शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

Lok Sabha Election 2019 संभाजी पवार गट राजकीय पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:04 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना, सांगलीतील माजी आमदार संभाजी पवार यांचा गट मात्र संभ्रमावस्थेत सापडला आहे. ...

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना, सांगलीतील माजी आमदार संभाजी पवार यांचा गट मात्र संभ्रमावस्थेत सापडला आहे. युतीचा धर्म पाळताना भाजपचा उमेदवार हा या गटाचा विरोधक आहे, तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला साथ द्यायची म्हटले, तर जयंत पाटील यांच्यारूपाने त्या बाजूलाही राजकीय शत्रूच उभा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकी भूमिका काय घ्यायची, अशी या गटाची कोंडी झाली आहे.सांगली विधानसभा मतदारसंघात संभाजी पवार यांचा मोठा गट आहे. संभाजी पवारांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम शिवसेनेत आहेत. संभाजी पवारांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला नसला तरी, ते नेहमी मुलांसोबत असतात. त्यामुळे पवार गट हा सद्य:स्थितीत शिवसेनेत आहे. तरीही राजकीयदृष्ट्या सध्या हा गट गोंधळात सापडला आहे.हातकणंगले मतदारसंघात या गटाने नेहमीच खासदार राजू शेट्टी यांची साथ दिली. यंदाही ते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्यासोबत राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील फिरत आहेत. जयंत पाटील हे पवार गटाचे क्रमांक एकचे राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे शेट्टी यांच्यासोबत जाणे म्हणजे जयंत पाटील यांच्याबरोबर जाण्यासारखेच आहे. त्यामुळे यंदा हातकणंगले मतदारसंघाबाबत या गटाने तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर याठिकाणी युतीचा धर्म म्हणून भाजपची साथ द्यायचा निर्णय घेतला, तर भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजयकाका पाटील मैदानात आहेत. त्यांना भाजपमध्ये घेऊ नये म्हणूनच पवार गटाने भाजपशी पंगा घेतला होता. शेवटी नाईलाजास्तव याच कारणावरून पवार गट भाजपमधून बाहेर पडला होता. त्यामुळे आता संजयकाका पाटील यांना मदत केली, तर आपल्याच तत्त्वांशी ती प्रतारणा होणार आहे. संजयकाका पाटील यांनासुद्धा पवार गट आपला शत्रू मानतो. त्यामुळे ते शिवसेनेत असूनही सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपला साथ देऊ शकत नाहीत.संजयकाका पाटील यांचे विरोधक म्हणून विशाल पाटील यांना साथ देण्याचा विचार केला तरीही, त्याही बाजूला पुन्हा जयंत पाटील समोर आहेत. वसंतदादा गट आणि राजारामबापू गट यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला असला तरी, विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे पवार गट सध्या तटस्थ आहे. त्यांची भूमिका लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.कार्यकर्ते शांत : नेत्यांच्या भूमिकेकडे लक्षदोन्हीही बाजूला शत्रूंचेच चेहरे असल्याने, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचीच भूमिका पवार गटाने स्वीकारल्याचे चित्र आहे. पवार गटातील कार्यकर्त्यांना संभाजी पवार किंवा त्यांच्या दोन्ही मुलांनी कोणतीही सूचना दिलेली नाही. शिवसेनेतील संजयकाका पाटील यांच्याविरोधातील एक गटही आता युतीधर्म पाळताना दिसत आहे, मात्र पवार गटाला युतीधर्म पाळणे हे धर्मसंकट बनले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक