शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

यंदा भरपूर आमरस, केशर १२० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:26 IST

सांगली : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंबा सामान्यांच्या आवाक्यात आला असून, भरपूर आमरस खाण्यास मिळणार आहे. केशर, हापूस, पायरी यांना ...

सांगली : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंबा सामान्यांच्या आवाक्यात आला असून, भरपूर आमरस खाण्यास मिळणार आहे. केशर, हापूस, पायरी यांना मागणी वाढली आहे. लॉकडाऊन काळात वितरणास अडचणी येत असल्या तरी घरपोच सोय होत असल्याने आंबाप्रेमींना दिलासा मिळाला आहे.

अक्षय्य तृतीयेला आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. याच दिवशी आमरसही केला जातो. त्यामुळे अक्षय्य तृतीया जवळ आली की आंब्यांची मागणी वाढते. मागणी वाढल्याने या काळात दरही वाढत असतात. मात्र यंदा दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे भरपूर आमरस खाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. येत्या शुक्रवारी १४ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. दोनच दिवसांवर सण येऊन ठेपल्याने आंबा मागविण्यात येत आहे. घरपोहोच सेवा देणाऱ्यांकडून आंबा पोहोच केला जात आहे. कडक लॉकडाऊनमुळे बाजारात जाऊन चार ठिकाणी चौकशी करून आंबा खरेदीची संधी यंदा नागरिकांना नाही. त्यामुळे मिळेल तो आंबा गोड मानून खावा लागण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही या वेळी अपेक्षित दर मिळत आहे. निर्यातक्षम केशर आंब्याला १३५ रुपये दर मिळाला आहे.

कोट

या वेळी निर्यातीला चांगली संधी मिळाली. स्थानिक बाजारपेठेतही मालाला मागणी आहे. ज्यांचा माल वेळेत बाजारात आला त्यांना चांगला दर मिळाला, मात्र उशिरा आलेल्या मालाला अपेक्षित दर मिळाला नाही.

- विराज कोकणे, आंबा उत्पादक

कोट

लॉकडाऊनमुळे आंबा उत्पादकांसमोर अनेक अडचणी येत आहेत. कामगारांना तोडणीसाठी येता येत नाही. शेतकऱ्यांनाही घर व शेतीपर्यंतचा प्रवास करता येत नसल्याने बाजारात माल येण्यास विलंब होत आहे.

- विकास बेडकीहाळ, आंबा उत्पादक

कोट

या वेळी आंबा सामान्यांच्या आवाक्यात असल्याने मागणी आहे. अक्षय्य तृतीयेमुळे मागणी वाढली आहे. ज्यांना घरपोहोच करणे शक्य आहे ते सेवा देत आहेत. बाजारातील प्रत्यक्ष विक्री बंदचा मोठा परिणाम दिसत आहे.

- मुसाभाई सय्यद, फळ विक्रेते

कोट

प्रत्यक्ष किंवा काही वेळासाठी विक्रीसाठी परवानगी मिळणे अपेक्षित होते. सध्या आंब्याला मागणी वाढत असली तरी विक्रीला मोठ्या अडचणी आहेत.

- शरद चव्हाण, विक्रेते

चौकट

आंब्याची किरकोळ विक्री प्रति डझन

रत्नागिरी हापूस ५०० ते ५५०

कर्नाटकी हापूस १५० ते २००

पायरी ३५० ते ४००

केशर ३०० ते ३५०

मद्रास पायरी १५० ते २००

लालबाग आंबा १०० ते १२५

चौकट

आवक वाढली, ग्राहक रोडावले

अक्षय्य तृतीयेमुळे आंब्याची बाजारातील आवक वाढली आहे. सर्व प्रकारचे आंबे बाजारात दाखल होत असताना ग्राहक रोडावले आहेत. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. या काळात नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आंबा खरेदीसाठी एरवी होणारी लगबग आता दिसत नाही. त्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढीच खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा कल आहे.