शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

अडत्यांच्या मनमानीने गुऱ्हाळांची हानी

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक : गूळ उत्पादकांची सातत्याने पिळवणूक--गुऱ्हाळघरांना घरघर-२

सहदेव खोत -- पुनवत---सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ उद्योगाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या हानीला बाजारपेठेतील अडते व गूळ व्यापारी यांची मनमानी कारणीभूत ठरू लागली आहे. जिवाचे रान करून तयार केलेला गूळ बाजारपेठेत घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला दरातच चिरडले जात असल्यामुळे, या शेतकऱ्यांची आर्थिक हानी होऊ लागली आहे आणि हेच गुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाचे कारण ठरत आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादकांना कोल्हापूर, कऱ्हाड व सांगली अशा बाजारपेठा उपलब्ध आहेत. या तीनही बाजारपेठांमध्ये शेकडो अडत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. वास्तविक गूळ उत्पादक व व्यापारी यांच्यामधील दुवा म्हणजे हा अडत दुकानदार. मात्र सद्यस्थितीत गूळ उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ना या अडत्यांना आहे, ना व्यापाऱ्यांना. गूळ उत्पादकांची या दोघांकडून सातत्याने पिळवणूक होत आहे.गुऱ्हाळघरात जिवाचा आटापिटा तयार केलेला गूळ, चांगला दर मिळेल या आशेवर शेतकरी या अडत्यांच्या पेढीवर पाठवतात. शेतकऱ्याने गुळाची दहा कलमे पाठविली, तर एखाद्याच कलमाला मध्यम ते काहीसा चांगला दर मिळतो. उर्वरित कलमे नीचांकी भावानेच जातात. अडत्यांकडून गूळ खरेदीदार वाट्टेल त्या भावाने गूळ खरेदी करतात. बहुतांशी गुळाचे सौदे हे शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीतच चालतात. त्यामुळे आपल्या गुळाचा काय दर झाला, हे त्या शेतकऱ्याला दुसऱ्याकडूनच समजते. त्यामुळे मिळेल तो दर घेऊन गप्प बसण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर गत्यंतर नसल्याचे दिसून येत आहे.अडते-वाहतूकदार : एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शनएकच वाहतूकदार अनेक गुऱ्हाळघरांतील गूळ बाजारपेठेत पोहोचवतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारपेठ पाहिलेलीच नसते. आपल्याच दुकानात गूळ मिळविण्यासाठी अडत दुकानदार व वाहतूकदार यांच्यात एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शन असते. यामध्ये बिचारा शेतकरी मात्र यापासून दूरच राहतो व बऱ्याचवेळा चांगल्या दराला मुकतो.दरातील फरकामुळे शेतकऱ्यांची मेहनत वायाएकंदरीत, गूळ व्यापारी व अडत्यांना या शेतकऱ्यांच्या कष्टाची अजिबात माहिती नसते. त्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. दरात फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे. वास्तविक गूळ उत्पादक टिकला तरच आपला व्यवसाय चालेला, याचा अडते व गूळ व्यापाऱ्यांना विसर पडत चालल्याने, या उद्योगात ‘गूळ व्यापारी मालामाल व शेतकरी कंगाल’ असेच चित्र निर्माण झाले आहे.