शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लिंगीवरे ओढ्याचे नालाबांध निकामी

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

दुरुस्तीच नाही : गळतीमुळे पाणी वाया

लक्ष्मण खटके -- लिंगीवरे परिसरातील ओढ्याचे पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेले नालाबांध निकामी झाल्यामुळे पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडले नाही. पाऊस पडला, पण गळतीमुळे पाणी वाहून चालले आहे.लिंगीवरेच्या दक्षिणेला असणाऱ्या ओढ्यावर ठिकठिकाणी नालाबंडिंगची कामे करण्यात आली. पश्चिमेकडील मांगोबा शेतापासून लिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. परंतु त्यानंतर पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ सर्वच नाल्यात साचून राहिला. त्यामुळे तेथील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत गेला.पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला. पाणी अडविण्यासाठी नालाबांधात अडथळा राहिलेला नसल्यामुळे मुरणेही बंद झाले आहे.१९९८-९९ मध्ये कृषी विभागामार्फत या नाल्यांच्या दुरुस्तीस लोकसहभागातून नुकताच प्रारंभ झाला. नाल्यांमध्ये वाढलेली झाडे-झुडपे तोडण्याचे काम नावाला झाले. उपस्थितांनी गाळ गाढून पाणी अडविण्यासाठी फुटलेल्या बांधावर पाच पाट्या माती टाकली. या कार्यक्रमाचे सरकारी नियमाप्रमाणे औपचारिक उद्घाटन होऊन, आजअखेर १५ वर्षे परिस्थिती जैसे थे आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली असून, नवीन कामांवर लाखो रुपये खर्च केले गेले. त्याप्रमाणात त्याची उपयोगिता नालाबंडिंगच्या दुरुस्तीच्या कामापेक्षा कमीच आहे.ओढ्याच्या पात्रात बाभळी जोमाने वाढत आहेत. मजुरांना रोजगार मिळावा यासाठी गाळ काढण्याची कामे सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन धडपडले. मात्र शासनाच्या धोरणामुळे गाळ काढण्याची योजना बारगळली. झाडे-झुडपे तशीच वाढली. यावर्षी पाऊस पडून या ओढ्याला पाणी आले. पण अशा परिस्थितीत पाणी वाहून गेले व पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही. मातीचे व सिमेंटचे बांधही फुटलेलिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. तसेच काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला आहे.