शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

लॉकडाऊनमुळे टाळ-मृदंगाचा आवाज थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:27 IST

शेतकऱ्यांना मिळतेय मार्गदर्शन सांगली : कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. यासाठी ...

शेतकऱ्यांना मिळतेय मार्गदर्शन

सांगली : कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. यासाठी मंडल अधिकारी व कृषी सहायक हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढली

सांगली : चाचण्या वाढविण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अनेकजण गावात फिरल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे़

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सांगली : जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या लगतची वृक्षतोड मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान हाेण्याची भीती आहे. अनेकजण झाडांच्या बुंध्याला आग लावून दुसऱ्यादिवशी त्याची विल्हेवाट लावत असल्याचे चित्र आहे.

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने सुरू

सांगली : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गंत कडक निर्बंध लावले आहेत. जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तही अन्य दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात व्यवसाय लाॅकडाऊन

सांगली : कोरोनाच्या सावटामुळे ग्रामीण भागात हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यावसायिकांचे गेल्या काही दिवसांपासून खूप हाल हाेत आहेत. मंदीमुळे आर्थिक आवक कमी झाल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे.

कोरोनामुळे नागरिकांची शेतीकडे धाव

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने व संसर्गाच्या भीतीने नागरिक शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. शेतातील वातावरण प्रसन्न असते. या ठिकाणी संसर्गाचा धोका नसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे.

पाणंद रस्ते अर्धवट

पलूस : तालुक्यातील शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची कामे रखडली आहेत. पाणंद रस्ते योजनाच थंडबस्त्यात आहे. विकासाचा निधी कमी झाल्याने, शेताच्या वहिवाटीच्या रस्ते निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच

करगणी : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सातत्याने विजेच्या लपंडावामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. विद्युत उपकरणेही निकामी होत आहेत. बऱ्याच गावांमध्ये पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. सातत्याने तक्रारी वाढत आहेत.

शासनाच्या विविध योजना कागदावरच

सांगली : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या. जिल्हा परिषदेच्याही योजना आहेत, पण या योजना कागदावरच आहेत.

पावसाळ्यापूर्वी मशागतीला वेग

करगणी : कोरोनाचे संकट डोक्यावर ठेवून शेतकरी भरउन्हात बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साह्याने शेती मशागत करीत आहेत. काही ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. हातपंप आटल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.