शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लॉबिंग, सह्यांचा उद्योग चालणार नाही...

By admin | Updated: January 22, 2016 00:50 IST

पतंगराव कदम : मिरजेत नगरसेवकांची बैठक; मते अजमावूनच महापौर पदाचा फैसला होणार

मिरज : महापौैर निवडणुकीसाठी लॉबिंग, सह्यांच्या मोहिमेचा उद्योग करू नका. सर्व नगरसेवकांचे मत अजमावूनच निर्णय होईल. ज्यांना पद मिळाले नाही, त्यांना न्याय देऊ, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले. महापौर निवडणुकीच्या काँग्रेस पक्षातील गटबाजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत गुरुवारी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पतंगराव कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले, महापालिका निवडणूक एकदिलाने लढल्याने काँग्रेस पक्षाला यश मिळाले. महापालिकेत काँग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. महापौर निवडणुकीसाठी लॉबिंग, नगरसेवकांच्या सह्या अशा उद्योगाचा काहीच उपयोग होणार नाही. सर्व नगरसेवकांचे मत अजमावूनच महापौर पदाचा निर्णय होईल. बंद पाकिटातून महापौर पदासाठी निवड झालेल्याचे नाव येईल. सर्वांना न्याय मिळेल, मात्र पक्ष टिकला पाहिजे. ज्यांना काही मिळाले नाही, त्यांना न्याय मिळेल. मदनभाऊ जाताना काही सांगून गेले, जयश्री पाटील योग्यवेळी ते जाहीर करतील. कांचन कांबळे यांनी महापौर पदाचा राजीनामा देऊन शिस्त पाळली. त्याप्रमाणेच सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत गोंधळ झाल्याने पक्षाचे नुकसान झाले. काँग्रेस पक्षात दोन गट झाल्याने सरकार गेले. त्यामुळे पक्ष टिकला पाहिजे, याचे सर्वांनी भान ठेवावे. यावर आत्मचिंतन करा, असा सल्लाही पतंगराव कदम यांनी दिला. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, महापालिकेत सत्ता परत मिळविण्यासाठी मोठी आश्वासने दिल्याने, नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. राज्यात व केंद्रात सत्ता नसल्याने काळ अडचणीचा आहे, याचे भान ठेवा. जिल्हाधिकारी किती चांगले काम करतात, याची चर्चा होते. मात्र महापौरांनी किती चांगले काम केले, याची चर्चा होत नाही. ज्या नेत्यांनी उमेदवारी मिळवून दिली, प्रचार केला, त्यांना प्रभागातील कार्यक्रमाला बोलाविण्यात येत नाही. कामे होत असताना किंवा निधी मिळत नसेल, तर त्याचीही चर्चा होणे आवश्यक आहे. या पातळीवर विस्कळीतपणा दिसतो. महापौर पदाबाबत जयश्रीताई जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत सर्वजण असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, मदन पाटील यांच्यावर सर्वांचे प्रेम व निष्ठा असल्याने मी नेतृत्व करीत आहे. काँग्रेस सदस्य यापुढेही काँग्रेसमागे एकसंध उभे राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गटनेते किशोर जामदार, माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनीही, काँग्रेस नेते घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल असे सांगितले. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. महापौर विवेक कांबळे, स्थायी सभापती संतोष पाटील, सुरेश आवटी, हारूण शिकलगार, संजय मेंढे उपस्थित होते. (वार्ताहर) पक्ष एकसंध : जयंतरावांवर अप्रत्यक्ष टीकापक्षातील गटबाजीमुळे राज्यात काँग्रेसचे सरकार गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता काँग्रेसचे पुन्हा जबरदस्त वातावरण निर्माण झाल्याचे पतंगराव कदम यांनी सांगितले. जयंत पाटील यांचे नाव न घेता, आमचा दुसरा भिडू एकदम भारी आहे. खांद्यावर हात टाकून भ्रम निर्माण करतो. मात्र काँग्रेस नगरसेवक एकसंध असल्याची ग्वाही कदम यांनी दिली. पद नशिबात असेल तर मिळते. काँग्रेसमध्ये तर वरूनच नाव येते. मी तीन वेळा मुख्यमंत्री होता-होता राहिलो, असे कदम यांनी मिश्किलपणे सांगितले. ताकारी, म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी पैसे भरा, अशी रोजच सुरू आहे. आमचे सरकार असताना आम्ही टंचाई निधीतून पैसे दिले होते. त्यासाठी सरकार आमच्या हातात पाहिजे, असेही कदम यांनी सांगितले.कारभार चांगला नाही!माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी मात्र, महापालिकेचा कारभार समाधानकारक नसल्याची टीका केली. प्रभागातील कामे झाले नाहीत तर कोणत्या तोंडाने निवडणुकीत लोकांपुढे जाणार? असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभागात विनानिविदा कामे होतात. मात्र काँग्रेस नगरसेवकांची कामे होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. मी तुमच्यात असल्याने काँग्रेसची सत्ता आली. मात्र तरीही संशयास्पद वातावरण निर्माण केले येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पैसे देऊन सह्यांची मोहीम...शिवाजी दुर्वे यांनी, महापौर पदासाठी काही इच्छुकांकडून नगरसेवकांना पैसे देऊन सह्यांची मोहीम सुरू आहे. त्यास प्रतिबंध करण्याची मागणी बैठकीत केली. सह्यांच्या मोहिमेचा उपयोग होणार नसल्याचे कदम यांनी सांगितले.