शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मदनभाऊंचे जावई राजकीय पटलावर चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST

सांगली : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील पक्षीय व शासकीय कार्यक्रमांना लागणारी हजेरी व राजकारणातील सक्रियता यामुळे जितेश कदम यांच्या ...

सांगली : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील पक्षीय व शासकीय कार्यक्रमांना लागणारी हजेरी व राजकारणातील सक्रियता यामुळे जितेश कदम यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा सध्या सांगलीच्या राजकीय पटलावर सुरू झाली आहे.

मदनभाऊ गटाची महापालिका क्षेत्रात मोठी ताकद आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर या गटाचे पालकत्व जयश्री पाटील यांच्याकडे आले, मात्र सक्रिय राजकारणाबाबत व निवडणूक लढविण्याबाबत त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. या गटाने आता त्यासाठी मदन पाटील यांचे जावई जितेश कदम यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. जितेश कदम हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांचे नातू आहेत. त्यामुळे कदम व मदनभाऊ गट सध्या एकसंध आहेत. दोन्हींकडून त्यांना बळ मिळत आहे.

सुरुवातीला सांगली विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची चर्चा केली जात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांतील त्यांची जिल्ह्याच्या अन्य भागातील कार्यक्रमांना लागणारी उपस्थिती लोकसभेच्या निवडणूक तयारीचे संकेत देणारी ठरत आहे. तासगावमधील काँग्रेसचा पक्षप्रवेश कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्याचबरोबर कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग, जत याठिकाणच्या कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका आढावा बैठकीतही कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबत त्यांनी हजेरी लावली. एकूणच त्यांचा हा प्रवास खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी सुरू असल्याचे दिसत आहे.

अनेक वर्षांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावर दादा घराण्याचे वर्चस्व होते. भाजपने ते मोडीत काढले. त्यानंतर गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे कोणीही लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढविली होती. त्यामुळे यापुढे त्यांची भूमिका काय असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच जितेश कदम यांची सक्रियता त्यामुळे अधिक चर्चेत आली आहे.

चौकट

उमेदवारीसाठी संघर्ष शक्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली जिल्ह्याचा आगामी खासदार काँग्रेसचा असल्याचे सांगतानाच मोठ्या घराण्यांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांच्या वारसांना तिकीट देण्यात वावगे नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये यंदा वसंतदादा गट व मदनभाऊ गट आमने-सामने येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.