शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

मासाळवाडी कालवा छत्तीस वर्षे कोरडाच!

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

‘पाटबंधारे’चे दुर्लक्ष : आंदोलनाचा इशारा

आटपाडी : मासाळवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून २ कि.मी. कालवा तयार केला आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे गेली ३६ वर्षे या कालव्यातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मासाळवाडीच्या सरपंच सौ. राणी मासाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.१९७६ मध्ये मासाळवाडीतील शेतकऱ्यांनी आटपाडी तलावाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने तेव्हा अंदाजपत्रक तयार केले; पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून मग शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बिरोबा मंदिर ते दार्इंगडे वस्तीपर्यंत कालव्याची खुदाई केली. तिथंपर्यंत आटपाडी तलावाच्या कालव्याचे पाणी येत आहे.सध्या आटपाडी तलाव भरून पाणी ओढ्याने वाहून वाया जात आहे. पाणी वाया जाण्याऐवजी कालव्यात सोडून शेतीला देण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास कालव्याचे आणखी काही काम करावे लागल्यास या विभागाच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी लोकवर्गणी काढून कालव्याची खुदाई करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे. पाणी सोडल्यास १०० हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. याबाबत सरपंच सौ. मासाळ, भगवान दार्इंगडे, आत्माराम दार्इंगडे, महादेव मासाळ, बाळासाहेब मासाळ, अण्णा मेटकरी यांनी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांना भेटून निवेदन दिले आहे. (वार्ताहर)..लोकवर्गणीतून कालव्याचे कामआटपाडी तलावाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने तेव्हा अंदाजपत्रक तयार केले; पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून मग शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बिरोबा मंदिर ते दार्इंगडे वस्तीपर्यंत कालव्याची खुदाई केली.