शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

तासगाव तालुक्यात द्राक्षबागांचे ५२ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST

तासगाव : बुधवारी रात्री तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील ...

तासगाव : बुधवारी रात्री तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा सहा द्राक्षबागा कोसळून भुईसपाट झाल्या. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.

द्राक्षबागांच्या बरोबरच गहू, शाळू, हरभरा, मका तसेच पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी मोठी झाडे वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस सुरू असताना सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेतील स्टेजिंगचा तोल बिघडला. द्राक्षांचे वजन पेलू न शकल्याने तारा तुटून बागा कोसळल्या.

तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यानंतर तलाठी प्रकाश भोसले, पोपट ओमासे, विद्यासागर चव्हाण, कृषी सहायक एस. व्ही. कुंभार, संजय चव्हाण आणि उत्तम खरमाटे यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत.

चौकट :

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागा कोसळलेले शेतकरी, क्षेत्र आणि अंदाजे नुकसान

शेतकरी गाव क्षेत्र (गुंठे) नुकसान (लाख)

प्रज्ञा प्रकाश पवार डोंगरसोनी ४० १० लाख

कोंडिराम तुळशीराम हंकारे डोंगरसोनी ३० ७.५ लाख

रमेश ज्ञानोबा झांबरे डोंगरसोनी ४० १० लाख

नितीन शिवाजी तारळेकर सावळज ४० ९ लाख

विष्णू शंकर माळी सावळज ४० ७ लाख

सुभाष शिवराम माळी मणेराजुरी ४० ९ लाख