शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

अडत्यांच्या मनमानीने गुऱ्हाळांची हानी

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक : गूळ उत्पादकांची सातत्याने पिळवणूक--गुऱ्हाळघरांना घरघर-२

सहदेव खोत -- पुनवत---सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ उद्योगाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या हानीला बाजारपेठेतील अडते व गूळ व्यापारी यांची मनमानी कारणीभूत ठरू लागली आहे. जिवाचे रान करून तयार केलेला गूळ बाजारपेठेत घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला दरातच चिरडले जात असल्यामुळे, या शेतकऱ्यांची आर्थिक हानी होऊ लागली आहे आणि हेच गुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाचे कारण ठरत आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादकांना कोल्हापूर, कऱ्हाड व सांगली अशा बाजारपेठा उपलब्ध आहेत. या तीनही बाजारपेठांमध्ये शेकडो अडत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. वास्तविक गूळ उत्पादक व व्यापारी यांच्यामधील दुवा म्हणजे हा अडत दुकानदार. मात्र सद्यस्थितीत गूळ उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ना या अडत्यांना आहे, ना व्यापाऱ्यांना. गूळ उत्पादकांची या दोघांकडून सातत्याने पिळवणूक होत आहे.गुऱ्हाळघरात जिवाचा आटापिटा तयार केलेला गूळ, चांगला दर मिळेल या आशेवर शेतकरी या अडत्यांच्या पेढीवर पाठवतात. शेतकऱ्याने गुळाची दहा कलमे पाठविली, तर एखाद्याच कलमाला मध्यम ते काहीसा चांगला दर मिळतो. उर्वरित कलमे नीचांकी भावानेच जातात. अडत्यांकडून गूळ खरेदीदार वाट्टेल त्या भावाने गूळ खरेदी करतात. बहुतांशी गुळाचे सौदे हे शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीतच चालतात. त्यामुळे आपल्या गुळाचा काय दर झाला, हे त्या शेतकऱ्याला दुसऱ्याकडूनच समजते. त्यामुळे मिळेल तो दर घेऊन गप्प बसण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर गत्यंतर नसल्याचे दिसून येत आहे.अडते-वाहतूकदार : एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शनएकच वाहतूकदार अनेक गुऱ्हाळघरांतील गूळ बाजारपेठेत पोहोचवतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारपेठ पाहिलेलीच नसते. आपल्याच दुकानात गूळ मिळविण्यासाठी अडत दुकानदार व वाहतूकदार यांच्यात एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शन असते. यामध्ये बिचारा शेतकरी मात्र यापासून दूरच राहतो व बऱ्याचवेळा चांगल्या दराला मुकतो.दरातील फरकामुळे शेतकऱ्यांची मेहनत वायाएकंदरीत, गूळ व्यापारी व अडत्यांना या शेतकऱ्यांच्या कष्टाची अजिबात माहिती नसते. त्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. दरात फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे. वास्तविक गूळ उत्पादक टिकला तरच आपला व्यवसाय चालेला, याचा अडते व गूळ व्यापाऱ्यांना विसर पडत चालल्याने, या उद्योगात ‘गूळ व्यापारी मालामाल व शेतकरी कंगाल’ असेच चित्र निर्माण झाले आहे.