शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लॉकडाऊन आजपासून शिथील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता मिळणार आहे. रुग्णसंख्या स्थिर असल्याने व ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता मिळणार आहे. रुग्णसंख्या स्थिर असल्याने व पॉझिटिव्हीटी रेटही कमी होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आता किराणा, फळे, भाजीपाला, कृषी सेवा केंद्र, बेकरी व्यवसायिकांना सकाळी सात ते अकरापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळणार असल्याचे वृत्त दिले होते. ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्यास मुदतवाढही देण्यात आली. सध्या जिल्ह्यातील बाधितांची संख्या स्थिर असली तरी अद्यापही पॉझिटिव्हीटी रेट १७.६५ वर आहे. तो कमी करण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथीलता देऊन जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मार्केट कमिटी, फळ मार्केट, भाजी मंडई, हातगाडीवरील पार्सल सेवा, हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू राहणार आहेत. मालवाहतुकीस कोणतेही निर्बंध असणार नाहीत. कोणत्याही वेळी मालाची चढाई व उतरण करता येणार आहे. मार्केट यार्डातील व्यवहारास अकरापर्यंतची वेळ दिल्याने तिथे गर्दी होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यायची आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांची मुदत १५ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता लॉकडाऊनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आज, मंगळवारपासून शिथिल करण्यात आलेल्या नियमांनुसार निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चौकट

हे सुरू राहणार

सकाळी सात ते अकरा वेळेत किराणा, फळे, दूध, बेकरी, मिठाई, सर्वप्रकारची खाद्यदुकाने, मार्केट यार्ड, फळ मार्केट, भाजी मंडई, शीतगृहे, गोदाम सेवा, बँकिंग सेवा, कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य विक्री, रिक्षा, टॅक्सी.

चौकट

हे बंद राहणार

सलून, ब्युटीपार्लर, आठवडा बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, हातगाडीवरील खाद्यपदार्थांची विक्री बंद, मात्र पार्सल देण्यास परवानगी.