शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

लॉकडाऊनमध्ये महापुराच्या तडाख्याने शेतकरी ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार ...

इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या विश्वास हेल्पलाइनचे समन्वयक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कालीदास पाटील यांनी सांगितले की, आकस्मिक आपत्तीतून अनेकांना सावरता न आल्याने पूरग्रस्त क्षेत्रातील रहिवासी मानसिकदृष्ट्या खचला असल्याचे दिसून आले आहे. तरुणाईपुढे भवितव्यविषयक अनेक प्रश्न आहेत. लॉकडाऊनमुळे हिरावलेला रोजगार, वर्क फ्रॉम होमचा ताण, कौटुंबिक कलह, आर्थिक ताण याला नागरिक तोंड देत होते. त्यातच महापुराचा तडाखा बसल्याने विवंचनेत भर पडली आहे. शेती नापीक होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे. कोरोनामधील सल्ला व समुपदेशन सेवा महापुरामुळे व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यातील २७ हजार १३० कुटुंबांशी हेल्पलाइनवरून संवाद साधला आहे. यापूर्वीच्या महापुरात ४६ टक्के व्यक्तींमध्ये पुरानंतर मानसिक विकार दिसून आले होते. सध्या अधिक सखोल सर्वेक्षणाची गरज आहे. पूरग्रस्तांमध्ये झोप, भुकेच्या तक्रारी, नकारात्मक विचार, मानसिक थकवा आदी मनोकायिक विकार आढळत आहेत. त्यांचे समुपदेशन कालीदास पाटील यांच्यासह मानसोपचारतज्ज्ञ शैलजा पाटील, क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील आदी करत आहेत.