शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

खरेदी केंद्राअभावी मका उत्पादकांची लूट

By admin | Updated: December 16, 2014 23:32 IST

जतमधील प्रकार : व्यापारी, दलालांमुळे प्रतिक्विंटल १६० ते २६० रुपयांचा फटका

जयवंत आदाटे- जत -शासनाने जत तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. मका पिकाचा हमीभाव एक हजार तीनशे दहा रुपये आहे. परंतु व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून एक हजार पन्नास किंवा एक हजार एकशे पन्नास रुपये दराने मका खरेदी करीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रति क्विंटलमागे १६० ते २६० रुपये इतकी आर्थिक पिळवणूक होत आहे.कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही व चार महिन्यात हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे जत तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस आकर्षित होऊ लागला आहे. सुमारे तीस हजार एकर क्षेत्रावर तालुक्यात मका पिकाची लागण झाली आहे, अशी नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आहे. सरासरी प्रति एकर चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. मका पीक पेरणी बैलजोडी अथवा ट्रॅक्टरने केल्यानंतर त्याची संपूर्ण मळणी मळणीयंत्र अथवा नव्याने बाजारात आलेल्या आधुनिक मळणी यंत्राद्वारे केली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेतमजूर लागत नाहीत. त्यामुळे कमी खर्चात जादा उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे येथील शेतकरी आकर्षित होत आहेत.शासनाने मका पिकाचा हमीभाव प्रतिक्विंटल १ हजार ३१० रुपये इतका जाहीर केला आहे. जत शहर अथवा तालुक्यात इतरत्र कोठेही मका खरेदी केंद्र सुरू नाही. शासनाचे चुकीचे धोरण व निसर्गाची अवकृपा आणि अवेळी पडणारा पाऊस यामुळे येथील शेतकरी नेहमी आर्थिक संकटात असतो. मळणी झाल्यानंतर मका शेतकरी विक्रीसाठी आणतात. शासनाचा हमीभाव काय आहे आणि व्यापारी किती दर देणार आहेत, याची फारशी चौकशी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. याचाच गैरफायदा या व्यवसायातील दलाल आणि व्यापारी घेत आहेत. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा मका हमी भावापेक्षा २६० ते १६० रुपये कमी दराने खरेदी करून, त्याची जादा दराने इतरत्र विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी भिकेकंगाल आणि व्यापारी व दलाल मालामाल, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. मका पीक चार महिन्यात येते. मळणी झाल्यानंतर ठेवण्यासाठी योग्य ठिकाण नाही व आर्थिक अडचण यामुळे, जो दर व्यापारी देईल, त्या दराने शेतकरी मका विकण्यास तयार होतो. प्रशासन व्यापाऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र सुरू करत नाही. त्यामुळे काहीवेळा विनंती करून शेतकरी व्यापाऱ्यांना मका खरेदी करण्यास तयार करीत आहेत. त्याचा गैरफायदा काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. शासनाने हमीभाव मिळवून देण्यासाठी तालुक्यातील उमदी, संख, माडग्याळ, बिळूर, डफळापूर, शेगाव याठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक तूट कमी करावी, अशी मागणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.दोन वर्षापासून मका पिकाचा हमीभाव १ हजार ३१० रुपये असा एकच आहे. या दोन वर्षात खते, बियाणे, वीज बिल, शेतमजुरांचे पगार यामध्ये भरमसाट वाढ झाली आहे. परंतु हमी भावामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. शासनाने यामध्ये वाढ करावी, अशी मागणी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे. १ जानेवारी २०१५ पासून जत तालुका देखरेख संघाच्यावतीने व दुय्यम बाजार आवार जत यांच्या नियंत्रणाखाली तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी तोंडी माहिती सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे. त्यासंदर्भात कोणतेही लेखी आदेश नाहीत, अशी माहिती जत बाजार समितीचे सचिव विजयसिंह राजेशिर्के यांनी दिली.शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाशासनाने मका पिकाचा हमीभाव प्रतिक्विंटल १ हजार ३१० रुपये इतका जाहीर केला आहे. शासनाचा हमीभाव काय आहे आणि व्यापारी किती दर देणार आहेत, याची फारशी चौकशी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. याचाच गैरफायदा या व्यवसायातील दलाल आणि व्यापारी घेत आहेत. हमी भावापेक्षा २६० ते १६० रुपये कमी दराने खरेदी करून, त्याची जादा दराने इतरत्र विक्री केली जात आहे. प्रशासन व्यापाऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र सुरू करत नाही. त्यामुळे आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी काहीवेळा विनंती करून शेतकरी व्यापाऱ्यांना मका खरेदी करण्यास तयार करीत आहेत. त्याचाच गैरफायदा काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे.