शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आपापसातील फुटीमुळे शेतकऱ्यांची लूट : राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:22 IST

किसानों की आपस की फूट की वजहसे बाजार उनको लूट रहा है. या आपापसातील फुटीमुळे बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकºयाला न होता, तो व्यापाºयाला होत आहे

ठळक मुद्देपलूस येथे क्रांती पशू, पक्षी व कृषी प्रदर्शनाचा समारोपमहाराष्ट्रामध्ये नव्या धरणांची आवश्यकता नाही. परंतु जे पाणी साठविले जात आहे

पलूस : किसानों की आपस की फूट की वजहसे बाजार उनको लूट रहा है. या आपापसातील फुटीमुळे बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकºयाला न होता, तो व्यापाºयाला होत आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

येथे क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रांती पशू, पक्षी, कृषी प्रदर्शनाच्या समारोप व पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, आमदार आनंदराव पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रांती कारखान्याच्या सरासरी एकरी जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकºयांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

राणा म्हणाले, महाराष्ट्रातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. परंतु याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. हे आकडे फक्त जागतिक बँकेकडून पैसे उकळण्यासाठी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये नव्या धरणांची आवश्यकता नाही. परंतु जे पाणी साठविले जात आहे, त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र ऊसपट्टा म्हणून प्रचलित आहे. परंतु या उसासाठी पाटपाण्याचा वापर टाळून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर अशा आधुनिक सुविधांचा वापर करुन शेती करणे आवश्यक आहे.

बॅरिस्टर बी. एन. देशमुख म्हणाले, तरुणांच्या हाताला काम आणि त्याचे योग्य दाम मिळावे, या एकमेव प्रश्नासाठी देश झगडत आहे. येणाºया प्रत्येक समस्येशी दोनहात करण्याचे धैर्य तरुणांनी ठेवणे आवश्यक आहे, तरच या लढ्याला यश येईल. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रह्मानंद पडळकर, सन्मान समितीचे अध्यक्ष सुभाष आर्वे, दत्तूशेठ सूर्यवंशी, विठ्ठलराव येसुगडे, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, व्ही. वाय. पाटील, सचिन कदम, सुनील सावंत, भीमराव महिंद, दादा पाटील, कुंडलच्या सरपंच प्रमिला पुजारी, कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पृथ्वीराज कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंत लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष आत्माराम हारुगडे, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत लाड उपस्थित होते.

श्रीकांत लाड यांनी स्वागत केले. श्रीकांत माने व अंकुश राजमाने यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद जोशी यांनी आभार मानले.शाळांमधून वह्या वाटणार : अरुण लाडअरुण लाड म्हणाले, शेतकºयाला शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान समजावे, निसर्गाच्या ढासळलेल्या समतोलामुळे जे नुकसान होत आहे, त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांना विविध पर्यायांची माहिती व्हावी, यासाठी क्रांती पशू, पक्षी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हार-तुरे न स्वीकारण्याचा आमचा निर्णय लोकांनी मान्य केला आणि गरजूंसाठी वह्या भेट दिल्या. या वह्यांचे लवकरच विविध शाळांमधून वितरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार