शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द ...

सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १३ मेपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता त्यांच्यावरील उपचारासाठी नियाेजनास प्रशासनाने प्राधान्य द्यावे. व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात येत असून त्यांच्या तंत्रज्ञांचीही संख्या वाढविण्यात येईल. शासनस्तरावरून ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता मिरज कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३० बेडस्‌ वाढविण्यात येत आहेत, तर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात ५०० बेडची सोय करण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याने उपचाराची सोय होणार आहे.

जिल्ह्याला प्रतिदिन ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून हा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिविर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी बोलविल्यास केंद्रावर होणारी गर्दी टाळता येणे शक्य आहे. यासाठी प्रशासनाने नियाेजन करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, अरुण लाड, डॉ. सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी करणे आवश्यक

पालकमंत्री म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, पॉझिटिव्हिटीचेही प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर निदान आणि लवकर उपचार करण्यासह बाधितांची संख्या वाढणार नाही यासाठी नियोजन करावे.