शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

राज्यात शिक्षणावर अत्यल्प खर्च दुर्दैवी

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

पतंगराव कदम : पलूसकर शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सव

पलूस : महाराष्ट्रात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागावर सर्वात कमी खर्च केला जातो, हे दुर्दैवी आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहु. शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सवी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पतंगराव कदम बोलत होते. खासदार संजयकाका पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार जयंतराव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब चितळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.स्वागत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांनी केले. यावेळी शिक्षण संस्थेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या वाटचालीचा आढावा घेणारी ‘रौप्यमहोत्सवी भरारी स्मरणिका’ व महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारे ‘शिक्षणविचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.कदम पुढे म्हणाले, पलूसकर शिक्षण संस्थेने अल्पावधित गरूडभरारी घेतली आहे. आज रोजी या संस्थेच्या शिशु विकास मंदिर, माधवराव प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज या सर्व शाखांतून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विद्यालयाचे नाव गाजवत आहेत. या संस्थेच्या घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. सध्याच्या काळात गुणवत्तेला पर्याय नाही. माणूस हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षणातून समाजपरिवर्तन करायचे आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वात कमी खर्च शिक्षणावर होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.जयंतराव पाटील म्हणाले, शाळा काढणे, चालविणे सोपे आहे, पण दर्जा टिकवून ठेवणे अवघड आहे. शाळा चांगली असेल तरच व्यक्तीची गुणवत्ता वाढते. नवनवीन शिक्षण पद्धती, संशोधनाचा जन्म युरोप, अमेरिकेत होतो; पण भारतात होत नाही, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उदय परांजपे यांनी राजकारणापासून दूर राहतही शिक्षण संस्था चांगली चालविली आहे. याचे विशेष कौतुकच वाटते, असे सांगितले. खासदार संजयकाका पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. भगवानराव साळुंखे, वसंतराव पुदाले, अमरसिंह इनामदार, आर. एम. पाटील, एस. के. पाटील, उपाध्यक्ष सुभाष सदामते, सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ, विश्वास रावळ, विठ्ठल देवळे, संजय परांजपे, प्राजक्त परांजपे, वर्षा शहा, प्राचार्य सुहास निकम, एस. पी. मेंगाणे, अलका बागल, तानाजी करांडे, विकास गुरव, प्रा. बी. एन. पोतदार, ए. के. बामणे यावेळी उपस्थित होते.सूत्रसंचालन धनंजय गाडगीळ यांनी केले, तर आभार संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा यांनी मानले (वार्ताहर)मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मंत्री कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे त्यांना विविध कामांसाठी भेटण्यास आलेल्या लोकांना नाराज होऊन परत जावे लागले. मंत्र्यांनी पाठ फिरविल्याने संयोजकांनीही नाराजी व्यक्त केली.