शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

आपापसातील फुटीमुळे शेतकऱ्यांची लूट : राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:22 IST

किसानों की आपस की फूट की वजहसे बाजार उनको लूट रहा है. या आपापसातील फुटीमुळे बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकºयाला न होता, तो व्यापाºयाला होत आहे

ठळक मुद्देपलूस येथे क्रांती पशू, पक्षी व कृषी प्रदर्शनाचा समारोपमहाराष्ट्रामध्ये नव्या धरणांची आवश्यकता नाही. परंतु जे पाणी साठविले जात आहे

पलूस : किसानों की आपस की फूट की वजहसे बाजार उनको लूट रहा है. या आपापसातील फुटीमुळे बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकºयाला न होता, तो व्यापाºयाला होत आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

येथे क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रांती पशू, पक्षी, कृषी प्रदर्शनाच्या समारोप व पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, आमदार आनंदराव पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रांती कारखान्याच्या सरासरी एकरी जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकºयांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

राणा म्हणाले, महाराष्ट्रातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. परंतु याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. हे आकडे फक्त जागतिक बँकेकडून पैसे उकळण्यासाठी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये नव्या धरणांची आवश्यकता नाही. परंतु जे पाणी साठविले जात आहे, त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र ऊसपट्टा म्हणून प्रचलित आहे. परंतु या उसासाठी पाटपाण्याचा वापर टाळून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर अशा आधुनिक सुविधांचा वापर करुन शेती करणे आवश्यक आहे.

बॅरिस्टर बी. एन. देशमुख म्हणाले, तरुणांच्या हाताला काम आणि त्याचे योग्य दाम मिळावे, या एकमेव प्रश्नासाठी देश झगडत आहे. येणाºया प्रत्येक समस्येशी दोनहात करण्याचे धैर्य तरुणांनी ठेवणे आवश्यक आहे, तरच या लढ्याला यश येईल. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रह्मानंद पडळकर, सन्मान समितीचे अध्यक्ष सुभाष आर्वे, दत्तूशेठ सूर्यवंशी, विठ्ठलराव येसुगडे, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, व्ही. वाय. पाटील, सचिन कदम, सुनील सावंत, भीमराव महिंद, दादा पाटील, कुंडलच्या सरपंच प्रमिला पुजारी, कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पृथ्वीराज कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंत लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष आत्माराम हारुगडे, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत लाड उपस्थित होते.

श्रीकांत लाड यांनी स्वागत केले. श्रीकांत माने व अंकुश राजमाने यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद जोशी यांनी आभार मानले.शाळांमधून वह्या वाटणार : अरुण लाडअरुण लाड म्हणाले, शेतकºयाला शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान समजावे, निसर्गाच्या ढासळलेल्या समतोलामुळे जे नुकसान होत आहे, त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांना विविध पर्यायांची माहिती व्हावी, यासाठी क्रांती पशू, पक्षी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हार-तुरे न स्वीकारण्याचा आमचा निर्णय लोकांनी मान्य केला आणि गरजूंसाठी वह्या भेट दिल्या. या वह्यांचे लवकरच विविध शाळांमधून वितरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार