शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लॉकडाऊनमध्ये महापुराच्या तडाख्याने शेतकरी ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार ...

इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या विश्वास हेल्पलाइनचे समन्वयक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कालीदास पाटील यांनी सांगितले की, आकस्मिक आपत्तीतून अनेकांना सावरता न आल्याने पूरग्रस्त क्षेत्रातील रहिवासी मानसिकदृष्ट्या खचला असल्याचे दिसून आले आहे. तरुणाईपुढे भवितव्यविषयक अनेक प्रश्न आहेत. लॉकडाऊनमुळे हिरावलेला रोजगार, वर्क फ्रॉम होमचा ताण, कौटुंबिक कलह, आर्थिक ताण याला नागरिक तोंड देत होते. त्यातच महापुराचा तडाखा बसल्याने विवंचनेत भर पडली आहे. शेती नापीक होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे. कोरोनामधील सल्ला व समुपदेशन सेवा महापुरामुळे व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यातील २७ हजार १३० कुटुंबांशी हेल्पलाइनवरून संवाद साधला आहे. यापूर्वीच्या महापुरात ४६ टक्के व्यक्तींमध्ये पुरानंतर मानसिक विकार दिसून आले होते. सध्या अधिक सखोल सर्वेक्षणाची गरज आहे. पूरग्रस्तांमध्ये झोप, भुकेच्या तक्रारी, नकारात्मक विचार, मानसिक थकवा आदी मनोकायिक विकार आढळत आहेत. त्यांचे समुपदेशन कालीदास पाटील यांच्यासह मानसोपचारतज्ज्ञ शैलजा पाटील, क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील आदी करत आहेत.