शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द ...

सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १३ मेपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता त्यांच्यावरील उपचारासाठी नियाेजनास प्रशासनाने प्राधान्य द्यावे. व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात येत असून त्यांच्या तंत्रज्ञांचीही संख्या वाढविण्यात येईल. शासनस्तरावरून ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता मिरज कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३० बेडस्‌ वाढविण्यात येत आहेत, तर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात ५०० बेडची सोय करण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याने उपचाराची सोय होणार आहे.

जिल्ह्याला प्रतिदिन ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून हा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिविर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी बोलविल्यास केंद्रावर होणारी गर्दी टाळता येणे शक्य आहे. यासाठी प्रशासनाने नियाेजन करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, अरुण लाड, डॉ. सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी करणे आवश्यक

पालकमंत्री म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, पॉझिटिव्हिटीचेही प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर निदान आणि लवकर उपचार करण्यासह बाधितांची संख्या वाढणार नाही यासाठी नियोजन करावे.