शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द ...

सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १३ मेपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता त्यांच्यावरील उपचारासाठी नियाेजनास प्रशासनाने प्राधान्य द्यावे. व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात येत असून त्यांच्या तंत्रज्ञांचीही संख्या वाढविण्यात येईल. शासनस्तरावरून ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता मिरज कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३० बेडस्‌ वाढविण्यात येत आहेत, तर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात ५०० बेडची सोय करण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याने उपचाराची सोय होणार आहे.

जिल्ह्याला प्रतिदिन ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून हा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिविर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी बोलविल्यास केंद्रावर होणारी गर्दी टाळता येणे शक्य आहे. यासाठी प्रशासनाने नियाेजन करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, अरुण लाड, डॉ. सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी करणे आवश्यक

पालकमंत्री म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, पॉझिटिव्हिटीचेही प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर निदान आणि लवकर उपचार करण्यासह बाधितांची संख्या वाढणार नाही यासाठी नियोजन करावे.