शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

लिंगीवरे ओढ्याचे नालाबांध निकामी

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

दुरुस्तीच नाही : गळतीमुळे पाणी वाया

लक्ष्मण खटके -- लिंगीवरे परिसरातील ओढ्याचे पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेले नालाबांध निकामी झाल्यामुळे पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडले नाही. पाऊस पडला, पण गळतीमुळे पाणी वाहून चालले आहे.लिंगीवरेच्या दक्षिणेला असणाऱ्या ओढ्यावर ठिकठिकाणी नालाबंडिंगची कामे करण्यात आली. पश्चिमेकडील मांगोबा शेतापासून लिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. परंतु त्यानंतर पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ सर्वच नाल्यात साचून राहिला. त्यामुळे तेथील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत गेला.पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला. पाणी अडविण्यासाठी नालाबांधात अडथळा राहिलेला नसल्यामुळे मुरणेही बंद झाले आहे.१९९८-९९ मध्ये कृषी विभागामार्फत या नाल्यांच्या दुरुस्तीस लोकसहभागातून नुकताच प्रारंभ झाला. नाल्यांमध्ये वाढलेली झाडे-झुडपे तोडण्याचे काम नावाला झाले. उपस्थितांनी गाळ गाढून पाणी अडविण्यासाठी फुटलेल्या बांधावर पाच पाट्या माती टाकली. या कार्यक्रमाचे सरकारी नियमाप्रमाणे औपचारिक उद्घाटन होऊन, आजअखेर १५ वर्षे परिस्थिती जैसे थे आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली असून, नवीन कामांवर लाखो रुपये खर्च केले गेले. त्याप्रमाणात त्याची उपयोगिता नालाबंडिंगच्या दुरुस्तीच्या कामापेक्षा कमीच आहे.ओढ्याच्या पात्रात बाभळी जोमाने वाढत आहेत. मजुरांना रोजगार मिळावा यासाठी गाळ काढण्याची कामे सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन धडपडले. मात्र शासनाच्या धोरणामुळे गाळ काढण्याची योजना बारगळली. झाडे-झुडपे तशीच वाढली. यावर्षी पाऊस पडून या ओढ्याला पाणी आले. पण अशा परिस्थितीत पाणी वाहून गेले व पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही. मातीचे व सिमेंटचे बांधही फुटलेलिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. तसेच काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला आहे.