शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

राज्यात शिक्षणावर अत्यल्प खर्च दुर्दैवी

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

पतंगराव कदम : पलूसकर शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सव

पलूस : महाराष्ट्रात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागावर सर्वात कमी खर्च केला जातो, हे दुर्दैवी आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहु. शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सवी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पतंगराव कदम बोलत होते. खासदार संजयकाका पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार जयंतराव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब चितळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.स्वागत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांनी केले. यावेळी शिक्षण संस्थेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या वाटचालीचा आढावा घेणारी ‘रौप्यमहोत्सवी भरारी स्मरणिका’ व महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारे ‘शिक्षणविचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.कदम पुढे म्हणाले, पलूसकर शिक्षण संस्थेने अल्पावधित गरूडभरारी घेतली आहे. आज रोजी या संस्थेच्या शिशु विकास मंदिर, माधवराव प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज या सर्व शाखांतून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विद्यालयाचे नाव गाजवत आहेत. या संस्थेच्या घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. सध्याच्या काळात गुणवत्तेला पर्याय नाही. माणूस हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षणातून समाजपरिवर्तन करायचे आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वात कमी खर्च शिक्षणावर होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.जयंतराव पाटील म्हणाले, शाळा काढणे, चालविणे सोपे आहे, पण दर्जा टिकवून ठेवणे अवघड आहे. शाळा चांगली असेल तरच व्यक्तीची गुणवत्ता वाढते. नवनवीन शिक्षण पद्धती, संशोधनाचा जन्म युरोप, अमेरिकेत होतो; पण भारतात होत नाही, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उदय परांजपे यांनी राजकारणापासून दूर राहतही शिक्षण संस्था चांगली चालविली आहे. याचे विशेष कौतुकच वाटते, असे सांगितले. खासदार संजयकाका पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. भगवानराव साळुंखे, वसंतराव पुदाले, अमरसिंह इनामदार, आर. एम. पाटील, एस. के. पाटील, उपाध्यक्ष सुभाष सदामते, सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ, विश्वास रावळ, विठ्ठल देवळे, संजय परांजपे, प्राजक्त परांजपे, वर्षा शहा, प्राचार्य सुहास निकम, एस. पी. मेंगाणे, अलका बागल, तानाजी करांडे, विकास गुरव, प्रा. बी. एन. पोतदार, ए. के. बामणे यावेळी उपस्थित होते.सूत्रसंचालन धनंजय गाडगीळ यांनी केले, तर आभार संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा यांनी मानले (वार्ताहर)मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मंत्री कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे त्यांना विविध कामांसाठी भेटण्यास आलेल्या लोकांना नाराज होऊन परत जावे लागले. मंत्र्यांनी पाठ फिरविल्याने संयोजकांनीही नाराजी व्यक्त केली.