही. माधवनगरही यापूर्वी या थकबाकीच्या यादीत आघाडीवर होते. पण गेल्या पाच वर्षात पाणीपट्टीची वसुली करणे व शासनाकडे वेळेत थकबाकी भरणे यावर ग्रामपंचायतीने विशेष लक्ष दिल्याने, माधवनगर थकबाकीदार गावांच्या यादीत नाही. एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ अखेर आलेल्या पाणीपट्टीचे एकूण ८ लाख ११ हजार ६0९ रुपये असे संपूर्ण बिल ग्रामपंचायतीने भरले आहे. तरीही माधवनगरला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.माधवनगर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली तरीही या योजनेतील इतर गावांची पाणीपट्टी थकबाकी मोठी आहे. या ग्रामपंचायतींची वसुलीच वेळेत होत नाही. त्यामुळे या गावांना पाणीपट्टी वेळेत भरणे शक्य होत नाही. सध्या ही थकबाकी १५ लाख आहे. महावितरण आपले वीज बिल सर्व एकरकमी घेणार, की काही सवलत ग्रामपंचायतींना मिळणार, यावरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. महावितरणने यापूर्वी सातत्याने वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या होत्या. नोटीसही दिली होती. आता प्रथम थकबाकी भरा, मग वीजपुरवठा सुरू करू, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. आज (सोमवार) दिवसभर या सातही गावात थकबाकी भरण्यासाठी धावपळ सुरू होती, पण रक्कम मोठी असल्याने पदाधिकारी चिंतेत दिसत होते. त्यातच ग्रामस्थांचीही पाण्यासाठी विचारणा होत होती. पाण्यासाठी हाल होत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हैराण झालेले हे पदाधिकारी आता आक्रमक झाले असून, आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.माधवनगर ग्रामपंचायत नेहमी शंभर टक्के पाणीपट्टी भरते. एवढेच नव्हे, तर चालू महिन्याचे बिलही आम्ही त्वरित भरत आहोत. वारंवार होणारी गळती काढण्यातही ग्रामपंचायत अग्रेसर आहे. पण तांत्रिक कारणाने इतर गावांमुळे आमचा पाणीपुरवठा बंद होत आहे. माधवनगरला स्वतंत्र पाणीपुरवठा करा, आम्ही वेळेत पाणीपट्टी भरू, ही ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. इतर गावांची थकबाकी वेळेत येत नाही म्हणून आमचा पाणीपुरवठा बंद पडतो.- सौ. नंदाताई कदम, सरपंच, माधवनगर